Bharatbhraman ( भारतभ्रमण )
हे पुस्तक म्हणजे ज्योती म्हात्रे यांनी संपूर्ण भारतभर केलेल्या प्रवासाचे अनुभवकथन आहे. प्रत्येक पर्यटनथळाविषयीचे बारकाव्यांसहित सूक्ष्म नजरेने टिपलेले अनुभव या पुस्तकात चित्रित झाले आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या प्रत्येक प्रदेशाबद्दलची, त्या त्या पर्यटनस्थळांची वैशिष्ट्यं, प्रत्येक सहलीचं अतिशय रंजक भाषेत केलेलं सविस्तर वर्णन ही या पुस्तकाची लेखनवैशिष्ट्यं सांगता येतील. प्रस्तुत पुस्तकाची भाषा इतकी ओघवती झाली आहे, की लेखिकेसोबत जणू आपणही भारतभ्रमण करून येतो.