-
Rahile Dur Desh-Ghar Mage (राहिले दूर देश-घर मागे)
सध्या काळ सहजगत्या परदेशगमनाचा आणि जमल्यास तेथेच वास्तव्य करण्याचा आहे. खूप आर्थिक लाभ, उच्च दर्जाचे राहणीमान, उत्तम सुखसोयी आणि व्यावसायिक बढती या कारणांनी चालू पिढी परदेशात जावून तेथे वास्तव्य करायला उत्सुक असते. याचा परिणाम असा हातो की परदेशात गेलेली पिढी भारतात मागे राहिलेल्या देशा विषयी आणि त्यांच्या घरातील माणसांबद्दल थोडी काळजी आणि बराच दुरावा बाळगून परदेशात राहत असते. इकडे मागे भारतात त्यांचे आईवडील एकटेपणाचे दुःख भोगत असतात आणि देश त्याचे प्रश्न सोडवत असतो. परदेशी गेलेले लोक त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वापरून परदेशात खूप पैसा मिळवू शकतात, पण त्यांचे ज्ञान आणि कौशल्य स्वदेशाला उपयोगी पडत नाही. यातून Brain Drain चा प्रश्न निर्माण होतो. परदेशी स्थलांतर करणारे आणि त्यांच्या मागे राहिलेला त्यांचा देश व त्यांचे घर अशा या प्रश्नाला दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू या पुस्तकात मनोरंजक कादंबरी रूपात विचारात घेतल्या आहेत.
-
Ajinkya Rani Tara (अजिंक्य राणी तारा)
बादशहाच्या मृत्यूची बातमी साताऱ्याच्या किल्ल्यावर येऊन पोहोचली होती. मराठा सरदार महाराणी ताराबाईंसह जिथे जमले होते. औरंगजेबाच्या मृत्युबरोबरच मोगलांचे मराठ्यांबरोबरचे युद्ध संपले होते. महाराणी ताराबाई विजयी ठरल्या होत्या. मराठे विजयाचा जल्लोष करीत होते. औरंगजेबाने साताऱ्याच्या किल्ल्याचे नाव 'आझ्झमतारा' असे ठेवले होते. आता मराठे वीर "अजिंक्य तारा" असा जयजयकार करीत होते. आपल्या पराक्रमाने किल्ल्यांची मोगली नाव त्यांनी पुसून टाकले होते. हे सर्व पाहताना कृतकृत्यतेने महाराणी ताराबाईंचे ह्रदय भरून आले होते. आपल्या हातात भगवा ज़िन्दा घेऊन तो आनंदाने हेलावत महारानी म्हणाल्या, "विरांनो! महाराष्ट्राचा उत्कर्ष असाच वाढत राहो. पुढे तुम्ही नसाल, मी नसेन पण भावी मराठी पिढ्या असतील. या भावी काळातील मराठी पिढ्या आपल्या पराक्रमाचे गीत गातील अणि ऐकतील. आपला पराक्रम त्यांना स्फूर्ति, तेज आणि धैर्य डेट राहील."