-
Sattaritla Bharat (सत्तरीतला भारत)
स्वतंत्र भारताचा सखोल समीक्षात्मक आढावा.. देशाचा सत्तर वर्षांतला झंझावाती प्रवास... फाळणीपासून ते १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामांची छाप, लोकपाल विधेयक ते नोटाबंदीचे धोरण; या साऱ्या आठवणींचा लेखाजोखा यात समाविष्ट आहे. त्यातून भारत देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होते.