Ahilyabai samajun Ghetana (अहिल्याबाई समजून घेताना)
अहिल्याबाई हे मध्य भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिमत्व आहे. अहिल्याबाई म्हणजे कर्तृत्वाचे सोनेरी पान स्वातंत्र्य, समता, शांतता, सुरक्षितता, सौख्य, समृद्धी, न्याय अशा सर्व बाबतीत त्यांची प्रजा संतुष्ट होती. वर्तमान काळात सर्वत्र क्षेत्रात मानवी जीवन मूल्यांचे अतिशय वेगाने अवमूल्यन होत आहे. अशावेळी अहिल्याबाईंच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. अहिल्याबाईंचे "रयतेला सुखी ठेवणे" हे माझे कर्तव्य आहे ,हे समजून घेण्याच्या दिशेने केलेला हा चिंतन प्रवास. सर्वांनी आपल्या संग्रही ठेवावा असे हे पुस्तक:अहिल्याबाई समजून घेताना