Pravas Eka Lekhkacha (प्रवास एका लेखकाचा )
साहित्यिक असतो, होत नाही. जितक्या स्वाभाविकपणे केळीला घड येतो, तितक्याच स्वाभाविकपणे त्याच्याकडून लेखन होतं. जमिनीचं कवच फोडून वर उसळून येणाऱ्या केळीच्या रसरशीत कोंभातच घडाचं आश्वासन असतं. असा तो मुळातच असला, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाचा लाभ त्याला मिळतो. व्यंकटेश माडगूळकर यांच्या 40 वर्षांतील लेखन प्रवासाचं मनोज्ञ दर्शन.