Maharashtratil Vakte (महाराष्ट्रातील वक्ते)
महाराष्ट्राची पवित्रभूमी ही येथील संतमहात्म्यांमुळे जशी अधिक पावन झाली तशीच महाराष्ट्रातील सरस्वतीपुत्रांच्या वाग् विलासामुळे अधिकच चैतन्यमय झाली. महाराष्ट्रातील या सरस्वतीपुत्रांच्या आशिर्वादाने अनेक वाक् पटू महाराष्ट्राला लाभले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने अनेक व्यासपीठे त्यांनी गाजवली. त्या बँ. नाथ पै. श्री. म. माटे, सेतू महादेवराव पगडी, पु. ल. देशपांडे ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसारख्या दिग्गज वक्त्यांचा परिचय महाराष्ट्रातील वाचकांना व्हावा या उद्देशाने झालेली ग्रंथनिर्मिती म्हणजे 'महाराष्ट्रातील वक्ते'.