Don Yashswi Lokyudhe (दोन यशस्वी लोकयुद्धे)
व्हिएतनाम युद्ध यशस्वी झाल्यावर, स्थापन झालेल्या व्हिएतनामी सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधींनी जगात प्रथम मान्यता दिली होती. नंतर हो-ची-मिन्ह व्हिएतनाम अध्यक्ष भेटीवर आले असताना त्यांनी मोहन धारिया - प्लानिंग कमिशन उपाध्यक्ष यांच्याशी बोलताना वरील उद्गार काढले होते. मोगल विरुद्ध मराठे व फ्रेंच-अमेरिकन विरुद्ध व्हिएतनाम या दोन लोकयुद्धांतील साम्यस्थळे व तुलना दाखविण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे. ज्या छोट्या राष्ट्रांवर साम्राज्यवादी लोकांची आक्रमणे होतील त्या राष्ट्रांना वरील युद्धनीतीच्या अभ्यासाचा फायदाच होईल.