-
Bai Ga (बाय गं)
बाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... ‘बाय गं...’ या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - शेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी..... बाय गं.
-
Pyasa (प्यासा)
सुधीर नांदगावकर यांचे हे पुस्तक म्हणजे गुरुदत्तवरील त्यांच्या प्रेमाचा एक उत्कट आविष्कार ! गुरुदत्तच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या घरी पोहोचलेल्या मोजक्या पत्रकारांत नांदगावकरही होते. त्यावेळी झालेल्या चर्चा, पत्रकार म्हणून कळलेल्या काही आतल्या गोष्टी आणि गुरुदत्तविषयीचा अपार आदर यांमुळे ‘गुरुदत्तने आत्महत्या केली’ यावर नांदगावकरांचा विश्वास कधीच बसला नव्हता... सुधीर नांदगावकर यांनी या पुस्तकाच्या लेखनासाठी विशेष प्रयत्नांनी माहिती गोळा केली आहे. ‘चरित्र-कादंबरी-जीवनप्रवास’ असा एक संमिश्र घाट स्वीकारला आहे. गुरुदत्तच्या आयुष्यातल्या एरवी फार लिहिल्या-बोलल्या न गेलेल्या घटनांचे तपशील, त्याच्या जगण्याचे, चित्रपटनिर्मितीचे, विचारप्रकियेचे काही नवे पैलू आपल्याला कळतात. आपल्या ओळखीचे चित्रपट, गाणी यांचा जन्म कसा झाला, या माहितीत आपण गुंतत जातो आणि अनेकदा तर त्या घटनांचे आपण जणू प्रत्यक्ष साक्षीदार आहोत, असे आपल्याला वाटत राहते... श्रीकांत बोजेवार
-
Abhishekee Pandit Jitendra (अभिषेकी पंडित जितेंद्र
पं. जितेंद्र अभिषेकी. शिष्य, मैफलगायक, संगीतकार आणि गुरू ही त्यांची संगीतविश्वातील चार रूपं. स्वत:च स्वत:च्या तत्त्वांशी, ध्येयांशी, उद्दिष्टांशी स्पर्धा करत पराकोटीच्या तन्मयतेनं एकाच वेळी साकारलेल्या या चार भूमिका! त्यात आपण अव्वलच असलं पाहिजे, ही त्यांची आंतरिक उर्मी! त्यामुळे असेल, आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळं काही करण्याचा अट्टाहास त्यांनी केला नाही; पण आपोआप खूप काही वेगळं घडत गेलं. त्याविषयी संगीतवर्तुळात कौतुक होतं, कुतूहल होतं. पं. जसराजजी म्हणत असत, `उस शिष्य का क्या कहना कि जिनके गाने पे उनके गुरुही हजार जान से फिदा हों।' तर पं. भीमसेन जोशींचा अनुभव होता, `पं. जितेंद्र अभिषेकी हे रसिकांची मागणी असलेले कलाकार आहेत. त्यांच्याविषयी रसिकांच्या मनात एक वेगळं आकर्षण आहे.' ज्येष्ठ गायक-संगीतकार सुधीर फडके यांना बुवांच्या चालींमध्ये त्यांचं प्रतिभासंपन्न समृद्ध व्यक्तिमत्त्व दिसत असे, `मीच काय, अनेक कीर्तिवंत संगीतकारांनी अभ्यास करावा, अशा त्यांच्या नाट्यसंगीतरचना आहेत.' ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री ज्योत्स्नाबाई भोळे यांनी आपल्या गोव्याच्या गंपूची जडणघडण, त्याचा उत्कर्ष जवळून पाहिला होता. बुवांना गंपू म्हण-यांपैकी ज्योत्स्नाबाई एक होत्या. `खूप मोठी शिष्यपरंपरा एका विशिष्ट पद्धतीनं निर्माण करण्याचं फार मोठं श्रेय जितेंद्रला आहे.' अशा या प्रतिभावान, चतुरस्र कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा अन् संगीतकर्तृत्वाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ.
-
Punashcha Honeymoon (पुनश्च हनिमून)
पुनश्च हनिमून एका लांबलेल्या आत्महत्येचा प्रवास. आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील मध्यमवर्गीय, चाळिशीतील जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील वैचारिक विसंवादाची जीवघेणी आंदोलने या दोन तासांच्या नाट्यप्रयोगात आहेत. ही आंदोलने आषाढातील भरलेले आकाश अधिक झाकोळून टाकतात. हे काही अवखळ करमणुकीचे नाटक नाही. सध्याच्या जगण्यातील विखंडतेवर हे नाटक सतत भाष्य करते. जगण्यातील अपरिहार्यता, स्त्री-पुरुष लग्नसंबंधांची सार्थकता, अर्थपूर्णता आणि कालौघातील निरर्थकता, त्यातील भाव-विषता यांच्या रंगमंचीय खेळाचे गारूड नाटक संपल्यावरही आपल्याबरोबर येते. वरकरणी मस्त चाललेल्या लग्नसंसाराच्या अंतर्मनाचे हे रंगमंचीय धिंडवडे आहेत. अशा नाटकाला सुरुवात असते, पण शेवट असतोच असे नाही. तो प्रत्येकानी आपापला समजून घ्यायचा असतो. सतीश आळेकर
-
TV Malika Ani Barach Kaahi (टीव्ही, मालिका आणि
टीव्हीविषयी माझ्या मनात प्रचंड कृतज्ञता आहे. ह्या क्षेत्रानं असंख्य कलावंत मित्रमैत्रिणींना सन्मान आणि सुबत्ता मिळवून दिलीय. अहोरात्र चालणारी ही करमणुकीची यंत्रणा मुग्धा या पुस्तकातून आपल्याला समजावून सांगते. ती आरोपीचा वकील अजिबात होत नाही. ह्या क्षेत्राला कमी लेखणाऱ्यांना ती दूषणं देत नाही. प्रत्येक लेखातून उलगडत जाते मालिका - खिंड लढवणाऱ्या कित्येकांच्या मेहनतीची गोष्ट. मुग्धाच्या पुस्तकाची सफर अत्यावश्यक आहे. कारण ९०% घरांमध्ये टीव्ही आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका विश्वात कुतुहलानं वावरत असल्यापासून मी मुग्धाला ओळखते. तिचं मोहक व्यक्तिमत्त्व बघता ती अभिनयक्षेत्रात रमणार, ही अटकळ मनाशी बांधणं सोपं होतं. पण पुढे मुंबईत स्थिरावताना तिनं मालिकांचं लेखन सुरू केलं आणि आज ती त्यातही यशस्वी आहे. मुग्धा तिच्या प्रवासात सजगपणे चालत राहिली. स्वत:च्या प्रवासाकडे ती प्रांजळपणे पाहू शकतेय. आता त्यातले बारकावे ती आपल्यासाठी खुले करतेय. अभ्यासू तरी रंजक अशी ही शोधकथा मनोरंजनासाठी आसुसलेल्या असंख्य प्रेक्षकांसाठी मोलाची ठरणार आहे. -- सोनाली कुलकर्णी
-
Cyber Attack(सायबर ॲटॅक)
बिनचेहऱ्याच्या व्यक्तीने फेकलेले जाळे आणि त्याला लावलेली वेगवेगळी आमिषे. अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षितांपर्यंत अनेकजण यात सहजपणे अडकतात. लोन फ्रॉड, एटीएम क्लोन, ऑनलाईन गेमिंग, घसघशीत उत्पन्नाची लालूच दाखवणारे प्रीपेड टास्क, कार्ड फ्रॉड, फिशिंग, इन्व्हॉईस फ्रॉड... एक ना दोन, अनेक प्रकार. सायबर फ्रॉड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बनवाबनवीत आपले बँकखाते एका झटक्यात रिते होते. मोबाईलवरून किंवा सोशल मीडियातून मिठ्ठास संवाद साधून अनेकांना जाळ्यात अडकवणाऱ्या या ठकसेनांपासून स्वत:चा बचाव करायचा एकच मार्ग - सजग राहणे, या जाळ्यात न अडकणे. त्यासाठीच हे पुस्तक वाचायचे आणि त्यामधून योग्य ते धडे घ्यायचे, सावधपणे पुढच्या हाका आधीच ऐकायच्या ! आधुनिक तंत्रज्ञानाच्या मोहक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा दाखवणारे - सायबर गुन्ह्यांबाबत सर्वांना सतर्क बनवणारे
-
-
Jyacha Tyacha Everest (ज्याचं त्यांचं एव्हरेस्ट )
ज्याचं त्यांचं एव्हरेस्ट हिमालय अनेकांना वेड लावतो . का? कसं ? एव्हरेस्ट सारखं अत्युच्च शिखर सर केल्यानंतरही गिर्यारोहकांची पावलं पुनःपुन्हा हिमालयाकडे का वळतात ? सत्य घटनेवर आधारित कादंबरी!
-
Savashna(सवाष्ण)
लाकडी नक्षीकामानं सजलेल्या, पण आता जीर्ण झालेल्या ऐसपैस दरवाजात, त्या वाड्याच्या उंबऱ्यात पाऊल घोटाळतंय. इथल्या घरधनिणीनं सालंकृत पावलांनी इथेच माप ओलांडलं असेल का? अंगणानं ओंजळीत रांगोळीची नक्षी घेऊन वाट पाहिली असेल का त्या मंगल क्षणाची...? आता तो सगळा दिमाख ओसरलाय... कोनाड्यातलं देवघर... आत डोकावलं तर मिणमिणत्या उजेडात आश्वस्त करणारी पितळी मूर्त कुणाची? अंधाऱ्या जिन्यातून जाताना वाटलं, कितीतरी पैंजण आपल्या स्वारींची वाट पाहत अगतिक थांबले असतील का? मोठ्ठा चौक. त्यात एक तोंडापर्यंत पुरलेला रांजण. त्यातल्या अंधाराच्या पोटात हरवलेत का या वाड्यातले चैतन्यस्वर? का? काय घडलं असं? मनाला साखळदंडासारखे लोंबकळत असलेले अनुत्तरित प्रश्न. त्यांचं ओझं घेऊन मला निघावं लागतंय. कधी होईल का या रहस्यांचा उलगडा? माझ्या प्रश्नांची कालकुपीत दडलेली उत्तरं, इतिहासपुरुषा, तुला माहीत असतील का रे?
-
Made In China(मेड इन चायना)
आपला शेजार आपल्याला बदलता येत नाही. गेली अनेक शतकं आपला शेजारी असलेल्या चीनबरोबरचे आपले संबंध विलक्षण गुंतागुंतीचे. विशेषत: माओंच्या कारकिर्दीत झालेल्या १९६२ च्या युद्धानंतर हे संबंध चांगलेच ताणले गेले. वास्तविक आजचा चीन आणि माओंचा चीन यात जमीन - अस्मानाचा फरक. साम्यवादाचं नाव लावणाऱ्या चीनमध्ये आज प्रत्यक्षात प्रारूप आहे ‘नियंत्रित-भांडवलशाही’चं. चीन जितका आधुनिक, तितकाच ऐतिहासिकही. आधुनिकतेच्या महामार्गावर वेगाने पुढे जाताना एखाद्या वळणावर आपली प्राचीनता सोडून द्यावी, असं चीनच्या कोणत्याही सत्ताधीशाला वाटलेलं नाही, मग ते माओ असोत, डेंग असोत वा आजचे क्षी जिनपिंग. हे असे विसंवाद वागवत वागवत पुढे जाणं हे चीनच्या रक्तातच असावं. आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा- चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित करणारं विलक्षण चिनी प्रारूप समजावून देणारं
-
Inka Chi Devdari (इंका ची देवदरी)
इंका संस्कृती : गूढ, रहस्यमय, अनाकलनीय.दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे पाचशे वर्षांचे साम्राज्य. स्वत:ला सूर्यपुत्र समजणारी, निसर्गाला देव मानणारी, सोन्याचांदीच्या ढिगामध्ये लोळणारी, दोNयाच्या गाठी मारून संदेश पाठवणारी,शेकडो टनांचे पाषाणखंड कापून अगम्य, अवाढव्य बांधकामे करणारी.पंधराव्या शतकात स्पॅनिश आक्रमकांनी इंका साम्राज्य धुळीस मिळवले, नंतरच्या चारशे वषांत इंका संस्कृती हळूहळू नष्ट झाली.पण एके दिवशी स्पॅनिशांच्या तावडीतून वाचलेले इंकांचे ‘गुप्त’ शहर सापडले –‘माचूपिच्चू’ !अवघे विश्व चकित झाले, पाषाणखंड हळूहळू बोलके झाले,‘इंका’चा सप्तरंगी झेंडा गौरवाने आकाशात फडकायला लागला,सोने लुटून संपले होते, पण अजस्र पाषाणखंडांना सोन्याचे मोल आले,त्याचीच ही कहाणी
-
New Zealand Sathi Bharat Sodtana (न्यूझीलंडसाठी भा
न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या खूपच कमी असल्यामुळे न्यूझीलंड सरकारने परदेशी नागरिकांना स्थलांतरासाठी त्यांचे दरवाजे खुले केले. त्यामुळे गेल्या ५/६ वर्षांत भारतीयांचा ओघ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम आशियामधल्या देशांऐवजी न्यूझीलंडकडे वळला. न्यूझीलंडला स्थलांतर करण्याचा विचार करणा-यांना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत मदत म्हणून व ज्यांचा हा निर्णय पक्का झाला आहे, त्यांना प्रस्थानापूर्वीची पूर्वतयारी म्हणून, हे पुस्तक खचितच उपयुक्त ठरेल.
-
Aale Vartan Aapla Mendu(आपले वर्तन आपला मेंदू )
आपल्या मेंदूवर अवलंबून असते आपले वर्तन आणि आपल्या वर्तनाने आपला मेंदूही बदलू शकतो. मानवी वर्तन अनेक चलपदांवर (variables) आधारित असते. त्यातील सर्वांत महत्त्वाची चलपदे म्हणजे भावभावना. या अमूर्त भावभावना कोट्यवधी वर्षे उत्क्रांत झाल्या आहेत. अशा अमूर्त गोष्टींचा शोधविचार तत्त्वज्ञान, धर्म, ईश्वरशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, कला या सर्वांनी केला आहे आणि करतही आहेत. अलीकडच्या काळात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी वर्तनावर प्रकाश टाकण्याचे काम विज्ञानानेही अंगावर घेतले आहे. विज्ञानाच्या या शाखेला वर्तनविज्ञान (Ethology) म्हणतात. जसजसा मेंदूविज्ञानाचा आणि त्याला पूरक व पोषक जैवतंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसतसा संशोधनाचा दिशाकोन बदलत गेला. मानवी भावभावनांची आणि पर्यायाने मानवी वर्तनाची पाळेमुळे मेंदूत असली पाहिजेत, या विज्ञानाच्या विचारधारेला बळकटी आली. मेंदूविज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणारे आपले वर्तन आपला मेंदू
-
Priy Palak (प्रिय पालक)
मुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ! मुलांना स्वत:ची मतं पुâटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम पुâटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा? प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...
-
Bandivan (बंदिवान)
नजरवैâदेत जन्म. बिनखिडकीच्या छोट्याशा खोलीत वावर. छतावरच्या काचेच्या कौलातून दिसणारा आकाशाचा तुकडा - एवढेच बाह्यजगताचे दर्शन. पळवून, अज्ञातवासात ठेवलेली तरुण आई - एवढीच काय ती साथ-संगत. टी.व्ही.वर दिसणाNया वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी ह्या केवळ पडद्यावरच्या काल्पनिक गोष्टी - हीच दृढ समजूत. ...पण एक दिवस अचानक, आपल्या वापरातल्या वस्तू टी.व्ही.वरपण दिसतात, हे या पाच वर्षांच्या बंदिवानाला कळते आणि... त्याचे भावविश्व उलटे-पालटे होते. त्याची बंदिवान आई हादरते आणि निर्धार करते... आता काहीही करून येथून निसटायचेच... त्यांच्या नजरवैâदेची व्यथा आणि सुटकेची वास्तवकथा म्हणजे बंदिवान पण पाच वर्षांच्या मुलाच्या नजरेतून उलगडणारी!
-
Kahur Eka Vadalache (काहूर एका वादळाचे)
ही कादंबरी वर्तमान राजकारणाच्या वास्तवाला सोलून काढते. स्वातंत्र्योत्तर राजकारण स्वप्नाळू होते, पण विषाक्त नव्हते. विद्यमान राजकारण हे जातीजातींत, धर्माधर्मांत तंटे-बखेडे निर्माण करणारे आणि अराजकतेच्या दिशेने वेगाने जाणारे आहे. त्यामुळे देश अन् समाजाच्या एकसंधतेला तडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असे राजकारण भयावह होण्याची शक्यता बळावते. अभिव्यक्ती अन् मतस्वातंत्र्य नाकारले जाणे, ही हुकूमशाहीच्या पावलांची नांदी असू शकते. राजकुमार बडोले यांनी विद्यमान राजकीय पट सिद्धहस्त लेखकाच्या प्रज्ञेने मांडला आहे. प्रज्ञावंत हा जुलमी व्यवस्थेचा कधीही बटीक नसतो. मानवाच्या मुक्तीचे हुंकार त्याच्या अभिव्यक्तीत असतात. मानवी प्रतिष्ठेची जोपासना ही त्याची अभिलाषा असते. मनुष्याचे स्वयंभूत्व ही त्याची प्रार्थना असते. ही कादंबरी मानवमुक्तीचा गजर करते. राजकुमार बडोले यांनी प्रत्यक्षपणे अनुभवलेले सत्ताकारण आणि सामान्य माणसाला जाणवणारी भारतीय व महाराष्ट्रीय राजकारणाविषयीची संवेदनशून्यता ठसठशीतपणे या कादंबरीतून व्यक्त होते. डॉ. ऋषीकेश कांबळे
-
So Cool Tek 2 (सो कूल टेक २)
सोनाली कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आहे.. या विधानानंतर स्वल्पविराम येत नाही, अर्धविराम किंवा पूर्णविरामही नाही.. येतात ती दोन टिंबं.. दोन टिंबं ही सोनालीची नुसती लेखनशैली नाही, तर ओळख आहे ! तिच्या लिखाणाला पूर्णविराम फारसे मंजूर नसावेत.. म्हणूनच पाठोपाठ दुसरं टिंब येत असावं.. पुढे नेणारं ! दोन टिंबांमधूनही तिला काहीतरी सांगायचं असतं.. सोनाली उघड्या डोळ्यांनी जग पाहताना माणसांना वाचते आणि शब्दांतून त्यांची व्यक्तिचित्रं रेखाटते. तिची अक्षरं वाचकांशी बोलतात.. त्या अक्षरांना लेन्स असते आणि वाचाही ! अशा संवेदनशील आणि संवादोत्सुक अभिनेत्रीला रंगभूमीवर आणि पडद्यावर पाहण्या-ऐकण्याएवढंच ‘वाचणं'ही किती लोभस असू शकतं, याचं उदाहरण म्हणजे सो कुल टेक 2
-
Seeta (सीता)
सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण र्मूिच्छत पडल्यावर - या साNया महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा मोह कारणीभूत ठरला, असं वाटून ‘पार्वतीमाते, एक वेळ मला श्रीरामाच्या आयुष्यातून वजा कर, पण लक्ष्मणाचे प्राण वाचव...' असा विलाप करणारी सीता... खरंच, कशी होती सीता? विचारी आणि खंबीर? की हतबल आणि भावुक? नियतीची बळी ही सीतेबद्दलची धारणा खरी, की रामरक्षेतलं तिचं ‘सीताशक्ति:' हे रूप खरं? महर्षी वाल्मिकींनी चितारलेल्या सीतेच्या विविध प्रतिमांचा समृद्ध वेध घेणारी अभिराम भडकमकर यांची कादंबरी
-
Kalokhatun Ujedakade (काळोखातून उजेडाकडे)
इंजिनीयर होण्याची महत्त्वाकांक्षा पुरी करण्याची जिद्द. तत्त्वांशी तडजोड न करण्याची सचोटी. मिंधेपणा अव्हेरणारा स्वाभिमान. या बळावरच त्यांनी लढा दिला व्यवस्थेतील भ्रष्ट मानसिकतेविरुद्ध. आजही ही लढाई सुरूच आहे. आपल्या सहप्रवाशांच्या सहकार्याने ही भ्रष्ट मानसिकता कधी ना कधी नष्ट होईल, असा आशावाद जागवणारे आत्मकथन.
-
Fakiri Ek Anghad Pravas (फकिरी एक अनघड प्रवास)
पडल्या - झडलेल्या आणि तुटक्या फाटक्या माणसाला अडचणीतून मार्ग दाखवण्यासाठी दिशाहीन वा नाउमेद झालेल्या तरुणाईला पुढे चालावेसे वाटेल, मार्ग निघत जाईल, जीवन बदलत जाईल असा पुढील पिढ्यांना दिलासा मिळेल या विश्वासातून केलेला अनघड प्रवास.
-
Tantra Mukti (तंत्र मुक्ती)
माणूस प्राचीन काळापासून साधी-सोपी-हलकी-श्रमाधारित अशी अनेक तंत्रं जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वापरत आहे. पण अठराव्या शतकातल्या ‘औद्योगिक क्रांती’मुळे ऊर्जांचं अन् त्यामुळे तंत्रांचंही स्वरूप पूर्णपणे पालटलं. त्यांची क्षमता, वेग, आवाका, सफाई, अवजडपणा, गुंतागुंत हे सर्व वाढतच गेलं. केवळ ‘यांत्रिक’ न राहता ती चहू अंगांनी विस्तारली : इतकी की, आज आपल्याभोवती एक ‘तंत्रावरण’ तयार झालेलं आहे. अशा आधुनिक तंत्रांचे अनेकानेक लाभ आपण पावलोपावली आणि क्षणोक्षणी उपभोगतो आहोत. पण, या साNया तांत्रिक प्रगतीची आपण किती भयंकर किंमत मोजतो आहोत ! वास्तव असं आहे की, आधुनिक तंत्रांच्या लाभांपेक्षा, विविध स्तरांवर त्यांच्या बदल्यात मोजाव्या लागणाऱ्या थेट वा अप्रत्यक्ष किमती खूप खूप अधिक आहेत. Homo technicus बनल्यामुळे आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. अशा आधुनिक तंत्रांचं विविध निकषांवर कठोर परीक्षण करून त्यांची घातकता दाखवून देणारं हे पुस्तक : ‘समुचित’ तंत्रांच्या संयमित वापराकडे जाण्याची आवश्यकता प्रतिपादन करणारं. तंत्र : मुक्ती
-
Kashmiriyat (काश्मिरीयत)
काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे जगातील सर्वात अशांत आंतरराष्ट्रीय सीमारेषांपैकी एक. या सीमारेषेवरील प्रत्यक्ष परिस्थिती आणि जनजीवन जाणून घेण्यासाठी एक मध्यमवर्गीय स्त्री एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेते. इतकेच नाही तर या प्रवासात अत्यंत गरजेपुरतेच सामान आणि पैसे जवळ ठेवते. तिचा भरवसा आहे सामान्य काश्मिरी माणसाच्या चांगुलपणावर आणि मानवतेच्या मूल्यांवर. कसा घडला तिचा हा प्रवास? या प्रवासात तिला आलेल्या अनुभवांनी तिचा भरवसा भंगला की मजबूत झाला? ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे सार्थ वर्णन असलेल्या काश्मीरमधील निसर्गसौंदर्य, आलेल्या पाहुण्याची घरच्यासारखी ‘मेहमाननवाजी’ करणारी काश्मिरी कुटुंबे, सीमारेषेच्या अलिकडे काय किंवा पलिकडे काय, सारख्याच जीवनाला सामोरे जाणारे जनसामान्य यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा –