Do Gaj Jami Bhi Na Mili Ani Itar Lekh (दो गज जमीं
सामाजिक परिवर्तन, सामाजिक बद्दल हे शब्द अहंकार सुखावतात. समाज मात्र पाण्यातील भोवऱ्यात सापडलागत गटांगळया खात राहतो. मानव कुठून तरी निघाला, कोठे तरी जाणार आहे. पण मार्ग कोणता, दिशा कोणती? हे प्रश्न बिकट राहत आले, बिकटच राहणार, हि अशी ठाम विधाने बोरीकर नेमकी डाव्याचा आणि परिवर्तनवाद्याचा बाबतीतच का करतात? 'रा.स्व. संघ' असाच विचार करून कायम परिवतर्नवाद्याचा तेजोभंग करीत असतो. बदलांचे कारण सक्ती आणि अभावितापणा असतो असे सागणे म्हणजे विचारी बुद्धिवान माणसाचे स्थान नाकारणे. बोरीकर आपोआपावादी आहेत काय? ते मानवी प्रयत्न झूट ठरविते. ईश्वरी संचालनही नाकारतात. मग वनस्पतीप्रमाणे मानव वाढतो. तुटतो, संपतो आणि परत अंकुरते असा निर्सगबद्ध असतो कि काय?…इत्यदि प्रश्नाचा विचार-विर्मष दिनकर बोरीकर यांनी 'दो गज जमी भी ना मिली' या ग्रंथातील लेखामधून प्रकर्षाने माडले आहेत.