-
1946 Swatantryach Antim Yuddha (१९४६ स्वातंत्र्याचं अंतिम युद्ध)
फेब्रुवारी १९४६ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीचे सुमारे २०,००० नौसैनिक ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठावाला उभे राहिले. खराब सेवा अटी, वांशिक भेदभाव आणि ब्रिटीशांच्या वागणुकीविरोधात त्यांनी उठाव केला. बंडाची सुरुवात मुंबईत झाली आणि नंतर कराची, कलकत्ता, मद्राससारख्या बंदरांमध्ये झपाट्याने पसरली. नौसैनिकांनी ब्रिटीश झेंड्याऐवजी काँग्रेस, मुस्लिम लीग आणि कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे फडकावून राजकीय ऐक्य दाखवले. हे बंड केवळ आठवड्याभरात दडपण्यात आले, परंतु यामुळे ब्रिटीश साम्राज्याच्या पायाखालची जमीन हादरली आणि भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रक्रियेला गती मिळाली. १९४६ : लास्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे प्रमोद कपूर लिखित पुस्तक या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनाक्रमावर प्रकाश टाकते. सखोल संशोधन व ओघवत्या लेखनशैलीतून लेखकाने या नौसैनिक उठावाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे पुस्तक त्या तरुण नौसैनिकांना मानवंदना आहे, ज्यांनी साम्राज्यशाहीविरुद्ध उठून उभं राहण्याचं धाडस केलं.