Pangira

By (author) Vishwas Patil Publisher Rajhans Prakashan

पांढरी या गावाच्या बदलत्या मातीची कर्मकथा म्हणजे ’पांगिरा’. माणसांचं सामुदायिक आयुष्य आणि त्यातला चढउतार हीच या कादंबरीतली प्रधान पात्रं. ’गाव’च त्याचा नायक! लोकशाहीच्या प्रयोगासाठी संस्थानं खालसा झाली. कूळकायदा आला. वतनं गेली. दलालांच्या कुर्‍हाडी जंगलांच्या मानगुटींवर बसल्या. भूगर्भातलं पाणी संपलं. पिकं नाहीशी झाली. दुष्काळानं गावंच्या गावं गिळली. आणि लोकशाहीतून नवी घराणी जन्माला आली. कायदे आले. परंतु कायद्यातल्या फटी नेमक्या शोधून हव्या तशा वाटा वळवण्याचं नवं शासनही व्यवहाररूढ झालं. या कादंबरीचं वैशिष्ट्य आहेगावशिवेच्या सत्तास्पर्धेचं, पर्यावरणाच्या परवडीचं, सामान्य कष्टकर्‍याच्या हलाखीचं चित्र. दिवसेंदिवस अधिकच भयाण, भेसूर बनत चाललेलं.

Book Details

ADD TO BAG