Ranjhunjar
ह्या कथा नुसत्याच रम्य नसतात, तर त्यातून युद्धाच्या विविध पैलूंच दर्शन घडतं. दुसर्या महायुद्धात युरोप अमेरिकेतील तरुण पिढी कापली गेली. दोन्ही बाजूच्या सैनिकांनी अतुलनीय शौर्य दाखवलं. त्या युद्धातील ह्या कथा मराठी वाचकाला युद्धाचे यथार्थ दर्शन घडवतील. भारत आज ज्या परिस्थितीतून जात आहे, ते पाहता तरुण पिढीस युद्धाची निदान तोंड ओळख होणं तरी आवश्यक वाटते. आजच्या 'रिमोट कंट्रोल' युगात वैयक्तिक शौर्याला वाव नसतो असं म्हटलं जातं, पण तसं त्या युद्धात नव्हतं. अशा कथा वैयक्तिक शौर्याच्या कथा वाचकांना नक्कीच आवडतील.