-
Bharatiya Itihasachya Paulkhuna Atiprachin Kal Bhag - 1 (भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा अतिप्राचीन काल - भाग १)
आपल्या अतिपूर्वजांची उत्पत्ती, स्थित्यंतरे, विकसित होत गेलेली जीवनशैली तसेच सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणे गरजेचे असते. शिवाय पूर्वकालीन घटनाक्रमांच्या संदर्भातून प्रकर्षाने टाळावयाच्या बार्बीचे भान येण्यासाठी तसेच गैरव्यवस्थेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी इतिहासाची माहिती अत्यावश्यक आहे. इतिहासाच्या अभ्यासाद्वारे विश्वात निर्माण झालेली अस्थितरता, संघर्षमय बाबी व विध्वंसकारी स्थिती टाळता येऊ शकते व शांतता राखता येऊ शकते. प्राचीन वारशाद्वारे प्राप्त झालेल्या भूमीचे रक्षण करून देशाच्या सीमा जतन करण्याची जबाबदारी देशवासीयांवर असते. बहाल झालेल्या वारशाबाबतचे भान व वंशपरंपरागत मिळालेल्या हक्काधिकारांचा वापर करण्याची जाण ऐतिहासिक दस्तावेजांतून मिळते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ज्यू धर्मीयांनी त्यांच्या प्राचीन इतिहासाचे स्मरण ठेवून हक्काची 'देवदत्त भूमी' जिद्द व परिश्रमाने मिळवून इस्रायल देशाची निर्मिती केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'जे राष्ट्र आपला इतिहास विसरते त्या राष्ट्राला आपला भूगोल गमवावा लागतो !' भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकारण्यांना इतिहासाचे विस्मरण झाल्याने आजघडीला पाकव्याप्त काश्मीर व अक्साई चीनच्या निमित्ताने आपल्या देशाचा भूगोल बिघडवून घ्यावा लागलेला आहे हे कटुसत्य आहे.
-
Bharatiya Itihasachya Paulkhuna Atiprachin Kal Bhag - 2 (भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा अतिप्राचीन काल - भाग 2)
संपूर्ण विश्वात प्राचीन कालापासून विविध संस्कृती उदयास आल्या, विस्तारल्या व अपूर्व असा इतिहास निर्माण करून गेल्या. हजारो वर्षांपासून ठराविक भूप्रदेशाचा व सर्वसंपन्न असलेल्या आपल्या पूर्वजांच्या वैभवशाली परंपरांचा वारसा सांगणाऱ्या कित्येक संस्कृती आजघडीला काळाच्या उदरात नष्ट झालेल्या आहेत वा स्मृतिबाह्य ठरल्या आहेत. आफ्रिकेतील इजिप्त सभ्यता, मध्य आशियातील सुमेरियन सभ्यता, मेक्सिकोची माया सभ्यता, युक्रेटिस नदीकाठची बॅबिलोनियन सभ्यता, चीनची ह्वांग हो नदी खोऱ्यातील सभ्यता, मोहेंजोदडो येथील सिंधू सभ्यता, हिंदुस्थानातील गंगा-यमुनेच्या तीरावरील 'सनातन' म्हणून ओळखली गेलेली वैदिक संस्कृती या जगभरात विखुरलेल्या महत्त्वाच्या तसेच ठळक सभ्यता व संस्कृती आहेत. ग्रीक, बॅबिलोनियन, सुमेरियन, असिरियन या प्राचीन संस्कृती प्रगत व वेगवान असूनही काळाशी एकरूप न होता आल्याने लयास गेल्या, तर सिंधूसारख्या वैभवशाली संस्कृती निसर्ग व मानवी आक्रमणापुढे नेस्तनाबूत झाल्या. मात्र कित्येक हजारो वर्षांपासूनचा सलग इतिहास लिपीबद्ध करून प्राचीन तसेच अतिप्राचीन काळाचे सुस्पष्ट चित्र रेखाटणारी भारताची अतिप्राचीन परंपरा असलेली सनातन वैदिक संस्कृती ही भारताची शान, मान व जान आहे. सनातन संस्कृतीचे आगळेपण हे आहे की ही संस्कृती संशोधकीयदृष्ट्या जरी अतिप्राचीन ठरविण्यात आलेली नसली तरी आर्यांनी रुजविलेला प्राचीन वैदिक धर्म आजतागायत प्रवाहित आहे आणि हेच या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे!
-
Buran Ghatitil Te Tevis Tas (बुरान घाटीतील ते तेवी
ट्रेकचे थरारक अनुभव, हिमालयाचे रौद्र रूप, अतिउंचावरील आजाराची लक्षणे व परिणाम इत्यादी सर्व नेमक्या शब्दात मांडले आहे. अतिबर्फवृष्टीमुळे दोन सदस्यांच्या जीवावर बेतले त्यांना मृत्यूच्या दाढेतून सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढले. अश्या अनेक थरारक अनुभव घेतलेल्या ट्रेकचे वर्णन लेखिकेने केले आहे. त्यामुळे हा सर्व अनुभव एक अभ्यासाचा विषय झाला आहे. कारण साहसी खेळामध्ये अनुभव हाच सर्वात मोठा गुरु व मार्गदर्शक असतो.