-
The Source - Power Of Happy Thoughts
WE ALL SEEK INNER PEACE We all seek inner peace, lasting joy and unconditional love. But it eludes us as we are drawn into challenges of daily life? WE ALL SEEK WORLDLY SUCCESS We all seek to enjoy a perfect life, brimming with harmony in relationships, financial freedom and physical vitality. But we believe all of this comes at the cost of inner peace? WE CAN NOW ATTAIN BOTH! Join millions of readers of the Source Series who are realizing inner peace and success through the Power of Happy Thoughts. ----------------------------------------------------------------- ?This book is meant for humanity. If you are a good human being, you should take it, read it, and follow the path. ~ Shahrukh Khan, while releasing The Source ?Happy Thoughts are very right words. First create inner peace through Happy Thoughts, which shall then guide the external world. ? ~ His Holiness the Dalai Lama, while releasing Sirshree's book
-
Swasthya Trikon
शरीर आणि श्रम ; बुद्धी आणि ज्ञान; मन आणि मनन या तीनही गोष्टी ताळमोल राखून कार्य करतील. शरीरातील सारया प्रणाली, त्याचप्रमाणे सर्व अंग सहज आणि स्वतंत्र कार्य करत असतील. शरीरात आळस नसतील व ते सतत कार्यरत राहावं यासाठी कुठल्याही बाह्य व्यसनाची आवश्यकता पडत नसेल… मन, विचार आणि वाणी सम्यक असेल, मानत बे चे नी किंवा दुसरयांसाठी तिरस्कार नसेल, शरीराची सारी अंगे आणि क्रिया संतुलित असतील… वात पित्त आणि कफ या तिनेही गोष्टी नियंत्रित असतील, पचनशक्ती नियमित आणि संतुलित असेल, भूक वेळेच्या वेळी लागत असेल, जेवणानंतर तृप्तीचा अनुभव येत असेल… निद्रा स्वभाविक असेल, घशाला शोष पडून किंवा भयानक स्वप्नांमुळे झोपमोड होत नसेल आणि रोग्य प्रमाणे सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवत नसेल… कंबर सरळ, प्रमाणबद्ध आणि बळकट असेल, चेहरा प्रसन्न, डोळे चमकदार, नाडीची गती मध्यम शरीराचं तापमान संतुलित असेल आपलं काम पूर्णक्षमतेनं करण्यासाठी आपण सक्षम असाल इंद्रियांवर आपलं पूर्ण नियंत्रण असेल… तणाव आणि चिंतेपासून आपण सदैव मुक्त असाल आणि उत्साहानं जीवन जगत असाल… तन मन आणि उर्जेच्या एकरूपतेचं नाव म्हणजे स्वास्थ्य… स्वास्थ्याच्या खरा अर्थ आहे 'स्व' मध्ये स्थित होणं स्वस्थ माणूसच 'स्व' मध्ये स्थित होतो. तो रोग मुक्त असतोच त्याचप्रमाणे 'स्व' अर्क युक्तदेखील असतो. या स्व अर्कामुळे माणसाला स्वर्गात राहिल्याची, आनंदात असल्याची जाणीव होते.
-
Mrutyu Ant Navhe Vatchal
पृथ्वीवर माणसाचं वास्तव्य म्हणजे एखाद्या विद्यालयात प्रवेश घेऊन अध्ययन करण्यासारखंच नव्हे का? हे जग म्हणजे एक विद्यालय... प्रत्येक जीव पृथ्वीवर येतो ते काहीतरी उद्दिष्ट घेऊनच... कोणी धैर्य शिकण्यासाठी येथे येतो तर कोणी तेजप्रेमाची अनुभूती मिळावी म्हणून... काही लोक द्वेष-मत्सराचे परिणाम जाणून घेण्यासाठी तर काही निर्भय होण्यासाठी. प्रत्येकासाठी येथे स्वतंत्र अभ्यासक्रम असून जीवन जगता-जगता यातील धडे आत्मसात करायचे असतात... परंतु नेमकं हेच विसरल्यामुळे माणूस निरर्थक गोष्टींमध्ये आपला वेळ दवडतो. भावी पिढींसाठी कोणता वारसा सोडायचा? किती लोकांना आपण मनापासून मदत करतो? आपल्या मृत्यूनंतर किती लोकांना दुःख होईल? यांवर मनन न केल्याने जीवनालाच धडा शिकवण्याची संधी मिळते... पण तोपर्यंत माणसाचं अर्धं आयुष्य संपलेलं असतं. सुप्त गुणांना वाव न देता विकसित होण्यापूर्वीच चिरडून टाकणं हीच खरी आपल्या जीवनाची शोकांतिका... वास्तविक "मृत्यू' हा माणसाच्या जीवनप्रवासाचा अंत नसून "महाजीवनाकडे' नेणारं प्रवेशद्वार आहे. मृत्यूविषयीचं ज्ञान माणसाला सकारात्मक आणि सुंदर बनवतं. म्हणून मृत्यूचं भय न बाळगता या जीवनातच जागृत झालात तर एक प्रसन्न पहाट आपली प्रतीक्षा करत असल्याचं जाणवेल. जीवनाचा मागोवा घेऊन अंतर्मुख करणारं, आपला विकास घडवण्यासाठी पाऊल उचलायला शिकवणारं, पृथ्वीलक्ष्याविषयीचं अमूल्य ज्ञान प्रदान करणारा हा ग्रंथ...