Rahile Dur Desh-Ghar Mage (राहिले दूर देश-घर मागे)
सध्या काळ सहजगत्या परदेशगमनाचा आणि जमल्यास तेथेच वास्तव्य करण्याचा आहे. खूप आर्थिक लाभ, उच्च दर्जाचे राहणीमान, उत्तम सुखसोयी आणि व्यावसायिक बढती या कारणांनी चालू पिढी परदेशात जावून तेथे वास्तव्य करायला उत्सुक असते. याचा परिणाम असा हातो की परदेशात गेलेली पिढी भारतात मागे राहिलेल्या देशा विषयी आणि त्यांच्या घरातील माणसांबद्दल थोडी काळजी आणि बराच दुरावा बाळगून परदेशात राहत असते. इकडे मागे भारतात त्यांचे आईवडील एकटेपणाचे दुःख भोगत असतात आणि देश त्याचे प्रश्न सोडवत असतो. परदेशी गेलेले लोक त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वापरून परदेशात खूप पैसा मिळवू शकतात, पण त्यांचे ज्ञान आणि कौशल्य स्वदेशाला उपयोगी पडत नाही. यातून Brain Drain चा प्रश्न निर्माण होतो. परदेशी स्थलांतर करणारे आणि त्यांच्या मागे राहिलेला त्यांचा देश व त्यांचे घर अशा या प्रश्नाला दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू या पुस्तकात मनोरंजक कादंबरी रूपात विचारात घेतल्या आहेत.