-
Sahaj, Sobat Jodidarachi ( सहज, सोबत जोडीदाराची )
विवाह या अतिशय सुंदर अशा नात्याचा गाभा उलगडणारं हे पुस्तक आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्या वा कृतींच्या प्रत्यक्ष अवलंबनाद्वारे आपलं वैवाहिक जीवन कसं परिपूर्ण करता येईल, याचं मर्म उलगडणारं हे पुस्तक आहे. लेखकाने खुमासदार शैलीत वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे वैवाहिक नात्यातल्या महत्त्वपूर्ण बाबी उलगडल्या आहेत. वैवाहिक जीवनातले खाचखळगे ओळखा आणि दूर करा या विचारसूत्राभोवती फिरणारं पुस्तक. प्रत्येक जोडप्याने एकमेकांना आवर्जून भेट द्यावं असं पुस्तक.
-
Are Vva ( अरे व्वा )
मनाला प्रेरणा देणार्या गोष्टी या पुस्तकातून चित्रित झाल्या आहेत. आपल्यामध्ये बदल घडवून आणणार्या तसेच महत्त्वाचे काही प्रश्न विचारणार्या, तरीही मनाला भिडणार्या अशा या कथा आहेत. जीवनानुभव अधिक अर्थपूर्ण, स्पष्ट आणि सशक्त करणार्या कथा यामध्ये आल्या आहेत. परिपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी रसरशीत, पोषक, तसेच प्रत्यक्ष न शिकवता अप्रत्यक्षपणे शिकवणार्या गोष्टी म्हणजेच, ‘अरे व्वा!’ हे पुस्तक.
-
Hoy!Amhi Karu Shakto ( होय! आम्ही करू शकतो )
जीवनात ध्येयसाध्यतेच्या दृष्टीने ‘होय! आम्ही करू शकतो’ या ठिणगीने सुरुवात होण्यासाठीचे महत्त्व विशद करणारे पुस्तक. ‘होय! आम्ही करू शकतो’ या ठिणगीद्वारे दैनंदिन जीवनात येणार्या अडचणींवर कशी मात करता येईल, हे या पुस्तकातून प्रभावीपणे मांडले आहे. ‘होय! आम्ही करू शकतो’ या दुर्दम्य आशावादाच्या साहाय्याने प्रगतीचे टप्पे गाठण्याविषयीचे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.
-
Polish ( पॉलिश )
पॉलिश’ हा विनोदी कथासंग्रह आहे. विनोदी लेखनाच्या माध्यमातून जीवनातल्या कारुण्याला या कथासंग्रहाने स्पर्श केला आहे. जीवनशोधाची प्रक्रिया यामध्ये दिसते. व्यंगपूर्ण अनुभूती देणार्या समजुती, उपरोध, उपहास तसेच विडंबन यांसारख्या विनोदी लेखन पैलूंच्या आधारे कथांमध्ये विनोदाची निर्मिती करण्यात आली आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. विनोदी लेखन वाचकांचे मनोरंजन करणारे असले, तरीही वाचकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखणीत आढळते.
-
Inspector Chougule ( इन्स्पेक्टर चौगुले )
सत्य घटनांवर आधारित असे हे पुस्तक आहे. कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर चौगुले यांच्या व्यक्तित्वाचे पैलू उलगडणारे हे पुस्तक आहे. उल्लेखनीय; पण आव्हानात्मक प्रसंग कथाचित्रण हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. पोलीसदलातील उच्चपदस्थ अधिकार्याच्या नजरेतून मांडलेले अनुभव या पुस्तकात चित्रित झाले आहेत. खादी वर्दीतल्या प्रत्येक कर्मचार्याला, अधिकार्याला समर्पित अशा या पुस्तकात प्रभावी सत्यकथा मांडण्यात आल्या आहेत. तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक आहे.
-
Bhitichi Bhiti Kashala ? ( भीतीची ‘भीती’ कशाला? )
माणसाच्या ठायी असणार्या ‘भीती’ या भावनेविषयी महत्त्वपूर्ण अशा अनेक गोष्टी उलगडणारे हे पुस्तक आहे. भीती अजिबात महत्त्वाची नाही, तर भीतीपेक्षाही अधिक महत्त्वाचं असं काहीतरी आहे, हे ठामपणे स्पष्ट करणारं पुस्तक. माणसाच्या आयुष्यातल्या अनेक कंगोर्यांद्वारे भीतिमुक्त जीवन कसं जगावं? या दृष्टीने प्रेरणादायी पुस्तक. ‘भीतीचा सामना कराल, तर ती निघून जाईल. भीतीला टाळू पाहाल, तर ती वाढत राहील.’ या सूत्राभोवती विचारांची गुंफण झालेले पुस्तक. आपल्याला जाणवत असलेल्या भीतीपासून सर्वाधिक प्रेरीत कसं व्हायचं याचं मर्म उलगडणारं पुस्तक.
-
Vyavasaikanche Bible ( व्यावसायिकांचे बायबल )
आयुष्यात काहीतरी साध्य करण्याच्या दिशेने कार्यरत असताना मध्येच अशा काही गोष्टी घडतात, की ज्या आपल्याला रोखून धरतात. त्या वेळी तिथे न अडकता काही ना काही कृती करत राहण्याच्या प्रक्रियेतून तुम्ही मार्ग कसा काढू शकता, हे सांगणारे पुस्तक. अनेक दृष्टीकोनांचा समावेश असलेले, आकलनास व आचरणास सोपे असे पुस्तक.
-
Hindu Dharmachi Punrabhivyakti ( हिंदू धर्माची पुन
‘हिंदू धर्माची पुनराभिव्यक्ती’ हे बौद्धिक विरोध करणारे पुस्तक आहे. सध्या विद्यापिठीय विद्वानांच्या वर्तुळात, प्रसारमाध्यमे आणि सामान्य मनात पसरलेल्या हिंदूभयगंडवादावर चतुर आणि प्रभावशालीपणे टीका करून वम्सी जुलुरी यांनी आपल्याला हे दाखवून दिले की, हिंदूभयगंडवादी दृष्टिकोन जी गोष्ट नाकारत आहे, ते ना केवळ सत्य आणि हिंदू विचाराचे मर्म आहे, तर ते ह्या सृष्टीचे पावित्र्य आणि पूर्णता आहे. सृष्टी, इतिहास आणि इतिहासपूर्व काळ याविषयीच्या प्रसारमाध्यमांमधील धारणा, तसेच आर्य आक्रमण आणि बलीप्रथा याविषयीची हिंदूभयगंडवादी मिथके यांना बेधडक आव्हान देत ‘हिंदू धर्माची पुनराभिव्यक्ती’ने हिंदूभयगंडवाद आणि त्याच्या अहंकाराला हिंसक आणि आत्मघातकी संस्कृतीशी संबंधित असल्याचे दाखवून दिले आहे. ह्याचा विरोध केवळ नवीन हिंदू संवेदनशीलताच करू शकते. हे वर्तमानाकडे अशा दृष्टिकोनातून पाहण्याचे आव्हान आहे, जे आपला देश आणि काळ यांना पुन्हा एकदा सनातन धर्माच्या आदर्शांपर्यंत घेऊन जाईल.
-
Adharanchi Jadu ( आधारांची जादू )
आपलं ध्येय गाठण्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी अथवा व्यक्ती भोवताली असतात, ज्या आपल्या ‘आधार’ होऊन जातात. त्यांच्या साहाय्याने प्रेरित होऊन आपण आपली वाटचाल कशी करू शकतो, हे सांगणारे पुस्तक. सर्वत्र अंधकार पसरला आहे. असं वाटत असताना आशेचा सकारात्मक किरण दाखवणार्या आधारांविषयचे समग्र विवेचन ह्या पुस्तकात आले आहे. मानसिक वादळातही स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी मदत करणार्या आश्चर्यकारक आधारांचे महत्त्व सांगणारे पुस्तक. स्वत:चे आश्चर्यकारक आधार निर्माण करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणारं पुस्तक. इतिहास निर्माण करणार्यांच्या यादीत स्वत:चं नाव समाविष्ट व्हावं हे ज्यांना वाटतं, त्या सर्वांसाठी महत्त्वाचं असं एकमेव पुस्तक
-
Vanar Yodha ( वानर योध्दा )
आनंद नीलकंठन यांच्या ‘वानरा’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. सुग्रीव, बाली, तारा यांची आख्यायिका या कादंबरीत चित्रित झाली आहे. वाचकाला खिळवून ठेवणारी लेखनशैली, प्रभावी व्यक्तिचित्रणं, पुराणकथांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन ही या कादंबरीची लेखनवैशिष्ट्ये आहेत. बाली, सुग्रीव आणि तारा यांच्या संदर्भातल्या तर्कसुसंगत विवेचनाद्वारे त्यांची कथा आपल्यासमोर साकारली गेली आहे.
-
Udyasathi Mulana Ghadava ( उद्यासाठी मुलांना घडवा
पालकत्व निभावण्याच्या सुंदर प्रक्रियेविषयी अनोखा अनुभव आणि आनंद देणारे पुस्तक. पालकत्वाबाबतचा प्रवास विविध घटकांच्या साहाय्याने पुस्तकात स्पष्ट करण्यात आला आहे. सर्वार्थाने पालकांसाठी असलेले पुस्तक. वृत्ती, क्षमता आणि दृष्टिकोन या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू होण्याच्या दृष्टीने पालकांनी नेमकं काय करणं अभिप्रेत आहे यावर प्रकाश टाकणारं पुस्तक.
-
Vichar kara, Ayushyachi disha Tharava ( विचार करा,
जीवनात विशिष्ट ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने स्वत:ला काही प्रश्न सतत विचारण्याचे महत्त्व विशद करणारे पुस्तक. प्रश्न विचारून त्यांची उकल करण्याच्या माध्यमातून ‘विशिष्ट’ अशा साचलेपणातून तुम्ही नेमके कसे बाहेर पडू शकता, हे सांगणारे पुस्तक. सकारात्मक दृष्टीकोनातून प्रश्नांचा विचार करून तुम्ही तुमच्या ध्येयसाध्यतेकडे कसे जाऊ शकता, हे सांगणारे पुस्तक. दुर्मीळ अशी व्यक्ती म्हणून स्वत:चा विकास घडवण्याच्या दृष्टीने प्रेरक पुस्तक. प्रश्न कसे विचारावेत, प्रश्न कोणते व नेमके केव्हा विचारावेत हे समजून घेण्यासाठी व त्या अनुषंगाने व्यक्तिमत्त्वविकासासाठी मार्गदर्शनपर पुस्तक.
-
Netrutwakalechi 12 sutre ( नेतृत्वकलेची १२ सूत्रे
नेतृत्वशैलीचा ' आपल्या वाढीच्या दृष्टीने निश्चित अशी रूपरेषा तयार करणे हा अत्त्यंत महत्वाचा व मूलभूत असा गुणधर्म आहे.
-
Police Files ( पोलीस फाइल्स )
पुणे पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीवर आधारित कथांचे संकलन म्हणजे पोलीस फाइल्स. परदेशातील पोलीसकथा चित्तथरारक वाटतात; पण तुमच्या स्वत:च्या शहरातील पोलीसही कर्तबगारीत कुठेही कमी नाहीत. पुणे पोलिसांची कामगिरी वाचताना तुमचीही मान अभिमानाने ताठ होईल आणि ‘पोलीस आपला मित्र’ याची प्रचिती येईल. या पुस्तकातील कथा वाचल्यानंतर तुमच्या मनातील पोलीस कर्मचार्यांविषयी असलेली समजूत निश्चित बदलेल. तो (किंवा ती) सदैव कठोर नसतो, तो (किंवा ती) सदैव ‘चौकशी’च्या मन:स्थितीत नसतो, तो (किंवा ती) पोलीसठाण्यात हजर नसला, तरी तो (किंवा ती) सदैव ड्युटीवर असतो. गुन्हे घडू नयेत आणि माणूस गुन्हेगारीकडे वळू नये म्हणून पोलीस समुपदेशकाची भूमिकाही किती उत्तमरीत्या निभावतात, हेही आपल्याला वाचायला मिळेल. पोलीस सेवेबद्दल तरुण-तरुणींच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील आणि हुशार, सक्षम युक-युवतींना या क्षेत्राचे निश्चितच आकर्षण वाटेल.
-
Rahasya ( रहस्य )
ही कादंबरी होळकर घराण्याच्या इतिहास-सिद्ध सूत्राची साक्ष देते आणि वर्तमान आधुनिकतेचे संदर्भही पुरविते. त्यामुळे इतिहास व वर्तमान यांना एकाच वेळी या कथेने एकात्म रूपात पेलण्याचा पराक्रम केलाय. जंगलतोड, पर्यावरण हानी, बकाल खेडी, भ्रष्ट पुढाऱ्यांची पिलावळ, दिशाहीन समाजरचना, वनरक्षक-वनकर्मचारी, गावगुंड आमदार, व्याघ्र-प्रकल्प अशा संदर्भांची उपलब्धता कथेचा प्रवाह आधुनिकतेशी व वर्तमानाशी जुळवून ठेवतो. प्रा. गोरक्षनाथ, तलाठी साळुंखे, आर्यभारती, वनकर्मचारी लांजेवार अशा अनेक व्यक्तिरेखांनी वर्तमानाचे भान पेरले आहे. व्यक्तिनमुन्यांची विविधता हा या कादंबरीचा ‘विशेष’ गुण म्हणता येतो. संशोधक, नेता, तलाठी, राजघराण्यातील नायक या व्यक्तित्वांच्या साक्षी इथे आहेतच; पण तंत्रविद्येत प्रवीण असणाऱ्या साधकांचा गोतावळासुद्धा इथे प्रभावी ठरलाय. कथानकातील गूढ वातावरणनिर्मिती हेच या कादंबरीचे मुख्य सामर्थ्य आहे. सत्प्रवृत्ती व अपप्रवृत्तींसह अनेक प्रवृत्तींच्या व्यक्तिरेखा साकार करून गूढ वलयांकित कथानकाची चाकोरीबाहेरची भन्नाट ‘रहस्यमय’ कादंबरी गणेश महादेव यांनी मराठी सारस्वतांच्या दरबारात रुजू केलीय. इतिहास, पुराण, तत्त्वज्ञान, नाथ संप्रदायाचे अंतरंग व परंपरा, तंत्रविद्येचा गाभा व विधी, त्यामधील विशिष्ट प्रकार व संस्कार, भाषिक रूपे या सर्वांचा लेखकाचा सूक्ष्म अभ्यास गौरवास्पद आहे. कथाप्रवाहातील व्यक्ती व घटना-प्रसंगाचा अनुबंध सुंदर गुंफला गेलाय. अध्यात्म व आधुनिकता, भोगवाद आणि त्याग-तपश्चर्या, शुद्धता व अशुद्धता या सर्वच द््वंद््वांचे लेखकाचे आकलन सम्यक आहे. गूढ रहस्यात गुंतून जाणाऱ्या रसिक-वाचकांसाठी हा कादंबरी लेखनाचा प्रयोग निश्चितच गौरवास्पद म्हणावा लागेल. डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन)
-
Bharatbhraman ( भारतभ्रमण )
हे पुस्तक म्हणजे ज्योती म्हात्रे यांनी संपूर्ण भारतभर केलेल्या प्रवासाचे अनुभवकथन आहे. प्रत्येक पर्यटनथळाविषयीचे बारकाव्यांसहित सूक्ष्म नजरेने टिपलेले अनुभव या पुस्तकात चित्रित झाले आहेत. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या प्रत्येक प्रदेशाबद्दलची, त्या त्या पर्यटनस्थळांची वैशिष्ट्यं, प्रत्येक सहलीचं अतिशय रंजक भाषेत केलेलं सविस्तर वर्णन ही या पुस्तकाची लेखनवैशिष्ट्यं सांगता येतील. प्रस्तुत पुस्तकाची भाषा इतकी ओघवती झाली आहे, की लेखिकेसोबत जणू आपणही भारतभ्रमण करून येतो.
-
Rajkaran aani Madhyame ( राजकारण आणि माध्यमे )
राजकारण आणि माध्यमे यांचा परस्परसंबंध उलगडणारे हे पुस्तक आहे. तसेच राजकारणाविषयी माध्यमांची भूमिका स्पष्ट करणारे हे पुस्तक आहे. राजकीय वार्तांकनाशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचे बारकाव्यांसहित विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. माध्यम, राजकारण आणि लोकशाही या सर्व बाबींचा परामर्श लेखकाने या पुस्तकात घेतला आहे. हे पुस्तक म्हणजे राजकारण, पत्रकार आणि माध्यमे यांचा परस्परानुबंध स्पष्ट करणारे जणू व्यासपीठच आहे.
-
Aatmyache Nav Avinash ( आत्म्याचे नाव अविनाश )
स्वामी विवेकानंद आणि गांधीजींना गुरुस्थानी मानून ‘ भारताचा कार्यकर्ता ‘ होण्याचं ध्येय निश्चित करून आयुष्याला उद्दात अर्थ देणारा सोळा वर्षाचा एक युवक – अविनाश धर्माधिकारी . १९८६ मध्ये महाराष्ट्रातून ला निवडला गेलेला एकमेव मराठी अधिकारी . त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रसाशकीय सेवेत , सामाजिक सांस्कृतिक शेक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं आणि जगाच्या नकाशावर ” चाणक्य मंडळ परिवार ” चं अढळ स्थान निर्माण केलं . अनेक महत्वाच्या विषयांना स्वतःला पणाला लावलं . स्वतःच्या विचारांनी अनेक क्षेत्रात योगदान दिलं . ध्येयावर अचल निष्ठा असणाऱ्या , युवावर्गाचं आकर्षण असणाऱ्या त्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी अशी हि चरित्रगाथा … वाचली पाहिजे अशी . माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्त्वाची ही प्रेरणादायी चरित्रगाथा आहे. त्यांनी प्रशासकीय सेवेत, सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रांत त्याचबरोबर चाणक्य मंडल परिवार या ठिकाणी स्वत:च्या कर्तृत्वाने जे अढळ स्थान निर्माण केलं, त्याचा हा लेखाजोखा! अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अविनाशी’ कर्तृत्व या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचले आहे. अविनाश धर्माधिकारी यांची ‘व्यक्तिमत्त्वाकडून विभूतिमत्त्वाकडे’ होत असलेली वाटचाल या पुस्तकात चित्रित झाली आहे.
-
Janmashtami ( जन्माष्टमी )
जन्माष्टमी – आठव्या मुलाच्या अभ्दुत लीला या पुस्तकाद्वारे कृष्णाशी असणारा आपल्या सर्वांचा प्रेमळ बंध अधिक दृढ होण्यासाठी , आपल्या मनात उदात्त भावना निर्माण होण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न आहे. या पुस्तकामध्ये अशा सूक्ष्म तात्विक दृष्टिकोना द्वारे कृष्णाच्या बालपणीच्या लीलांचादेखील वर्णन आकर्षकरीत्या करण्यात आले आहे.
-
Nishkriyatela Bahane Hajaar! ( निष्क्रियतेला बहाणे
आयुष्यात आपल्या ध्येयप्राप्तीच्या दिशेने प्रवास करत असताना त्यामध्ये उद्भवणार्या निष्क्रियतेच्या अडचणींमध्ये न अडकता प्रयत्न सुरू ठेवण्याचं महत्त्व विशद करणारं हे पुस्तक आहे. अनेक उदाहरणांसहित खुमासदार शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विचारप्रवृत्त करणारं आहे. निष्क्रियतेच्या साखळीतून बाहेर पडून आपणास क्रियाशील राहण्यासाठी उद्युक्त करणारे असे मौलिक विचार पुस्तकात उद्धृत झाले आहेत. उत्कट, मानवी चैतन्याचे प्रशंसक, आपल्या क्षमतांवर विश्वास असणारे आणि त्यादृष्टीने पूर्ण वेळ शिष्यत्व पत्करणारे… या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. कृती आणि प्रेरणा यांवर ठाम विश्वास असणार्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे.
-
Nava Vijaypath ( नवा विजयपथ )
UPSC आणि MPSC नागरी सेवा परीक्षांबरोबर भारतातील अन्य महत्त्वाच्या स्पर्धापरीक्षांविषयीची अद्ययावत माहिती हे पुस्तक देते. करिअर कसे निवडावे, पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व निबंध यांसाठी लेखन कसे करावे, प्रचलित घडामोडींचा अभ्यास कसा करावा यांसारख्या मूलभूत मुद्द्यांचा सर्वंकष ऊहापोह हे पुस्तक करते. स्पर्धापरीक्षांना नुकतीच सुरुवात करू इच्छिणार्यांना प्रशासनातील आपल्या अनुभवांद्वारे लेखकाने मार्गदर्शन केले आहे. UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांना सर्वार्थाने मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या विजयाप्रत घेऊन जाणारे अत्यंत वाचनीय असे पुस्तक.