-
Mahasamrat Rankhaindal Khand 2 (महासम्राट रणखैंदळ
पावनखिंडीतला थरार, सुरतेची महालूट, तीस हजार मोगली फौजेचे उंबरखिंडीत केलेले निशस्त्रीकरण, शाहिस्तेखानाला वेसण, कुडाळचे महायुद्ध आणि सागराच्या पोटातले सिंधुदुर्ग निर्मितीचे अचाट स्वप्न! पस्तीशीच्या उंबरठ्यावर शिवरायांनी उडवलेली ‘रणखैंदळ’!
-
Mahasamrat Jhanjhavat Khand-1 (महासम्राट झंझावात ख
छत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू मराठी वाचक प्रथमच वाचतील आणि तो वाचकांना भारावून टाकणारा ठरेल, यात शंका नाही.
-
Panipatche Ranangan (पानिपतचे रणांगण)
पानिपतची तिसरी लढाई प्रामुख्याने अहमदशहा अब्दाली आणि भाऊसाहेब पेशवे (नानासाहेब पेशवे यांचे भाऊ) यांच्यात लढली गेली. काय होती या लढाईमागची कारणमीमांसा आणि का झाला मराठ्यांचा घोर पराभव, का झाली एवढी मनुष्यहानी, याचा वेध विश्वास पाटील यांनी ‘पानिपतचे रणांगण’ या नाटकातून घेतला आहे. पेशवाईचं समूळ उच्चाटन करण्यासाठी उत्तरेकडील मुस्लीम सत्ताधारी (अहमदशहा अब्दाली हा त्यातील प्रबळ पातशहा) एकवटले. त्यांचा सामना करण्यासाठी भाऊसाहेब पेशवे विश्वासरावांसह पूर्ण सज्जतेनिशी, आत्मविश्वासाने उत्तरेच्या मोहिमेवर गेले; पण नानासाहेब पेशव्यांचा गहाळपणा, मल्हारराव होळकर आणि अन्य सरदारांनी इब्राहिम गारदीच्या गोलाची लढाईला (लढाईची एक पद्धत) ऐन रणांगणात फासलेला हरताळ यामुळे मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात संहार होऊन त्यांना हार पत्करावी लागली. आपसातील लाथाळ्या केवढा प्रचंड राजकीय, आर्थिक, सामाजिक, भावनिक, मानसिक विध्वंस करू शकतात, हे दाहक वास्तव अधोरेखित करणारं नाटक.
-
Aambi (आंबी)
आंबी...बाप्पाजींची देखणी, आईवेगळी, लाडकी मुलगी... बाप्पाजींची बहीण नको नको म्हणत असताना बाप्पाजी तिच्या मुलाशी, श्रीरंगशी आंबीचं लग्न लावून देतात... श्रीरंग नपुंसक आहे हे कळल्यावर आंबी माहेरी निघून येते...तिचं दुसरं लग्न करायला बाप्पाजी तयार नसतात...पण काही घटना अशा घडतात की बाप्पाजी आंबीशी अबोला धरतात, तिला सासरी धाडतात...श्रीरंग आंबीला मारझोड करतो...आंबी परत माहेरी येते...परत बाप्पाजी तिचा रागराग करतात...गणूआप्पा तिला अनूमावशीकडे नेऊन सोडतात...मावशी तिचं लग्न तुकाराम ड्रायव्हरशी लावून देते...तुकाराम व्यसनी, जुगारी असतो...आंबीला मारहाण करत असतो...तालेवार घरातली आंबी बेकरीत काम करायला लागते...तिला मुलगी होते...तुकाराम जेव्हा आंबीची अब्रूच डावावर लावतो तेव्हा ती मुलीसह त्या घरातून पोबारा करते...पुढे काय होतं आंबीचं? एका स्त्रीच्या जीवनाचं हृदयस्पर्शी तरीही तेजस्वी दर्शन.
-
Sambhaji
Even as a child, Sambhaji has known he must stand alone. His mother died when he was barely two, and his father was always absent—chasing his own dream of ‘Swaraj’, fighting to keep the Mughal emperor Aurangzeb at bay. As the eldest son, Sambhaji is the true heir to Shivaji. He is valorous, wise and has the makings of a capable statesman. But there are dark forces at play in the palace. Shivaji’s other queen, Soyrabai, is scheming to place her son Rajaram on the throne, and she has the support of several ministers whose misdemeanours Sambhaji is determined to expose. On 3 April 1680, Shivaji dies unexpectedly, and it is finally time for Sambhaji to rise to the challenge. He must now fight Aurangzeb, who has spent twenty years trying to smoke out the ‘mountain rat’, and whose presence in the Deccan poses an increasingly grave threat to the Maratha empire. And what could be better than the enemy’s own brother-in-law willing to hand him the rat on a platter. A moving portrait of an often misunderstood braveheart, Vishwas Patil’s Sambhaji is a massive bestseller that has sold over a 100,000 copies in Marathi. Cinematic and ambitious in its scope, this is a keenly researched and splendidly executed period drama about one man’s struggle to preserve his father’s legacy and of the price extracted by the throne and the homeland.
-
Gabhulalelya Chandrabanat (गाभुळलेल्या चंद्रबनात)
बाकेराव एक गुणी तमाशा कलावंत. त्याच्या उतारवयात रंगकली या सोळा-सतरा वर्षाच्या कलावतीचा त्याच्या जीवनात प्रवेश होतो. त्या दोघांच्या एकत्र येण्याने त्यांचं कलाजीवन बहरतं; पण नंतर त्यांच्या नात्याला उतरती कळा लागते. तमाशा कलावंतांची कला आणि त्यांचं जीवन यांच्या एकमेकांत गुंफलेल्या धाग्यांचं वास्तव चित्रण. Tamasha, the traditional Marathi folk theatre was standing on four major pillars- drama, erotic sensual lavani songs and traditional rhythmic music played on percussional instruments like dholki. Along with such social and historical dramas played in the Tamasha mobile theatres in the jamboree of village fairs, the galaxy of many great actors and female artists had also created their own significant lore. Vishwas Patil has interwoven his new novel on that backdrop of mobile Tamasha troops’ heritage and culture. Here, protagonists are Bakerao, who is a great singer, musician and a prolific actor. Beautiful Rangakali is the creator of her own nebula of songs, dances and acting. This is a painful love story between Bakerao and Rangakali’s passion and attraction towards each other’s legendary artistic virtues. Their seperation is unavoidable but their reunion is enchanting, and finally, that purest love marches towards the cobwebs of destiny. A powerful novel written by today’s major Indian novelist on the backdrop of folk songs, drama and culture, will surely enamor the readers and will take them through an entirely new, unknown and captivating world.
-
Panipat
The third battle of Panipat—the final one, the bloodiest of them all. The Marathas and the king of Afghanistan, Ahmad Shah Abdali, fought to claim the throne of Delhi. While the face-off had stretched on for months on the elevated flat land of Panipat, the actual conflict took place on 14 January 1761. And within a span of twelve hours, 150,000 soldiers lost their lives. About 80,000 horses, bullocks and elephants were slaughtered. The Maratha warriors―the Peshwa’s cousin Sadashivrao, son Vishwasrao and step-brother Shamsher Bahadur― and their allies, chieftains Malharrao Holkar, Jankoji Shinde and Ibrahim Khan Gardi, defied the bitter cold of the north and months of starvation, fighting to the last man. The campaign brought the Maratha empire to its knees, emptying out its coffers and decimating an entire generation. This battle most horrific has dazzled generations of historians. Its tactics, ingenious battle formations and fortifications, its reputation as the supreme war of wits has kept the third battle of Panipat alive in public memory. But a war is not only glory and splendour. It is fought by flesh-and-blood people with feelings and motivations big and small, and who come alive in Vishwas Patil’s Panipat. His ability to weave gargantuan research into effortless storytelling truly shines through in this tale. Among the five highest selling Marathi novels of all time, Panipat has received thirty-eight awards since its release in 1988, sold more than 250,000 copies, and been translated into several languages. Published in English for the first time, this novel is an essential read for every lover of historical fiction.
-
Nagkeshar (नागकेशर)
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची ‘नागकेशर’ ही डोंगरे-देशमुख या एकाच कुटुंबातील सहकारमहर्षी बापूराव आणि बबननाना या दोन भावांमधील सत्तासंघर्षाची कहाणी आहे. हा संघर्ष त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही चालू राहतो. बापूराव गजरा साखर कारखान्याचे चेअरमन होतात, तर बबननाना कारखान्यात शिरकाव करण्याच्या हेतूने बापूरावांना कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी हरप्रकारे मदत करण्याची भूमिका पत्करतात. बापूंचा मुलगा राजकुमार अर्थात प्रिन्स आणि नानांचा मुलगा बाजीराव. प्रिन्सशी विवाह करण्याची मनीषा बाळगणाऱ्या नेत्रादेवीला विचित्र दैवगतीमुळे बाजीरावच्या गळ्यात वरमाला घालावी लागते; तर नवऱ्याच्या छळाला व मारझोडीला कंटाळून आश्रयाला आलेल्या जिद्दी, करारी व देखण्या शलाकाचा प्रिन्स पत्नी म्हणून स्वीकार करतो. कारखाना, डिस्टीलरी आणि गजरा एज्युकेशनल ट्रस्टची सूत्रे प्रिन्स आणि शलाकाकडेच जातात; पण कारस्थानी सल्लागार बबननाना, रगेल पैलवान बाजीराव आणि स्वार्थांध नेत्रा व तिची सासू चंचलानानी यांच्या कट-कारस्थानांमुळे प्रिन्स आणि शलाकाला सत्तेवरून पायउतार होणं भाग पडतं. प्रिन्स आणि शलाका ती सत्ता परत मिळवतात का, प्रिन्स आणि शलाकाचा राजकारणात प्रवेश, तिथेही शलाकाचा आधीचा नवरा रमेश दिवसे आणि बाजीराव - नेत्राचा चढेल मुलगा सुपरप्रिन्स यांनी शलाका आणि प्रिन्सच्या विरोधात उभे ठाकणे, रमेश - शलाकाचा मुलगा अभिषेकने निवडणुकीत उतरणे, अशा अनेक नाट्यपूर्ण घडामोडींमुळे वाचकाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणणारी ही कादंबरी अवश्य वाचावी अशी आहे.
-
A Dirge for the Dammed
It begins with a familiar story of displacement. The people of Jambhli have been ousted from their homes with promises of rehabilitation and compensation in cash and land, to make way for an irrigation project and the construction of a large dam. The Jambhlikars anguish at leaving behind everything they have known and resettling among hostile strangers - the beneficiaries of the dam project and their desperate search for alternative employment, for which they are neither trained nor qualified, are just the beginning of their troubles. In their search for a place to call their own, they must battle petty local politicians, scheming government officials strengthened by exploitative laws and self-serving social workers and face the ultimate betrayal at the hands of trusted leaders. Yet, even as the fabric of their social structure disintegrates, their courage, faith and innate goodness shine through in the face of unspeakable hardship. Heartbreaking, humane and utterly relevant to our time, this remarkable Sahitya Akademi Award-winning novel stands apart in giving a voice to those who pay the price for progress and development and in vividly encapsulating the struggles of the impoverished against a ruthlessly corporatized world.
-
Chandramukhi (चंद्रमुखी )
दौलतराव - एक ध्येयधुरंधर राजकारणी. आपला ’संसार’ सांभाळत लोककलेची कदर करणारा रसिक. ती - चंद्रमुखी! नावाप्रमाणेच देखणी. तमाशातली शुक्राची चांदणी. नृत्यकौशल्य, सौंदर्याबरोबरच ’बाई’पणाचा शाप घेऊन आलेली कलावंतीण. मग ’लाल दिवा’ आणि ’घुंघरा’च्या गुंतावळीतून निर्माण झाली ही रशिली कहाणी.
-
Mahanayak (महानायक )
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी!
-
Pangira
पांढरी या गावाच्या बदलत्या मातीची कर्मकथा म्हणजे ’पांगिरा’. माणसांचं सामुदायिक आयुष्य आणि त्यातला चढउतार हीच या कादंबरीतली प्रधान पात्रं. ’गाव’च त्याचा नायक! लोकशाहीच्या प्रयोगासाठी संस्थानं खालसा झाली. कूळकायदा आला. वतनं गेली. दलालांच्या कुर्हाडी जंगलांच्या मानगुटींवर बसल्या. भूगर्भातलं पाणी संपलं. पिकं नाहीशी झाली. दुष्काळानं गावंच्या गावं गिळली. आणि लोकशाहीतून नवी घराणी जन्माला आली. कायदे आले. परंतु कायद्यातल्या फटी नेमक्या शोधून हव्या तशा वाटा वळवण्याचं नवं शासनही व्यवहाररूढ झालं. या कादंबरीचं वैशिष्ट्य आहेगावशिवेच्या सत्तास्पर्धेचं, पर्यावरणाच्या परवडीचं, सामान्य कष्टकर्याच्या हलाखीचं चित्र. दिवसेंदिवस अधिकच भयाण, भेसूर बनत चाललेलं.
-
Kraantisurya
१९४२च्या धगधगत्या कालखंडात साताNयाच्या भूमीमध्ये "प्रतिसराकार" (पत्रीसरकार) स्थापन करून ब्रिटिशांची झोप उडवणा-या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा.क्रांतिसिंह – एक फर्डा वक्ता, द्रष्टा समाजसेवक, डाव्या चळवळींचा सेनानी, संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या, महाराष्ट्राचा माळकरी माक्र्सवादी. त्यांचे लोभस, रांगड व्यक्तिमत्व, मातीतून आकारलेले नेतृत्व, मुलखावेगळे कर्तृत्व यांचा शोध घेणारी, कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली ‘क्रांतिसूर्य’.
-
Sambhaji (संभाजी)
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंâवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!
-
Jhadajhadti
तुमच्या बागा फुलाव्यात, ऊस मळे झुलावेत, साखर कारखाने निघावेत, यंत्रं चालावीत, तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून आम्ही आमची गावं आणि आमचं भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं. विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी, साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या.जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच. गाव आणि देव पाठीवर बांधून चालणार्या हजारो धरणग्रस्तांची मन सुन्न करणारी कहाणी.
-
Not Gone With The Wind
वाऱ्यासोबत न वाहून गेलेली आणि वाऱ्यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे!हॉलीवूड-बॉलीवूडच्या अंतर्बाह्य दृष्टीक्षेपासह इटालियन, फ्रेंच , ब्रिटिश अशा अनेक अभिनव चाकोऱ्यांचा, विश्वास पाटील यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण ललित धांडोळा.शेक्सपिअर, टॉलस्टॉय, जॉन फोर्ड, दोस्तायव्हस्की, गार्बो, सोफिया लॉरेन, थॉमस हार्डी, शरत्चंद्र, डेव्हिड लीन, मार्लन ब्रँडो, स्टॅन्ले क्युब्रिक, रोमन पोलन्स्की, चार्ली चॅप्लीन, स्टीव्हन स्पीलबर्ग, मेहबूब खान, कोपोला, मधुबाला, के. असिफ, इनग्रिड बर्गमन, व्ही. शांताराम असे अवघ्या विश्वाचे अनेक सगेसोयरे या शब्दांगणात तुमच्याशी हृद्गत करतील!
-
Panipath
महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैर्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी.