-
Mayajaal (मायाजाल)
डॉ. जयंत नारळीकर म्हणजे एक बहुआयामी प्रतिभावान व्यक्तिमत्त्व, त्यांचे एक रूप विश्वाचा वेध घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाचे. तर दुसरे रूप किशोरवयीन मुला-मुलींना विज्ञानातील संकल्पना हसतखेळत शिकवणाऱ्या आणि विविध कथांमधून त्यांना रमवत रिझवत अनोख्या जगाची सफर घडवणाऱ्या विज्ञानलेखकाचे. डॉ. जयंत नारळीकरांच्या प्रतिभाविलासातून उमललेल्या सात बहुरंगी कथांचे इंद्रजाल
-
Gawaee (गावई)
गाव म्हणजे जमिनीवरचं एखादं ठिकाण नाही. गावाला गावपण येतं ते इथल्या नांदत्या माणसांमुळे. माणसं आहेत म्हणून गाव आहे. त्यांनी गाव सोडलं की, गाव ‘उठलं’. मग उरते ती फक्त जमीन. ‘गावई’ ही अशाच एका गावाची कथा. आभाळाच्या कोपाला सामोरं जात, आपली संस्कृती जपत तगण्याचा हे गाव प्रयत्न करतंय. मात्र शहर आणि खेडी यात सरकारनं राबवलेली धोरणं, खेड्यातल्यांचं अज्ञान, अज्ञानामुळं होणारं शोषण आदी गोष्टींमुळं ही ग्रामसंस्कृती शेवटची घटका मोजत आहे. गावं ‘उठत’ आहेत म्हणजेच होत आहे.
-
Dharankala (धरणकळा)
मूठभर धान्य पेरावं तर मालकीची जमीन नाही. तरीही आम्ही गाववाले. भुमिपुत्र। आमचा गाव. आमचा देव. आम्ही पाटील, आम्ही देशमुख. दारूच्या नादात बडेजाव. ‘जवळ नाही आटा अन् टेरीला उटणं वाटा’ अशी गत. भैताडांना हे कळंना की कुठं राहिलाय तुमचा गाव ? गैबान्यांनो, होतं ते विकून बसलात, आता पार्टीच्या जिवावर उड्या मारताय, त्यांच्या हातचं बाहुलं झालाय. उद्या खेळ संपेल. बाहुलं फेकलं जाईल. पार सांदी कोपऱ्यात! तुम्हाला या मातीत पाय ठेवता येणार नाही. आज पार्टीवाला देवाचा भंडारा करतोय. पैसा देतोय. उद्या तो तुमच्या देवालाही जुमानणार नाही.
-
Raimuniya (रायमुनिया)
लहानपणी सुट्टीमध्ये जंगलात केलेली भटकंती. नोकरीनिमित्त धरणपरिसरातील विश्रामगृहातील एकांत. अशा रानवाटांवर अन् डोंगरदऱ्यांमध्ये रमताना सुचलेल्या या कथा म्हणजे जणू रानमेवाच. करवंद, जांभळं अन् टणटणीच्या झुडपांना येणारी- सुभग, चिमण्या अन् मुनियासारख्या रानपाखरांसाठी असणारी – ही रानमेव्याची फळं म्हणजेच – रायमुनिया