Valay
कथा म्हणजे गोष्ट- घटनेतून फुलत जाणारं नाटय. या नाटयातून मानवी स्वभावाचे विविध नमुने दृीस पडतात.वपुंच्या कथांमधून माणसांच दु:ख आनंद,धुंदी यांचं तरल दर्शन घडतं. वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी ओळख असते. 'वलय’ मधील प्रत्येक कथेतून एक वेगळीच ओळख असलेली माणसे भेटतात. 'अर्थ’मधील अप्पा. व्यवहारी जगात पैशाने फसवले जाण्याचं कोणतंच दु:ख न बाळगणारे. तर मिळणार्या अपार आनंदापुढे कामातून मिळणार्या आनंदाच्या धुंदीतच जगणारे- त्यांच जगण्याचं तत्वज्ञान और. 'स्वप्नवेडी' मधली मृणालिनी-एका स्वप्नात जगणारी. त्या स्वप्नामागचं करुण सत्य वाचकाला हलवून सोडतं. 'विश्वास’ मधील विश्वास पंडितची कैफियत मनाला सुन्न करते. या आणि अशा मनात दीर्घकाळ रेंगाळणार्या कथांचा हा संग्रह.