-
Vivekayatree (विवेकयात्री)
मानवी संस्कृतीतील तत्त्वज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास म्हणजे विवेक आणि अविवेक यांच्यातील संघर्षाचा इतिहास. हा इतिहास आहे अनेक चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा. ही वाटचाल आहे काटेरी रस्त्यांची, वादळवाऱ्याची, संघर्षाची, जय-पराजयाची, कधी दिशाहीन, तर कधी उलट दिशेची. अंधाराची पर्वा न करता ठामपणे पावले टाकत ही वाट चालणारे तत्त्वज्ञ म्हणजे मानवाच्या उन्नयनासाठी झटणारे, ही वाट उजळून टाकणारे दीपस्तंभच ! पाश्चात्त्य आणि पौर्वात्य तत्त्वज्ञांची आयुष्ये, त्यांची जडणघडण, विश्वाची, निसर्गाची, मानवी मनाची रहस्ये शोधण्याची त्यांनी केलेली अविश्रांत धडपड या साऱ्याचा वेधक धांडोळा.
-
Zada Lavanara Manus (झाडं लावणारा माणूस)
एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वामधले खरोखरोचे असामान्य गुण स्पष्ट दिसायला हवे असतील तर अनेक वर्षं त्या व्यक्तिच्या कामाचं निरीक्षण करण्याचं सौभाग्य लाभावं लागतं. पानाफुलांवर, पशुपक्ष्यांवर, जमिनीवर आणि माथ्यावरील आकाशावर अबोल प्रेम करणा-या एका विलक्षण माणसाची ही कथा आहे. जाँ जिओनो यांच्या या चिमुकल्या कथेनं जगभराच्या लहान-थोर वाचकांवर मोहीनी घातलेली आहे.
-
Sobat Sanjvelchi (सोबत सांजवेळची)
आपल्यापैकी बहुतेकजण मृत्यूला, विशेषत: वेदनादायी मृत्यूला घाबरतात. परंतु आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले, अशा सामान्य व्यक्तींच्या, असामान्य जीवनस्पर्शी कथा डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अन् अत्यंत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले प्रसंग, त्यातील गूढता, ताणतणाव आणि त्याचबरोबर दिलासा देणारा हळुवार स्पर्श हे सर्व खरोखरीच मनाला भावून जाते. त्यांचे हे हृदयस्पर्शी पुस्तक वाचल्यानंतर मी मृत्यूला सामोरी जायला तयार आहे आणि कदाचित मी त्याचा अगदी शांतपणे स्वीकार करू शकेन, असे मला वाटते.
-
Madhyamayan: Dubai,Egypt,Sri Lanka,Thailand,Singapore,Bhutan (मध्यमायन: दुबई,इजिप्त,श्रीलंका,थायलंड,सिंगापूर,भूतान)
विलास शेळके. एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार. अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निगालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृध्द बनतो. विलास शेळके यांची लेखणी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जाते. त्यावेळी त्या लेखणीने मध्यावधीत भेटलेल्या सहा देशाचे रेखाटलेले देखणे शब्दचित्र.
-
Purvayan: Japan,Hongkong,Macau,Cambodia,Vietnam,Chin (पूर्वायन: जपान,हॉंगकॉंग,मकाव,कंबोडिया,व्हिएतनाम,चीन)
एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो. विलास शेळके यांची लेखणी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जाते. त्यावेळी त्या लेखणीने मध्यावधीत भेटलेल्या सहा देशांचे रेखाटलेले देखणे शब्दचित्र.
-
Pashchimayan: Europe,Scandinavia,Russia,America(पश्र्चिमायन: युरोप,स्कँडिनिव्हिया,रशिया,अमेरिका)
विलास शेळके. एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो. 'पश्चिम' हा शब्द केवळ दिशा दाखवणारा नाही. समृद्धी, आधुनिकता, प्रगत तंत्रज्ञान, वेगळी जीवनमूल्ये अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी अधोरेखित करणाऱ्या वेगळ्या संस्कृतीची कहाणी मांडणारा हा शब्द. ही आगळीवेगळी कहाणी सांगणारे प्रवासवर्णन.
-
Chandravati Ramayan (चंद्रावती रामायण)
पूर्व बंगालमधील सोळाव्या शतकातील कवयित्री चंद्रावती. लोकसारणीनं तिनं रचलेली काव्यं उत्तरकालीन बंगाली संशोधकांनी परिश्रमपूर्वक अभ्यासली आणि जगासमोर आणली. आता डॉ. माधवी भट यांनी त्या कवयित्रीचा परिचय समग्रतेनं मराठी जगाला करून दिला आहे. यात चंद्रावतीच्या रचनांचा उत्तम अनुवाद तर वाचकांसमोर येतोच, शिवाय बंगाली लोकपरंपरेतले अतिशय गोड असे गीतरचनेचे प्रकारही परिचयाचे होतात. चंद्रावतीचं रामायण हे खरं तर 'सीतायन' आहे. पूर्व बंगालच्या मातीतून वर आलेल्या तिच्या काव्यात तिथल्या लोकगीतांचा दरवळ तर आहेच, पण शतकांच्या स्त्रीमनाचा अतिशय उत्कट असा आविष्कारही आहे. रामायणाचं स्त्रीदृष्टीनं केलेलं हे पुनर्वाचन अत्यंत हृदयस्पर्शी आहे. एका अल्पपरिचित पण सशक्त अशा भारतीय कवयित्रीची सर्वांगीण ओळख मराठी साहित्यविश्वाला करून दिल्याबद्दल डॉ. माधवी भट यांना मनःपूर्वक धन्यवाद. डॉ. अरुणा ढेरे
-
Chirtarun Swar Asha Bhosale (चिरतरुण स्वर अशा भोसले)
भारतीय संगीतसृष्टीतील 'चिरतरुण स्वर' म्हणजे आशा भोसले! एकाच आवाजात आर्त प्रेमगीते, मस्तीभरे डान्स नंबर, गझल, कव्वाली आणि लावणी गाण्याची अफाट क्षमता असलेल्या आशाताईंनी संगीत विश्वावर तब्बल सात दशके राज्य केले。त्यांनी गायलेली हजारो मराठी आणि हिंदी गाणी आजही रसिकमनावर राज्य करत आहेत.
-
Khota Khota pan Khara (खोटं खोटं पण खरं)
वास्तव, जादुई वास्तव आणि अतिवास्तव यांच्या मिश्रणातून ही कथा आकाराला आली आहे .ही कादंबरी सत्य आणि असत्य, प्रत्यक्ष आणि कल्पना, तसेच लेखक आणि त्यांची पात्रं यांच्यातील सीमारेषा पुसून टाकते. यातील कथानकातून मानवी भावनांचा कल्लोळ, भावना आणि कथानकातून बाहेर पडणारी पात्रं, आणि या सगळ्याच्या दोऱ्या आपल्या हातात आहेत असा समज करून घेणारा लेखक, अशा गुंतागुंतीच्या आणि विचारप्रवर्तक गोष्टी मांडल्या आहेत.
-
Vidyatai Ani (विद्याताई आणि)
महाराष्ट्रात महात्मा फुले आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाची पायाभरणी केली. नंतरची पायरी होती स्त्रीयांचं आत्मभान जागृत करण्याची, समाजास स्त्रीप्रश्नांप्रती संवेदनशील बनवण्याची. हे कार्य हाती घेतलेल्यांमध्ये विद्या बाळ यांचं नाव अग्रस्थानी आहे. प्रथम 'स्त्री' आणि नंतर 'मिळून साऱ्याजणी'चं माध्यम वापरून विद्याताईंनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली. संवाद हे विद्याताईंचं बलस्थान. न पटलेल्या रूढी- रिवाजांशा संघर्ष करणं – तो मात्र पटेल अशा शब्दांत ही त्यांची खास शैली. दृढ कृतीचा आग्रह, पण भाषा मात्र अनाग्रही आणि ॠजू. पुरुषप्रधानतेस विरोध दर्शवतानासुद्धा त्या पुरुषांशी संवाद साधण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर स्त्रीमुक्ती चळवळीतील नेमस्त पंथाचं नेतृत्व आपसूक त्यांच्याकडे जातं. पूर्णवेळ गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा विद्याताईंचा प्रवास म्हणजेच विद्याताई आणि..
-
Mi Alladiyakhan (मी अल्लादियाखां)
मरहूम उस्ताद अल्लादिया खांसाहेब जयपूर-अत्रौली घराण्याच्या विद्यमान गायकीचे उद्गाते जणू ‘गायनाचे गौरीशंकर' ! त्यांच्या गायकीच्या आजच्या घडीला कार्यरत वारसदारांपैकी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे सांगत आहेत त्यांची चरितकहाणी. ख्यालगायनाच्या पद्धतीनुसार ‘रागबढत' किंवा ‘उपज' या अंगाने विस्तारत साकारलेली खांसाहेबांची ही जीवनकथा. त्यातून वाचकापुढे उलगडत जातं कधी सौंदर्यपूर्ण, प्रमाणबध्द स्थापत्यासारखं खांसाहेबांचं व्यक्तिमत्त्व, कधी त्यांच्या पारिवारिक आणि गुरुशिष्य नातेसंबंधांचं नाजूक, जरतारी विणकाम. विविध प्रसंगांतून उजागर होतात खांसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या मनोहारी रंगछटा. एखाद्या कादंबरीसारख्या सुरस, रोचक घटनांनी भरलेलं हे खांसाहेबांचं ‘ललित चरित्र' म्हणजे रसिक वाचकांना तसेच अभिजात संगीताच्या साधकांना लाभलेली शब्दमैफिलीची पर्वणी.
-
Sandanvaat (सांदणवाट)
सांदणवाट म्हणजे पळवाट नव्हे अथवा चोरवाटही नव्हे, सांदणवाट म्हणजे वेगळी वाट. आयुष्यात कायम वेगळा मार्ग अस्तित्वात असतो, मात्र तो राजमार्ग नसतो. अशी वेगळी वाट निवडून त्यावर निग्रहाने पावले टाकणे हे एक प्रकारे आव्हानही असते अन् संधीही ! जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही डॉ. पंडित विद्यासागरांनी नंतरच्या आयुष्यात बहुतेक वेळा जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. त्यामुळे वाट्याला आलेल्या विविध अनुभवांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रेरणादायी आत्मकथन
-
Dhulakshare Te Shalyakaushalya (धुळाक्षरे ते शल्यकौशल्य)
त्याच्याजवळ ना पैसा होता, ना कुणाचे पाठबळ. हातावरचे पोट असलेले आईवडील अन् गरिबीच्या उन्हात उभे राहिलेले घर. पण तो फक्त नावापुरता ‘ज्ञानेश्वर' नव्हता. आपल्या बुद्धिमत्तेला त्याने चिकाटीची धार चढवली. विलक्षण जिद्द अन् अभ्यासाच्या सातत्यातून तो प्रख्यात शल्यविशारद झाला. हा अवघड वळणाचा प्रवास सांगणारी एका समर्पित सर्जनची संघर्षकहाणी...
-
Done That Been There (डन दॅट बीन देअर)
हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो ! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'
-
Jeevdan (जीवदान)
त्याने आपल्या आईचा खून होताना पाहिलं. आणि मग त्याने खुन्याला स्वतःच देहांताची शिक्षा दिली. कोण होता तो खुनी ?त्या खुन्याला शिक्षा दिल्यानंतर त्याला बालसुधारगृहात का जावं लागलं ? आपल्या इवल्याशा आयुष्यात काय काय सोसावं लागलं त्याला ! भावनिक आंदोलनं आणि मनोव्यापार यांची धक्कादायक कहाणी साकारणारी शोकांतिका