Lal Barfache Khore (लाल बर्फाचे खोरे)

By (author) Jitendra Dixit Publisher Mehta Publishing House

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम ३७०, ०५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द करण्यात आले. आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला. अनेक सामाजिक आणि राजकीय घटनांची पार्श्वभूमी काश्मीरच्या इतिहासातील या महत्वाच्या घटनेला आहे. या निर्णयामागे कोणत्या शक्ती होत्या? जम्मू-काश्मीरच्या लोकांवर याचा काय परिणाम झाला? त्यांची यावर काय प्रतिक्रिया होती? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे भविष्यात याचे परिणाम काय होतील? ज्येष्ठ अनुभवी पत्रकार जितेंद्र दीक्षित यांनी आपल्या `व्हॅली ऑफ द रेड स्नो` या पुस्तकात या प्रश्नांचा पूर्वग्रहविरहित उहापोह केलेला आहे. या स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या निर्णयानंतर काश्मीर मध्ये होणाऱ्या बदलांची कथा सर्वसमावेशक पद्धतीने सांगितली आहे. कलम ३७० रद्द होण्याआधीचे काश्मीर, रद्दबातल झाल्यानंतचे लगेचच काश्मीर आणि आत्ताचे काश्मीर हे विविध मुलाखतींच्या द्वारे समोर आणले आहे. काश्मीर खोऱ्यामधला आंखो देखा हाल लेखकाने लिहिला आहे. जम्मू-काश्मीर विषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक. लाल बर्फाचे खोरे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category