-
Pravas Eka Lekhkacha (प्रवास एका लेखकाचा )
साहित्यिक असतो, होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो, तितक्याच स्वाभाविकपणे त्याच्याकडून लेखन होतं. जमिनीचं कवच फोडून वर उसळून येणाऱ्या केळीच्या रसरशीत कोंभातच घडाचं आश्वासन असतं. असा तो मुळातच असला, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा लाभ त्याला मिळतो. व्यंकटेश माडगूळकर यांच्या 40 वर्षांतील लेखन प्रवासाचं मनोज्ञ दर्शन.
-
Bangarwadi ( बनगरवाडी )
बनगरवाडी. माणदेशातल्या एका 'लेंगरवाडी' नावाच्यावाडीवर बेतलेली वाडी. १९३८ साली माडगूळकर त्या गांवी होते तेव्हा तिथल्या अनुभवांचे वर्णन कादंबरीरूपात 'बनगरवाडी' या नावाने आपल्यासमोर येते. स्वतः माडगूळकरही त्याच भागातले. ९९साली माडगूळकरांनी कादंबरीत काही रेखाटने करावी असे ठरल्याने ते पुन्हा त्या वाडीत गेले. आणि ३८ सालच्या लेंगरवाडीत जवळजवळ साठ वर्षांनीही काही फरक पडला नसल्याचेच त्यांना जाणवले. व्यंकटेश माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेली बनगरवाडी वाचकाला अद्भूत अनुभव देते. बनगरवाडी या छोट्याच्या गावात भेटतात ते कारभारी, अंजी, दादू, आयाबू, आनंदा रामोशी, रामा, शेकू आणि त्याची उंच बायको. या प्रत्येकाची शरीरवैशिष्ट्ये जशी आहेत, तशी स्वभाववैशिष्ट्ये. प्रत्येकाला एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. हे गाव माडगुळकर यांना जसं दिसलं, तसं ते त्यांनी चितारलं आहे. केवळ लेखणीतूनच नव्हे तर; कुंचल्यातूनही. माडगुळकर यांची रेखाचित्रं हे पुस्तकाच्या खास आकर्षणाचा एक भाग आहे.
-
Sattantar
काळाप्रमाणेच संघर्षही सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच. असलीच, तर भरती असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंडं भरमसाट वाढतात, गर्दी होते. तेव्हा तेव्हा संघर्ष बळावून उठतो. जेव्हा उपलब्ध अन्नात, भूमीत वाटेकरी निर्माण होतात, तेव्हा संघर्ष उचल खातो. जेव्हा अस्थिरता निर्माण होते, एखादी जात धोक्यात येते, बाहेरून परकं कोणी येतं आणि बंदिस्त टोळीत घुसू पाहतं. तेव्हा संघर्ष उतू जातो. ज्यांना बोलता येतं, ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतून दाखवतात. ज्यांना बोलता येत नाही, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्शातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला, की शस्त्रास्त्रं वापरली जातात ज्याना शस्त्रास्त्र माहीतच नसतात, ते सुळे, नख वापरतात. संघर्ष सर्वत्र भरून राहिलेला असतो.