-
Thembe Thembe (थेंबे थेंबे)
महिला बचत गट. अधून-मधून कानावर येणारे शब्द. पण त्यांची सुरुवात, प्रसार, उपयुक्तता अशा तपशिलाच्या खोलात बाहेरचं फारसं कुणी जात नाही. फार फार तर ‘चटण्या-मसाले बनवणाऱ्या बायका’ एवढ्यावर बोळवण होते, किंवा ‘बायका बायका जमून काही करताहेत, तर करू द्या,’ इतपत उदारपणा दाखवला जातो! ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण तशी खूप जुनी. पण तिला नवा अर्थ दिला, तो बचत गटातल्या गरीब पण होतकरू व धडपडणाऱ्या महिलांनीच. ग्रामीण स्त्रियांनी रुपया रुपया जिवापाड वाचवून बचत गटात घातला; तर तो वाढतो, वेळेला उपयोगी पडतो आणि बाईचा आत्मसन्मानही वाढवतो… महिला बचत गटातून विधायक आर्थिक बदल घडवणाऱ्या सभासद बायका, त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या व्यक्ती-संस्था आणि शासनाच्या सकारात्मक योजना या सगळ्यांची वाटचाल जिव्हाळ्यानं पाहायचा हा प्रयत्न. महिला बचत गटांच्या प्रवासाचा नि फलितांचा लेखाजोखाच जणू!
-
Rohini Niranjani (रोहिणी निरंजनी)
ज्या भूभागात यापूर्वी कधीही नृत्य नव्हतं, तिथे भगीरथ प्रयत्नांनी कथकनृत्य प्रस्थापित-प्रतिष्ठित करणाऱ्या, परंपरेची, अभिजाततेची मूल्यं उजागर करणाऱ्या, पारंपरिक कथक नृत्यकलेला कालसमांतर आशयाची संपन्नता बहाल करणाऱ्या रोहिणीताईंनी कलेचं उच्च स्तरावरचं व्यापक, सखोल, सौंदर्यशाली वैभव दाखवलं. ‘जाणिजे यज्ञकर्म’ या भावनेनं हा नृत्ययज्ञ त्यांनी आयुष्यभर श्रद्धापूर्वक केला. भावसमृद्ध, ज्ञानवंत अशा व्युत्पन्नमती कलाकार, श्रेष्ठ गुरू, दूरदृष्टीच्या संस्थाचालक, कलामाध्यमाची साधना करणाऱ्या विचारवंत, संगीतरचनाकार, वाग्गेयकार, लेखिका, विद्यापीठीय चर्चेत नृत्यशिक्षण व नृत्यविचार यांचा समावेश करणाऱ्या अॅकॅडेमेशियन – अशा परिपूर्ण कलाकार – ‘टोटल आर्टिस्ट’- रोहिणी भाटे यांचं नृत्यक्षेत्रातील योगदानही स्वाभाविकच बहुआयामी, विविधरंगी ! त्यांच्या प्रातिभ कलाजीवनाचा वेधक पट म्हणजे
-
Ashwini-Tu Nahis Tarihi Ahes (अश्विनी:तु नाहीस तरी
आयुष्य जगण्यालायक बनतं ते कशामुळे? आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे, मोलाचे घटक कोणते? प्रत्येक श्वासाची किंमत काय असते? संपूर्ण शांतता हीसुद्धा हजारो शब्दांइतकी बोलकी कशी असू शकते? खऱ्या प्रेमापोटी कोणताही उद्देश नसतो. एकत्र, एकजीव असणं हे मूल्य, देवाणघेवाणीच्या पुष्कळच वर असतं. हे तुझं – हे माझं याच्यापलीकडे आपण आपलं अस्तित्व दुसऱ्याच्या नावे लिहिण्याची हद्द सुरू होते. आपल्या माणसाची काळजी करणं, काळजी घेणं हे शब्दातीत असतं. स्वार्थ सोडण्याची सीमा एवढी विस्तारता येते की, एका क्षणी तुमचं असं वेगळं अस्तित्वच शिल्लक उरत नाही… अशा एक ना अनेक सत्यांची जितीजागती अनुभूती येण्याचा तो कालखंड होता!
-
Pruthvicha Aakhyan (Pruthvicha Aakhyan)
मानवानं निसर्गाच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे. आणि हे आत्मघातकी आहे. प्रक्षुब्द्ध झालेला निसर्ग निकरानं परतीचा प्रबळ हल्ला करत आहे. पाणथळ जागा संपत चालल्या असून वाळवंटं वाढत आहेत. अरण्यतोड थांबत नाही. जैवविविधता कोसळत आहे. दहा लाख प्रजाती समूळ उच्चाटनाच्या धोक्यात आहेत. सर्व महासागर प्लॅस्टिकने तुंबून जात आहेत. आपल्या डोळ्यांदेखत पर्यावरणीय यंत्रणा नष्ट होत आहेत. सध्या जग कडेलोटाच्या बिंदूवर येऊन ठेपलं आहे. सध्या चालू असलेल्या ह्या बहुविध अराजकाला मानवी कृत्येच जबाबदार आहेत. याचा अर्थ मानवी कृतीच त्यांना रोखू शकते. आणि त्यासाठी हे दशक निर्णायक ठरणार आहे. माणसाने चालवलेले अनन्वित अत्याचार झेलणाऱ्या
-
Ladhat - Bhag 2 (लढत - खंड २)
महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने आज डेरेदार वटवृक्षाचा नेत्रदीपक आकार घेतला आहे. सहकाराच्या कडव्या विरोधकांनाही हे मान्य करण्यावाचून आज गत्यंतर उरलेले नाही. या सर्वदूर प्रगतीमागील मूलभूत तत्त्वज्ञानाचा शोध-बोध घेण्यासाठी आज जपान, इस्राएल, आफ्रिका येथील शिष्टमंडळे महाराष्ट्रात उतरताहेत. वारणानगर, अकलूज, कोल्हापूर, इचलकरंजी व प्रवरानगर अशा येथील अनेक सशक्त सहकारी केंद्रांना ही शिष्टमंडळे अभ्यासू वृत्तीने भेटी देताहेत. सहकाराची डोळस कास धरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाने निःसंशयपणे शेकडो वर्षांची एक कळकट कात आता टाकली आहे. अद्याप खूप वाटचाल तर करावयाची आहेच. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या व कष्टकऱ्याच्या खडतर जीवनमानाला पत व अर्थ प्राप्त करून देणाऱ्या या सहकारी वटवृक्षाचे बीजारोपण इ. स. १८९७ सालीच, ऐन पारतंत्र्याच्या अंधारयुगातच झाले! त्या वर्षीच, भारतातीलच नव्हे, तर अखिल आशियातील सर्वसामान्यांचा पहिला सहकारी साखरकारखाना उठविणारा सहकाराचा सच्चा, जिद्दी, क्रियाशील व अपार कष्टाळू उद्गता जन्माला आला. कोठे? तर बुद्रुक लोणी या सर्वस्वी आडगावात! कोण? महाराष्ट्रात गेल्या पिढीत घडून गेलेल्या आर्थिक आघाडीवरच्या एका अटीतटीच्या, चिवट व अंती यशमय झालेल्या ‘लढती’चा हा ललितसमृद्ध मागोवा! वातावरण, बोली-भाषा, व्यक्तिरेखांकन यांचा शिवाजी सावंत यांनी खास आपल्या शैलीत घेतलेला हद्य असा एक शोध-बोध.
-
Ladhat Bhag-1 (लढत - खंड १)
महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने आज डेरेदार वटवृक्षाचा नेत्रदीपक आकार घेतला आहे. सहकाराच्या कडव्या विरोधकांनाही हे मान्य करण्यावाचून आज गत्यंतर उरलेले नाही. या सर्वदूर प्रगतीमागील मूलभूत तत्त्वज्ञानाचा शोध-बोध घेण्यासाठी आज जपान, इस्राएल, आफ्रिका येथील शिष्टमंडळे महाराष्ट्रात उतरताहेत. वारणानगर, अकलूज, कोल्हापूर, इचलकरंजी व प्रवरानगर अशा येथील अनेक सशक्त सहकारी केंद्रांना ही शिष्टमंडळे अभ्यासू वृत्तीने भेटी देताहेत. सहकाराची डोळस कास धरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाने निःसंशयपणे शेकडो वर्षांची एक कळकट कात आता टाकली आहे. अद्याप खूप वाटचाल तर करावयाची आहेच. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या व कष्टकऱ्याच्या खडतर जीवनमानाला पत व अर्थ प्राप्त करून देणाऱ्या या सहकारी वटवृक्षाचे बीजारोपण इ. स. १८९७ सालीच, ऐन पारतंत्र्याच्या अंधारयुगातच झाले! त्या वर्षीच, भारतातीलच नव्हे, तर अखिल आशियातील सर्वसामान्यांचा पहिला सहकारी साखरकारखाना उठविणारा सहकाराचा सच्चा, जिद्दी, क्रियाशील व अपार कष्टाळू उद्गता जन्माला आला. कोठे? तर बुद्रुक लोणी या सर्वस्वी आडगावात! कोण? महाराष्ट्रात गेल्या पिढीत घडून गेलेल्या आर्थिक आघाडीवरच्या एका अटीतटीच्या, चिवट व अंती यशमय झालेल्या ‘लढती’चा हा ललितसमृद्ध मागोवा! वातावरण, बोली-भाषा, व्यक्तिरेखांकन यांचा शिवाजी सावंत यांनी खास आपल्या शैलीत घेतलेला हद्य असा एक शोध-बोध.
-
Zengat (झेंगट)
अजिंक्य मोहिते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी छोट्या गावातून मोठ्या शहरात आलेला तरुण. शहरातल्या प्रसिद्ध कृषिमहाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून पदवी प्राप्त करेपर्यंतचा अजिंक्यचा प्रवास. त्या प्रवासात त्याला भेटलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या व्यक्तिरेखा. प्रत्यक्ष जीवनाशी सांधेजोड नसलेली आपली वर्तमान शिक्षणपद्धती आणि तिचे वेगवेगळे भलेबुरे पैलू. अजिंक्यच्या रोजच्या आयुष्याला अन् त्यातील लहानमोठ्या घटनांना असलेलं सामाजिक अन् राजकीय अस्तर. या साऱ्याचा रंगीबेरंगी गोफ विणणारं प्रवाही चित्रण म्हणजे ही कादंबरी. एका संवेदनशील तरुणाच्या भावविश्वाचा टोकदार अन् धारदार वेध घेणाऱ्या दोन कादंबऱ्यांच्या मालिकेतील पहिली कादंबरी.
-
Vikasit Bharat Amerikee kee Adhyaatmik (विकसित भा
विकासा’चे दोन मार्ग आहेत. पहिला आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आधारे उत्पादन आणि उपभोग यामध्ये सातत्यानं करण्याच्या वाढीचा. ह्या ‘अमेरिकी’ मार्गाचे तीन पुरस्कर्ते : सावरकर, नेहरू आणि कलाम. दुसरा मार्ग आहे, तो उत्पादन आणि उपभोग ह्यांचं मान इष्टतम ठेवून, आंतरिक विकासावर भर देणारा. ह्या ‘आध्यात्मिक’ मार्गाचे चार पुरस्कर्ते : विवेकानंद, गांधी, विनोबा आणि अरविंद. पहिला मार्ग ‘विकासा’चा नाहीच. तो मानवासह सृष्टीला विनाशाकडे नेतो. त्यामुळे, भारताची वाटचाल दुसऱ्या मार्गानंच झाली पाहिजे. वरील सात जणांच्या विकासविषयक विचारांचं खंडनमंडन करत, भारताच्या भावी विकासाच्या वाटेचा शोध घेणारा; चार दशकांच्या अखंड चिंतनातून साकारलेला ग्रंथ.
-
Dastaan e DilipKumar (दास्तान - ए - दिलीपकुमार)
दिलीपकुमार म्हणजे ‘शहजादा सलीम’. दिलीपकुमार म्हणजे ‘राम और शाम’. दिलीपकुमार म्हणजे ‘गंगा’. दिलीपकुमार म्हणजे ‘देवदास’ आणि ‘आझाद’ही. दिलीपकुमार म्हणजे असे अनेक नायक, अशा अनेक व्यक्तिरेखा. अभिनयाचा मानदंड प्रस्थापित करणारा हा अभिनेता केवळ त्याच्या चित्रपटांपुरता अन् त्याच्या भूमिकांपुरता उरला नाही. त्याच्या प्रत्येक भूमिकेत लसलसत होते भविष्यातल्या अभिनयाचे कोंब. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत हिंदी सिनेमात वावरणाऱ्या कैक कलावंतांच्या अभिनयाला जीवनरस पुरवणारा जिवंत झरा म्हणजे दिलीपकुमार. स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारताचं प्रतिनिधित्व करणारं सर्वांगसमृद्ध सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीपकुमार. अभिनयाच्या क्षेत्रात ‘दिलीपकुमारपूर्वी’ आणि ‘दिलीपकुमारनंतर’ असे कालखंड प्रस्थापित करणाऱ्या या प्रतिभावान कलावंताची नवरसांनी भरलेली चरितकहाणी.
-
Katha Tyanchya Vaktrutvachi (कथा त्यांच्या वक्तृत्
अत्रे, पु.ल., पुरंदरे, भोसले आणि शेवाळकर हे मराठी वक्तृत्वाचे मानदंड! ही सारी वक्तृत्वशिखरेच; पण एक शिखर दुसऱ्यासारखे नाही – हे या शिखरांचे वैशिष्ट्य. प्रत्येकाची वक्तृत्वशैली निराळी, विचारप्रतिपादनाची रीत निराळी, आपल्या शब्दश्रीमंतीतून माय मराठीला ऐश्वर्य प्रदान करण्याचा बाज निराळा आणि हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा वशीकरण मंत्रही वेगळाच. या वाणीच्या उपासकांनी वाग्देवतेच्या गाभाऱ्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. रसिक अन् चोखंदळ श्रोत्यांनीही आपल्या हृदयसिंहासनावर त्यांना दिले अढळपद. या पाच वक्तृत्वशिखरांचे विहंगम दर्शन
-
Roby Disilvha Eka Manasvi Kalakaracha Pravas (रॉबी
अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला, मिलान (इटली)च्या स्टुडिओ बोजेरीनं आणि लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं सन्मानानं बोलावून घेतलेला पहिला आणि एकमेव भारतीय डिझायनर. इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीनं सन्मानित झालेला एकमेव आशियाई. यानं भारतात पॅकेजिंग डिझाइन प्रथम आणलं. इंडस्ट्रिअल डिझाइनची सुरुवात केली. ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास घेतला. कला-विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं… 1960चं दशक सरताना रॉबी डिसिल्वा भारतात परतले, तेव्हा ते इथल्या डिझाइन क्षेत्राच्या वीस-पंचवीस वर्षं पुढेच होते.