-
Neharu Mithak Aani Satya (नेहरू मिथक आणि सत्य)
पं. जवाहरलाल नेहरूंची जीवनकथा ही भारतीय स्वातंत्र्यलढ्याची आणि स्वतंत्र भारताच्या पुनर्निर्माणाची एक विराट गाथा आहे. युगायुगांपासून आलेलं तुटलेपण आणि परकीय गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर भारत ज्या विचारांच्या बळावर आपलं पाऊल घट्ट रोवून उभा राहिला आणि ज्या विचारांमुळे त्याचं स्वातंत्र्य सुनिश्चित झालं, त्याचप्रमाणे त्याच्या आधुनिकतेला आणि विकासाला ठोस मार्ग उपलब्ध करून दिला, ते विचार पं. जवाहरलाल नेहरू यांचे होते. या विचारांवर मानवमुक्तीची वैश्विक परंपरा आणि भारतीय चिंतनाचा सखोल प्रभाव होता. त्यांच्या जीवन-संघर्षानं त्यांच्या विचारांना आकार आला होता, भारताप्रती संपूर्ण समर्पण आणि सच्च्या प्रेमानं त्यांच्या विचारांना शक्ती दिली होती. बघता बघता पं. नेहरूंबद्दल असत्य आणि संभ्रमाचा एक विराट ढीग रचला गेला, ही खरोखरच एक दुर्दैवाची बाब आहे.
-
Marathyanchya Dakshinetil Paulkhuna (मराठ्यांच्या
श्री शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात दक्षिण मार्तात मराठ्यांच्या घडलेल्या घडामोडी व त्यांचे आजचे अस्तित्व यांचा संशोधनात्मक मागोवा. दक्षिण भारतात मराठ्यानी बांधलेले किल्ले, निर्माण केलेल्या राजधान्या, वसवलेली गावे, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शहरे, मराठ्यांच्या दक्षिणेत झालेल्या लढाया, त्यांच्यावर आधारित शिलालेख, मराठ्यांची समाधी स्थळे अशा अनेक प्रकारची संशोधनात्मक माहिती आपल्याला या या म मधून वाचायला मिळणार आहे. दक्षिण भारताकडे गेल्या काही वर्षात पर्यटक व इतिहास प्रेमींचा ओढा वाढलेला आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न असतो तो तिथे जाऊन नक्की काय पहावे, भाषा आणि भूगोल या अडचणींवर मात करता येऊन जास्तीत जास्त किल्ले, मंदिरे, समध्या, शिल्पे, राजवाडे, राजधान्या इ. अभ्यासता यावीत म्हणून इतिहास आणि भूगोलाची सांगड घालून दक्षिण भारतात विखुरलेली मराठ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा वाचकांच्या भेटीस आणत आहे.
-
Ek Bhakar Teen Chuli (एक भाकर तीन चुली)
एक भाकर तीन चुली’ संकटांतून धीराने मार्ग काढणारी आणि गरिबीशी वाघिणीसारखी लढणारी स्त्री ह्या कादंबरीची नायिका आहे. गाव-खेड्यातील शेतकरी व शेतमजूर स्त्रियांच्या वाट्याला आलेले बेसुमार कष्ट आणि त्यांची हिंमत हा कादंबरीचा गाभा आहे. तिची व्यथा, तिची वेदना, तिचा संघर्ष, या कादंबरीत अनुभवता येईल. नाळ तोडायच्या आधीपासून ते चितेपर्यंत, ज्या स्त्रियांंच्या वाट्याला संघर्ष आला, तरीही ती न हारता न डगमगता लढत राहिली अशा जगातल्या सगळ्याच स्त्रियांना ही कादंबरी समर्पित…
-
Pichkari (पिचकारी)
हे जीवन नक्की कसं जगलं पाहिजे हे सांगणारी एक ज्वलंत, वास्तववादी, उत्कंठावर्धक आणि डोळ्यात अंजन घालणारी कादंबरी…
-
Angulimal (अंगुलीमाल)
अंगुलीमाल इतिहासातील तो क्रूरकर्मा ज्याने शेकडो लोकांच्या हत्या करून त्यांच्या - अंगुल्याच्या (करंगळीच्या) माळा बनवून गळ्यात घातल्या. असा निर्दयी, क्रूर, हत्यारा अंगुलीमाल बुद्धांना तरी का चंद्रासारखा प्रकाशमान वाटला असेल ? हातात खंडा घेऊन प्रतिदिन लोकांची मुंडकी उडवणारा, रक्तपात करणारा अंगुलीमाल बुद्धांच्या एका वचनाने भिक्षुक झाला तरी कसा? मुळात अंगुलीमाल होता तरी कोण ? श्रावस्थीमध्ये कुठून आला? कशासाठी आला? अश्या कितीतरी प्रश्नांच्या उत्तरासाठी अंगुलीमालाच्या इतिहासाची केलेली ही उजळणी!
-
Gadhivarun (गढीवरून)
कृषी-परंपरेतल्या बहुजनांच्या आणि त्यातल्या जराश्या उच्च स्थानावर बसलेल्या किंवा फलाण्या जातीत जन्म घेतल्यामुळे आपण उच्च स्थानावरच आहोत, असं समजून वागणाऱ्या माणसांच्या आत असलेले मानसिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय गंड यांना हात घालणाऱ्या कथा या संग्रहामध्ये बहुसंख्येने आहेत. आपलं वर्तमान केवढं अशक्त आहे, यापेक्षाही आपला इतिहास केवळ दिव्य होता हेच सांगण्यात ज्यांना कृतकृत्यता वाटते, किंवा आपण स्वतः किती कर्तृत्वहीन आहोत ही गोष्ट साफ नजरेआड करून आपल्या पणजोबांच्या काळात आपल्या गढीवरून केवढी जबरदस्त सरदारी होती, याच्या खऱ्याखोट्या कथांमध्ये रमून त्या सरदारीचे अवशेष विकून खात राहणं आणि त्यालाच 'खानदानीपण' म्हणत राहणं, यातलं विदारकत्व राजाभाऊ, विनोदाच्या उपरोधाच्या उपहासाच्या माध्यमातून दाखवायला लागतात, तेव्हा ते सामाजिक अंगानेही फार महत्वाचं वाटत राहतं. मराठी साहित्यात मानसपुत्रांची मोठी परंपरा आहे. बाळकराम आणि तिबूनाना किंवा चिमणराव आणि गुंड्याभाऊ वगैरे अतिशय प्रसिद्ध जोड्यांमध्ये या गढीवरून प्रकटत असलेली 'राजाभाऊ' आणि 'तंबूशेठ' ही जोडीही नक्कीच एक वेगळा आणि स्मरणीय ठसा उमटवणारी आहे. एकुणातच या संग्रहाच्या निमित्ताने 'गढीवरून' उतरून एक सशक्त अशी कथात्मक अभिव्यक्ती साहित्याच्या प्रदेशात प्रवेश करत आहे. वाचकांनी उत्सुकतेने स्वागत करावं, असंच हे कथन आहे.
-
Kedarnath (केदारनाथ)
* केदारनाथ १७ जून * तो गिधाडाकडे पाहत राहिला , अगदी शेवट पर्यंत !!! नदीमध्ये अडीच तीन वर्षांच्या बाळाच्या हाडाचा सांगाडा पाण्यावर हेलकावत होता ! सिद्धार्थ ने सररकण आपली नजर वळवली ....त्याच्या बाजूला मूल कधी येऊन थांबलं होत त्याचं ही त्याला भान न्हवत मुलगा ही त्या हाडाच्या सांगाड्या कडे पाहत असावा सिद्धार्थ गुडग्यावर बसला दोन्ही हातांनी त्यांचे खांदे धरले आणि मुलाच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला ,"भीती वाटतेय ? मुलाने मान हलवून होकार दिला . त्याच्या नजरेला नजर भिडवून सिद्धार्थ आत्मविश्वासाने म्हणाला ,"घाबरू नकोस ....जोपर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत ही गिधाडे जवळ येत नसतात ! ते आपल्या मरणाची वाट पाहत घिरट्या घालत आहेत म्हणूनच आपण मरायचं नाही..." "आपल्याला जिवंत रहावंच लागेल !" एका सत्य घटनेवर आधारित कादंबरी .... *केदारनाथ १७ जून
-
Ravana -The king Of Rakshasas
Ravan the king of rakshsas is the story of a king of lanka who chivarlic, scholar,great devotees of shiva.
-
Mahamaya Nilavanti (महामाया निळावंती)
४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. ह्या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो. अलीकडच्या काळात, १९९२ साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत, 'महामाया निळावंती'त. अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भुत, जादुई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी. ' महामाया निळावंती '
-
Pratipashchandra (प्रतिपश्चंद्र)
प्रतिपश्चंद्र - Pratipashchandra by Prakash Suryakant Koyade । राजमुद्र, की एक रहस्य ? छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे गेल्या ३५० वर्षांपासून उजागर होण्याची वाट पाहत आहे... या उलगड्याचा थरारक प्रवास सांगतोय, खुद्द रायगड!
-
Ravan Raja Rakshasancha (रावण राजा राक्षसांचा)
रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान,वेदपंडीत,कट्टर शिवभक्त अश्या लंकेच्या राजाची कथा आहे. आजवरची पुराण, कथा,साहित्य,कला यामधून रावणाला दुर्गुणी,अवगुणी प्रवृतीचा प्रतिक बनवलं गेल. परंतु रावणसंहिता,कुमारतंत्र,सामवेदातील ऋचा,शिवतांडवस्स्तोत्र,वीणा,बुद्धिबळ यांची निर्मिती रावणाने केली.येवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला? सर्व देवांना पराभूत करणारा सर्व दैत्य, दानव,असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी रावण राजा राक्षसांचा.