-
Aag (आग)
प्रत्येकच माणसात देव आणि दानव दोघांचा अंश असतो. कोणतीही दुर्घटना माणसाची जणू परीक्षाच घेत असते. अशा प्रसंगातच माणसात किती देवत्व आहे आणि किती दानवत्व आहे, ते समजून येते. दुर्घटनेच्या काळातच माणसातलं देवत्व किंवा दानवत्व खऱ्या अर्थाने बाहेर येतं. आग ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. एका धार्मिक कार्यक्रमात दोनशेहून अधिक लोकांचा आगीत होरपळून जीव गेला होता. त्या दुर्घटनेत लोकांचं काय झालं असेल, त्यांची स्थिती कशी झाली असेल, त्याचा विचार यात केला आहे. एखादी दुखद घटना माणसाला कसं हादरवून टाकते, ही त्याची गोष्ट आहे. ही वेदनेची गोष्ट आहे. माणसाच्या नातेसंबंधांचे पदर उलगडवून दाखवणारी ही गोष्ट आहे. एखाद्या दुखद घटनेचा माणसाचा असणारा संबंध सांगणारी ही गोष्ट आहे. ही माणसातल्या देवत्वाची आणि दानवत्वाची गोष्ट आहे.
-
Bakhar Lalitadityachi (बखर ललितादित्याची)
काश्मीरनरेश ललितादित्य मुक्तापीडचा जीवनप्रवास आठव्या शतकात संपूर्ण आशिया खंडावर लोकोपयोगी निर्माणकार्ये करणारा, ललितादित्याएवढा प्रभाव टाकणारा सम्राट झाला नाही, हे एक वास्तव आहे. ललितादित्याचे समग्र जीवन मुळातच एवढे झंझावाती आणि साहसी आहे की, लेखिकेला ते कादंबरीरूपात मांडावेसे वाटले. या कादंबरीच्या रूपाने ललितादित्याची तेजाने झळाळणारी जीवनगाथा आपल्यासमोर आली आहे. दोन स्तरांवर कादंबरी पुढे नेण्याचे आणि तिला अजून थरारक बनवण्याचे कौशल्य डॉ. लिली जोशी यांनी दाखवलेले आहे. त्यामुळे कादंबरीची वाचनीयताही वाढलेली आहे. ललितादित्याच्या जीवनाची नाळ वर्तमानाशी भिडवण्याचे लेखिकेचे कौशल्य उत्कृष्ट कादंबरीकाराचे गुण त्यांच्यात आहेत, याचे निदर्शक आहे. या कादंबरीच्या माध्यमातून भारतीय इतिहासात एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या, पण इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या ललितादित्य या महान सम्राटाकडे लक्ष वेधून घेण्याचे महत्त्वाचे ऐतिहासिक आणि अभिनंदनास्पद कार्य डॉ. लिली जोशी यांच्याकडून पार पडले आहे. बहुतेक सर्वच मराठी कादंबरीकार मराठी इतिहासातील महानायकांच्या प्रभावक्षेत्रात वावरत असताना त्यांनी थेट काश्मीरच्या इतिहासाकडे झेप घेतली आणि एक दुर्लक्षित, पण गौरवास्पद इतिहासाला वाचा फोडली, हे त्यांचे साहित्यकार्य राष्ट्रीय पातळीवर दखलपात्र आहे. संजय सोनवणी (प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक)
-
Kridapatu Te Kridamaharshi (क्रीडापटू ते क्रीडामहर
गुरुवर्य डॉ. अरुण दातार म्हणजे शरीरसौष्ठवजन उचलणे, पॉवर लिफ्टिंग, सूर्यनमस्कार या क्षेत्रांतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि वने आर्ट या क्रीडाप्रकाराचे जनका आई-वडिलांचे उत्तम संस्कार, गुरुवयांचे उत्कृष्ट मार्गदर्शन आणि मित्रमंडळींचे उत्कट प्रेम या त्रिवेणी संगमातून त्यांनी विद्यार्थिदशेतच अनेक बक्षिसांसह क्रीडापटू म्हणून अभिनंदनीय कामगिरी केली. विवाहानंतर झालेल्या भीषण अपघातात होत्याचं नव्हतं झालं सुड शरीर कायमचं जायबंदी झालं, परंतु भेटलेली देवमाणसं, कमालीची सहनशीलता आणि सुविद्य पत्नीनं शुश्रूषेसह दिलेलं मानसिक पाठबळ यांमुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. पुढे पत्नीच्या आग्रहामुळे व्यायामशाळा हेच जीवितकार्य मानून शेकडो कीडापटू घडवले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी पुणे श्री ते विश्व श्री असं यश संपादन करत सूर्ण जिमची कीर्ती सर्वदूर पोहोचवली. यथावकाश सरांनाही अनेक पुरस्कारांसह क्रीडामहर्षी पदवी प्राप्त झाली. अर्थात, हा प्रवास सोपा नव्हताच. नित्य नवा संघर्ष असला, तरी असंख्यांच्या जीवनात हर्ष पेरून, आपलं बोनस आयुष्य राष्ट्रकार्यासाठी समर्पित करणारे डॉ. अरुण दातार आणि संतसाहित्य समरसून जगणाऱ्या गुरुवर्या डॉ. आरती दातार या दाम्पत्याने वळणावळणांवर भेटलेल्या मदतीच्या हातांचा ओघवत्या शैलीत परामर्श घेतला आहे. व्यायामातून आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, विवेक, शिस्त, सहकार्य, संयम, सातत्य, साधना, साहस, सेवा अशा नानाविध वैश्विक मूल्यांचं संस्करण असलेले हे हा शब्दधन प्रत्येकासाठी प्रेरक आहे. शक्ती आणि भक्तीचं प्रतीक आहे. दातृत्व आणि दूरदृष्टीचं द्योतक आहे. कृतार्थता आणि कृतज्ञतेचा परिपाक आहे. म्हणूनच 'क्रीडापटू ते क्रीडामहर्षी ही यशोगाथा नक्कीच संग्राह्य आहे. डॉ. लता पाडेकर (संत साहित्याच्या अभ्यासक)
-
Eka Phandivarchi Phakhara (एका फांदीवरची पाखरं)
तिन्हीसांज..... ना दिवस ना रात्र अशा काळाचा तुकडा.... तिघींची आयुष्यं त्या तुकड्यावर हेलकावत होती. जणू एकाच फांदीवरची तीन पाखरे । चारू, संध्या आणि पल्लवी... नवीन आयुष्याला तिघींनाही आता सामोरे जायचं होतं. निर्णय घ्यायचे होते. आपापल्या परीनं आयुष्यात रंग भरायचे होते. हाती आलेल्या पत्त्यांनिशी आयुष्याचा डाव खेळायचा होता. कसा रंगणार होता हा खेळ?...
-
Draupadi Samrajya Sthapana Part 2 (द्रौपदी साम्राज
खांडवप्रस्थ - एक उजाड माळरान, वास्तव्यासाठी प्रतिकूल... समोर आलेल्या निर्वासितांची समस्या आणि आर्थिक अस्थिरतेशी दोन हात करताना पांडवांची राज्य विस्ताराची वाटचाल, की तिचे एक आई म्हणून तिच्या मुलांसोबतचे नाते असो, या सर्व गोष्टींचा अनुभव या कथेत घ्या. या प्रवासात देविका, वलंधरा, सुभद्रा, कारेणुमती आणि विजया या घरातील कुशल, हुशार आणि मेहनती स्त्रियांनी द्रौपदीच्या आधिपत्याखाली एकत्र येऊन एका महान साम्राज्य स्थापनेसाठी आपापल्या परीने कसे योगदान दिले, हे पाहा. नारीशक्तीच्या या अफाट कर्तृत्वाच्या कथांचा आनंद घ्या...
-
Draupadi Kuruvansh Pravesh Part 1 (द्रौपदी कुरुवंश
द्रौपदीची आई, महाराणी प्रीश्ती, मानवी हक्कांची पुरस्कर्ती आणि एक चतुर राजकारणी म्हणून ओळखली जात असे. आपल्या मुलीच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि तिला खंबीर बनवण्यात महाराणींचा मोठा वाटा होता. अशा स्वतंत्र विचारांच्या राजकन्येने, माँ कुंतींनी चुकून सांगितलेली गोष्ट आंधळेपणाने कशी ऐकली असती? सर्व पांडव तिच्याशी लगेचच विवाहबद्ध होण्यास तयार झाले का? बुद्धिमान सहदेव आणि दूरदृष्टी असलेली द्रौपदी यांनी एकत्रितपणे विभाजनासाठी युक्तिवाद केला, त्याचा परिणाम म्हणून दुर्योधन हस्तिनापुराच्या सिंहासनावर कायदेशीररीत्या बसू शकला का? खुल्या आणि मुक्त विवाहाची गुंतागुंत (बहुपतित्व), सत्तेचा आणि राजकारणाचा अनाठायी प्रयत्न, असामान्य आणि विलक्षण मैत्री, सर्वसमावेशकता आणि लिंग-समानतेला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या भावंडांचे एकमेकांशी असलेले बंध, अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवणारी प्राचीन महाकाव्याची ही कालातीत कथा आहे. पाच भागांत उलगडत जाणाऱ्या, एका साम्राज्ञीचा जीवनपट कथेच्या रूपात सादर केलेला आहे.
-
The Empress of Indraprastha Part-2 : Building an E
This is the second part of The Empress of Indraprastha series, a fictional recreation of the Mahabharat, and a sequel to hugely popular The Empress of Indraprastha - Entering Kuruvansh. We've heard endless glories of the five brothers. Now discover the sisterhood between the wives of the Paandavs. Follow Draupadi in action, as she devises and implements financial strategies to jumpstart the economy. Tread delicate waters as Draupadi seeks answers from her husbands for causing the death of a Bhil woman and her five sons to save their own skins in the Vaarnavat fire. Watch her probe Krishna for justification about his role in the destruction of an indigenous asura habitat, simply to satiate Agni's hunger. Plunge into the depths of her marriage with Arjun, that hits its nadir when she criticizes him for not protecting Eklavya. Explore her relationship with her sons. The strategist Devika, the epicurean master-chef Valandhara, the mother and devoted wife, Subhadra, the danseuse Karenumati, and the financial analyst, Vijaya unite under Draupadi's leadership as they toil towards a single-minded goal of building their empire.
-
The Empress Of Indraprastha- Entering Kuruvansh
Draupadi’s mother, Maharani Prishati, was influential in building her charismatic daughter’s strong character as a proponent of human rights and a shrewd politician. Why would such an independent thinker blindly follow something that Ma Kunti said accidentally? Did all the Paandav brothers agree to marry her immediately? The brilliant Sahdev and the far-sighted strategist Draupadi collectively argued for a partition to give Duryodhan his rights to half the kingdom. The intricate complexities of a dynamic polyamorous marriage and a sibling bond promoting gender equality are showcased through the series. Over five parts unfurl – the untold memoirs of an Empress…
-
Lt Colonel Purohit -Vishvasghatacha Bali (लेफ्ट क
‘हा हिंदू वहशतवाद आहे,’ अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रांच्या मथळ्यांतून उच्चरवाने सांगितल्या जात होत्या. राष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात प्रथमच एखाद्या आर्मी ऑफिसरला. लेफ्ट, कर्नल पुरोहित यांना सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात अटक झाली होती. कोण होती ही व्यक्ती आणि तिचं नाव वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर का चिकटवलं गेलं होतं? सर्वांना सोडून याच व्यक्तीला का बरं यात गोवलं गेलं होतं? ते खरोखर गुन्हेगार होते का? की त्यांना षड्यंत्रात गोवलं गेलं होत? त्यांना बळीचा बकरा बनवलं गेलं होतं का? न्यायालयात खटले चालू असतानाच्या नऊ वर्षांच्या प्रदीर्घ काळात या मानचिन्ह विभूषित अधिकाऱ्याला तुरुंगात डांबलं गेलं होतं; त्या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांची काय अवस्था झाली होती? ‘लैफ्ट. कर्नल पुरोहित विश्वासघाताचा बळी?’ या पुस्तकात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे करत असताना, भयाण अशा षड्यंत्रावर प्रकाशझोत टाकलेला आहे. ते सर्व वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहील.
-
Karheche Paani (Sankshipt) कऱ्हेचे पाणी (संक्षिप्त
जविनायें हैं विलक्षण पेड माझ्यामद्धे कसे आहे? लहानपणापासून निसर्गाची अन इतिहासाची मला सोबत मिळाली. ब्रम्हदेवाच्या कमंडडूंतून उगम पावलेल्या कन्हेच्या कोठी मी जन्माना आलो आणि तिच्याल अंगाखांद्यावर जेजूरांच्या खंडोबा च्या भंडाऱ्याने वाढलो. मोठा झालो. उशालाशिव छत्रपतचा पुरंदर किल्ला अष्टौप्रहर पारा करी तर श्रीसोपानदेवांची भक्तिवीणा शेजारीं सदैव वाजे.
-
Banking Pravas-Samajik Janivetun (बँकिंग प्रवास सा
बँकेतल्या नोकरीकडे एक आरामदायी, अधिक पगार आणि प्रतिष्ठा देणारी नोकरी म्हणून पाहणारे अनेक जण असतात. ज्या वेळी बँकेतल्या नोकरीकडे केवळ नौकरी म्हणून पाहिले जाते, त्या वेळी हाती काहीच लागलेले नसते. सेवाकाळात मिळालेला पगार, बोनस आणि निवृत्तीच्या वेळी मिळणारे फंड, मॅच्युइटी हे इतकेच घेऊन मंडळी ज्येष्ठ नागरिक बनलेले असतात; परंतु काही मोजकेच लोक या नोकरीकडे दरमहाच्या पगार देणाऱ्या नोकरीपलीकडे बघतात आणि ही नोकरी म्हणजे समाजासाठी, समाजातल्या दुर्बलांसाठी काही करण्याची एक संधी आहे, असंही समजतात. ही मंडळी पगार तर मिळवतातच, तसेच अन्य नोकरीतले जे काही लाभ असतात, तेही प्राप्त करतात. त्याशिवाय त्यांनी प्रचंड मोठे समाधान मिळवलेले असते. आपण एका संस्थेच्या विकासात पूर्ण ताकदीनिशी आपला हातभार लावला आहे. याचे ते समाधान असते. आपण आपल्या अधिकाराचा सुयोग्य उपयोग सामाजिक हित सांभाळण्यासाठी केला आहे, याचे त्यांना समाधान असते. त्यांनी अनेक तरुणांना रोजगारप्रवण केलेले असते, अनेक उद्योगांना हातभार लावलेला असतो. हे सगळे प्रसंग, त्यातून मिळालेले समाधान याची मोजदाद कशातच करता येणार नाही. आजही कुणीतरी चुणचुणीत, पण गरीब असा एखादा वसंत बँकेत आलेला आठवतो आणि आपल्या समोरच त्याचा उद्योग बहरलेला आपण पाहिलेला असतो. हे असे अनेक प्रसंग निवृत्तीनंतर एक आत्मिक समाधान देत असतात. नोकरी म्हणजे सामाजिक दायित्व निभावण्याची संधी आहे, असे समजून काम केलेल्या व्यवस्थापिका सौ. जान्हवी जोगळेकर यांचा सेवाकाळ म्हणून तर अत्यंत समाधानाचा ठरला आहे. सगळे प्रसंग आजही आनंद देणारे आहेत आणि आता नोकरीत असणाऱ्यांसाठी तो एक वस्तुपाठ आहे. आवर्जून वाचावे, असे हे स्मरणरंजन आहे.
-
Gautam Buddhanche Charitra (गौतम बुद्धांचे चरित्र)
गौतम बुद्ध आपल्या आनंदा नावाच्या सत्शिष्याला शेवटचे सांगणे सांगताना म्हणतात की, ‘तू सन्मार्गानुवर्तनाचा प्रयत्न सर्वदा उत्साहपूर्वक व खऱ्या आस्थेने चालू ठेव. असे करशील, तर तू विपत्तींपासून मुक्त होशील. दुर्वर्तन, आत्मपरताभ्रम व अज्ञान यांपासून तुझे मोचन होईल. मी इहलोक सोडून गेल्याबद्दल तुम्हास वाईट वाटण्याचे कारण नाही. माझा देह येथून नाहीसा झाला, तरी माझ्या सत्यधर्मरूपाने मी सर्वदा तुम्हास सन्निध राहीन. माझे देहावसान झाले, तरी मी उपदेशिलेले सत्य अमर राहील. ह्या लोकी मी जे सत्याचे राज्य स्थापिले आहे, ते जगाच्या अंतापर्यंत अढळ राहावयाचे. आता ह्या सत्याच्या यथार्थ स्वरूपाविषयी जनाची चित्ते वेळोवेळी भ्रांत होतील; परंतु माझ्यासारखे सत्यबोध करणारे पुरुष पुढे निर्माण होऊन जन पुन्हा सन्मार्गवर्ती होतील.’ गौतम बुद्ध या नावातील ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी असा होतो. बुद्ध ही उपाधी त्यांनी अत्यंत प्रयत्नांनी मिळविली होती. शाक्यमुनी गौतम बुद्धांना संमासंबुद्ध मानतात. संबुद्ध म्हणजे स्वतःवर विजय मिळविलेला आणि स्वतःचा उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध; तर संमासंबुद्ध म्हणजे ज्ञान प्राप्त झालेला, स्वतःसोबतच संपूर्ण जगाचा उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.
-
Maharashtrachi Phule Sankruti Arthat Bhahujan Sans
डॉ. सो. रा. शेडे फुले संस्कृतीला ‘बहुजन संस्कृती’ म्हणतात. सत्यशोधक चळवळीची क्रांतिकारकता दोन शब्दांत सांगायची म्हटले तर, सध्याच्या भारतीय संविधानाचे ‘ब्रीदवाक्य ‘सत्यमेव जयते’ आहे आणि फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी करताना सुरुवातीलाच ‘सत्यमेव जयते’ असा नारा दिलेला आहे. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीने केलेली मानसिक व वैचारिक मशागत अत्यंत मूलगामी आहे आणि तिची आज नितांत गरज आहे. भारतीय संविधानाने स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, समाजवाद इत्यादी मूल्ये रुजविण्यासाठी सत्यशोधक चळवळीची नितांत गरज आहे. डॉ. सो. रा. शेंडे यांचे हे पुस्तक या दिशेने टाकलेले एक पाऊल वाटते. डॉ. बाबा आढाव (ज्येष्ठ समाजवादी नेते)
-
The Making Of Star India (द मेकिंग ऑफ स्टार इंडिया
१९९०च्या सुरुवातीला रिचर्ड ली यांच्याकडून रुपर्ट महोक (कार्यकारी अध्यक्ष, न्यूज कॉर्पोरेशन) यांनी स्टार टीव्ही ही कंपनी ८७० मिलियन डॉलर एवढी अवाढव्य रक्कम खर्च करून विकत घेतली, तेव्हा जगभरातील माध्यम तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या होत्या. कसलंही निश्चित भवितव्य किंवा ओळख नसलेल्या आशियातील या कंपनीमध्ये मर्डोक यांनी इतकी प्रचंड गुंतवणूक का केली असेल? आज २५ वर्षांनंतर ‘स्टार इंडियाचा महसूल २ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. आज ‘स्टार इंडिया’ भारतातील तीन प्रमुख प्रसारमाध्यम कंपन्यांपैकी एक आहे. शेकडो गुंतवणूक तज्ज्ञांना जे जमलं नाही; ते मर्डोक यांच्या अंतःप्रेरणेनं घडवून आणलं होतं! आणि भारतातील प्रचंड मोठ्या बाजारपेठेची ओळख रुपर्ट मर्डोक यांच्यामुळे जगाला झाली! वनिता कोहली-खांडेकर यांनी भारतीय प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातील प्रमुख खेळाडू असलेल्या ‘स्टार टीव्ही’ची ही रोमांचक कथा या पुस्तकामध्ये चितारली आहे. मुळात अत्यंत उत्कंठापूर्ण अशी कथा अतिशय रोचक किस्से आणि रतिकांत बासू, पीटर मुखर्जी, उदय शंकर, समीर नायर आणि खुद्द रुपर्ट मर्डोक यांच्या व्यक्तिरेखांमुळे अधिकच उठावदार झाली आहे.
-
Rashtriya Ekatmateche Shilpkar-Barrister Sardar Va
पंकज रूपचंद पाटील आणि संदीप भानुदास तापकीर लिखित ‘राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल’ हा ग्रंथ आधुनिक भारताच्या एकात्मतेसाठी व समृद्धीसाठी उपयुक्त ठरणारा वैचारिक ग्रंथ आहे. वल्लभभाईंच्या चरित्रासह भारताच्या इतिहासाचे अंतरंगी वास्तव या ग्रंथात सप्रमाण चित्रित झाले आहे. सरदार पटेल यांच्या विनोदी स्वभावाचे अनेक किस्से व घटनाप्रसंग लेखकाने सांगितले आहेत. पोलादी पुरुषाचे हे वेगळे रूप नवीन असल्याने वाचकांना प्रचंड भावते. विशेष म्हणजे, म. गांधी व पटेल यांच्यातील खुमासदार संवाद आणि त्यातून जन्माला आलेला विनोद मुळातून वाचणे महत्त्वाचे ठरते. वल्लभभाई आणि म. गांधी यांचे सहअस्तित्व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या गाभ्यातील सूत्र आहे. म. गांधींची उपोषणे, आंदोलने यांचा थेट अनुबंध सरदारांच्या जीवनाशी येतो. म्हणून गांधींचा जीवनपट पटेलांच्या नोंदीशिवाय पूर्ण होत नाही; तसेच गांधी-नेहरू-पटेलांविना स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजून घेता येणार नाही. पंतप्रधानांचे पद पंडित नेहरूंनी भूषविल्याने गांधीनंतर त्यांचेच नाव गाजले आणि पटेलांच्या वाट्याला उपेक्षा आली; पण या ग्रंथाने सरदार पटेल यांना न्याय दिला आहे.
-
Steve Jobs (स्टिव्ह जॉब्स)
स्टीव्ह जॉब्ज या द्रष्ट्या संयोजकाने कॉम्प्युटर, मोबाईल फोन, आयपॅड, म्युझिक प्लेअर यांची निर्मिती करून तंत्रज्ञानाला सर्वमान्यता मिळवून दिली. सर्वोत्तम गोष्टींचा ध्यास घेतलेल्या स्टीव्हने हे सर्व कसे साध्य केले, त्याबरोबरच अॅपल, पिक्सार या अग्रगण्य कंपन्यांच्या निर्मितीची यशोगाथा, कर्करोगाने सर्व शरीर पोखरून टाकलेल्या स्टीव्हने शेवटच्या क्षणापर्यंत नवनिर्मितीचा घेतलेला ध्यास, हे सारेच अत्यंत रोचक आहे. स्टीव्ह जॉब्ज म्हणजे, पृथ्वीवरचा एक प्रसिद्ध जादूगार! जग समृद्ध करायच्या प्रयासांमुळे त्याने आपल्या मनात आदराचे स्थान का व कसे निर्माण केले, हे सर्व सविस्तरपणे वाचल्याशिवाय आपल्या मनाचे समाधान कसे होईल?
-
Pretak-Utprerak (प्रेरक उत्प्रेरक)
यशस्वी जीवनासाठी चांगली नोकरी, कठोर मेहनत, बुद्धयांक, भावनात्मक बुद्ध्यांक, उत्तम संवादकौशल्ये हे सर्व मूलभूत घटक आहेत. तरीदेखील, केवळ या सर्व घटकांची उपस्थिती यशाची हमी देत नाही. तर, त्यांना दीर्घकालीन यशामध्ये परिवर्तित करण्यासाठी तुम्हाला निश्चित अशा उत्तेजन देणाऱ्या घटकांची आवश्यकता असते. तो तुमच्या अभिवृद्धीला चालना आणि वेग देतो. हे प्रचंड प्रभावी पुस्तक विविध उत्प्रेरकांची ओळख करून देते. ते तुम्ही जोपासू शकता आणि तुमच्या कामात तसेच जीवनातही प्रगती करण्यासाठी त्यांचा लाभ करून घेऊ शकता. सहज उपलब्ध, आकर्षक असे पुस्तक. मुख्य म्हणजे, यातील सगळ्यांचा केवळ सैद्धांतिक पातळीवर नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तीने लिहिलेले, आचरण्यास सोपे, 'उत्प्रेरक पुस्तक, जे तुम्हाला तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी आणि दररोज, प्रत्येक क्षणामधून जास्तीत जास्त मिळवण्यासाठी योग्य साधनांनी सुसज्ज करेल.
-
The Search for Aurangzeb’s Stone
A mismatched historian couple visit the fictitious town of Badanadi to search for something to do with Aurangzeb. It is critical for Sarah, the historian’s wife who is doing a thesis on the amorous Maharajas of India. While they set about searching for this unknown, serendipity brings in an adventurer, amateur photographer, antique dealer and a small time thug to become part of this adventure. The search for this knowledge takes them through the dusty streets of Badanadi as no one seems to be aware of anything. Is this a ‘stone’ or a ‘document’ or just a ‘monument’, is what all the explorers are left guessing. A visit to the office of the ASI provides some clues, but the historians must sit and solve the puzzle. As it unfurls, the excitement is palpable. There is unconcealed glee for the historians when they get to the site which turns to a nightmare as confusion abounds when the characters reveal their colours. They just want to go home now. But will they succeed? Written by a career economist, the novel starts by introducing the protagonists and then accelerates before taking the reader on a roller coaster ride.
-
Kiwiyo Safar New Zealandchi (किंवियो सफर न्यूझीलंड
विजय लोणकर यांचे अगदी साधे लेखनसुद्धा चटकदार व खुसखुशीत असते. पुणे शहराएवढी लोकसंख्या असलेला न्यूझीलंड हा देश प्रामाणिकपणात आणि सचोटीमध्ये सर्वप्रथम आहे. अशा या देशाचे लोणकरांनी लिहिलेले हे प्रवासवर्णन वाचून माझ्यासारख्या इतरांनाही त्या देशा जावे असे वाटण्यास भाग पाडणारे आहे, इतके हे वर्णन सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण आहे. अरविंद व्यं. गोखले (ज्येष्ठ पत्रकार व लेखक)
-
Valmiki Ramayanatil Paach Striya (वाल्मिकी रामायणा
राजा दशरथाच्या शांता या कन्येने असीम त्याग केला नसता, तर त्याला त्याचे हवेहवेसे वाटणारे पुत्र प्राप्त झाले असते का? कोण होती मंथरा ? राणीची धूर्त आणि दुष्ट दासी, की राजप्रासादातल्या षड्यंत्रापासून आपल्या पाल्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणारी प्रेमळ माता? मीनाक्षीच्या सुंदर डोळ्यांचं रूपांतरण कुरूपता आणि अनैतिक लालसेत कसं झालं? एका सदाचारी राजकुमाराभोवती फिरणाऱ्या महाकाव्यात स्त्रियांची भूमिका कोणती? आनंद नीलकंठन हे अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत. या पुस्तकात त्यांनी वाल्मिकींच्या कालातीत महाकाव्याचे अनेक पदर उलगडत महत्त्वाकांक्षा, प्रेम, समर्पण आणि धैर्य यांच्या कथा समोर आणल्या आहेत. रामायणातल्या स्त्रियांकडे नव्याने पाहण्याची दृष्टी ते त्यांच्या वाचकांना देऊ पाहतात. प्रेयसी, बहीण, पत्नी, माता अशा विविध रूपांत वावरणाऱ्या वाल्मिकींच्या रामायणातल्या या स्त्रिया गुंतागुंतीच्या ह्या महाकाव्याला एकत्र गुंफतात.
-
Ichapatra Kalachi Garaj (इच्छापत्र काळाची गरज)
इच्छापत्र हा थोडा भावनिक विषय आहे. या विषयाबद्दल अनेक समज- गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. मुळातच माहितीचा अभाव आणि जागरुकता नसल्यामुळे इच्छापत्र करण्याबाबत उदासीनता दिसून येते. सर्वसामान्य माणसाला या विषयावर सोप्या भाषेत कायदेशीर माहिती देणारे हे पुस्तक त्यासाठीच उपयुक्त आहे. आपल्या मृत्युपश्चात वारसांमध्ये वाद-विवाद टाळण्यासाठी आणि आपली मिळकत लाभार्थीपर्यंत पोहोचावी यासाठी आवर्जून वाचावे असे हे माहितीपर व मार्गदर्शनपर पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.