-
Kailas - Manas ( कैलास - मानस)
कैलास पर्वत हे सृष्टीचे बीज मानले जाते. तसेच ही संकल्पभूमी आहे इथे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. विष्णू व शंकर यांचे संकल्प म्हणजे ब्रह्मदेवाचे सृजनत्व अशी हिंदूंची श्रद्धा आहे. कैलास हे शंकर आणि पार्वतीचे हिमालयातील निवास्थान, तर मानस यां सरोवराची निर्मिती केली. गौतम बुद्धांनी याच सरोवराच्या मध्यभागी बसून जगाला ज्ञान दिले. महानुभाव पंथीय त्यांचा हंस अवतार मानसमध्ये झाला. असं मानतात. तर जैन धर्माचे पहिले तीर्थकर ऋषभदेवाचे महानिर्वाण कैलासाहून झाले वेद, उपनिषदे, स्कंदपुराण, महाभारत आणि मेघदूत यां ग्रंथात कैलास-मानसाचा उल्लेख आहे. मराठी संतांचे मेरुमणी संत नामदेवांनी तेराव्या शतकात हिमालय ओलांडून कैलास - मानसाची यात्रा केली. तसा त्यांचा अभंग आहे . कैलास मानस हे श्रीकृष्ण, दत्त्तात्राय, जैन तीर्थकर आणि आदिशक्ती महालक्ष्मीची भूमी आहे . असे हे हिमालयातील निसर्गचक्राची बदलती सुंदर रूपे, अद्भूत सौंदर्याचा अनुभव आणि मानस काठाची निळ्याभोर आकाशाखालाची चिरशांतता अनुभवणे हे या प्रवासाचे वेगळेपण आहे
-
Yugdrashta Maharaja (युगद्रष्टा महाराजा)
देशात स्वातंत्र्यपूर्व काळात पाचशे ते सहाशे संस्थाने होती. या संस्थानांपैकी पुरोगामी राजा म्हणजे सयाजीराव गायकवाड. महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना मदत करणारे सयाजीराव ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणार्या क्रांतिकारकांनीही मदत करत होते. साहित्य, कला, नाट्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा सर्व बाबींना उत्तेजन देणारा हा राजा सर्वार्थाने वेगळा होता. ज्येष्ठ लेखक बाबा भांड यांनी अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून ही कादंबरी लिहिली आहे. 528 पानांच्या या कादंबरीत सयाजीरावांचे अनेक पैलू लेखकाने मांडले आहेत. सयाजीराव किती मोठे होते, हे या कादंबरीने सहजपणे लक्षात येते. लेखकाने खूप मोठा काळ अत्यंत ताकदीने उभा केला आहे. Authors: बाबा भांड
-
Anandashram
जगात घडणार्या प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे. शरीर मनाच्या बिघाडासही मीच कारणीभूत आहे. हे सगळं दुरुस्त करायचं असेल तर, प्रत्येक गोष्टीची सुरुवातही मलाच करावी लागेल. अशी आहे ही आनंदाश्रमाची गोष्ट.