-
Aadvatechi Pustak (आडवाटेची पुस्तके)
Aadwatechi Pustak । आडवाटेची पुस्तकं,Nikhilesh Chitre | निखिलेश चित्रे,Marathi Book
-
Baki Kahi Nahi (बाकी काही नाही)
मुक्तछंद, वृत्तबंध आणि गझल या विविध प्रकारच्या कविता ‘बाकी काही नाही’ या काव्यसंग्रहात कवी किरण वेताळ यांनी अगदी सहजपणे, ओघवत्या शैलीत मांडल्या आहेत. मुक्त कविता, गणवृत्त कविता, मात्रावृत्त कविता, अभंग, अष्टाक्षरी, षडाक्षरी, ओळकाव्य, साखळी काव्य, सुनीत, लावणी, घनाक्षरी काव्य, फटका, गीत, गझल अशी विविध सुगंधी फुले या काव्यसंग्रहात कवीने उत्स्फूर्तपणे मांडली आहेत. इतके सारे विविध काव्यप्रकार एकाच पुस्तकात असणे हे या काव्यसंग्रहाचे वैशिष्ठ्य आहे. या संग्रहात दोन विभाग केले आहेत. ‘किरणोत्सव’ या विभागात ५१ छंदोमय कविता आहेत. दुसऱ्या ‘इर्षाद’ विभागात ५० गझल रचना आहेत. अशी एकूण १०१ कवितांची अद्भुत भेट कवी किरण वेताळ यांनी रसिक वाचकांना दिली आहे. कवीविषयी : कवी किरण ज्ञानदेव वेताळ हे सध्या पुण्यात राहत असून, त्यांनी बीई सिव्हिल केले आहे. ‘बासरी’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह असून ‘बाकी काही नाही’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. काव्यलेखन, वाचन, भटकंती, सायकलिंग ही त्यांचे छंद आहेत. त्यांना अनेक काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिके मिळाली आहेत. तसेच विविध साहित्यिक कार्यक्रमांना त्यांनी स्वतःच्या कविता, गझल सादर केल्या आहेत.
-
Raktatuni Vahe (रक्तातुनी वाहे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध, कबीर, फुले यांना गुरुस्थानी मानल्यामुळे त्यांच्या जीवनात आलेल्या असंख्य अडथळ्यांवर त्यांना यशस्वीपणे मात करता आली. मुळातच डॉ. आंबेडकर हे अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी होते. बुद्धिमत्तेच्या जोडीला या तिन्ही गुरुजनांचे मनस्वी आशीर्वाद लाभल्याने त्यांना आपल्या बुद्धिमत्तेचा वापर समस्त गोरगरिबांच्या कल्याणासाठी व राष्ट्रहितासाठी नेमका करता आला. त्यांचे तेजस्वी कार्य आज जगभरात गौरविले जात आहे. जुन्या पिढीतील लोकांचे ते आदर्श तर होतेच, पण नवीन पिढीसाठी आदर्शासोबतच ते मुख्य प्रेरणास्रोतही बनले आहेत. ही नवीन पिढी त्यांना आपला गुरू मानून उज्ज्वल भवितव्याकडे वाटचाल करताना दिसत आहे. आंबेडकरी विचारांचा हा समर्थ वारसा असाच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत व दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत झिरपत रहावा यासाठी किशोर मेढे 'रक्तातुनी वाहे' या पुस्तकातील लेखांमधून बाबासाहेबांच्या जीवन- कार्यांच्या काही महत्त्वाच्या पैलूंचा आणि एकूणच आंबेडकरी विचारधारेशी संबंधित असणाऱ्या अनेक विषयांचा सव्यसाची धांडोळा घेतात. या लेखांबरोबरच सुप्रसिद्ध गीतकार गुलजारांच्या त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या काही कविता, अमृता प्रितम आणि इमरोज यांचे त्यांनी अनुवादित केलेले काही लेख देखील या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत. अशा वैविध्याने नटलेले हे पुस्तक वाचकांना भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही.
-
Sad Sagarachi Ratnagiri Ganpatipule Pawas (साद सागराची – रत्नागिरी गणपतीपुळे पावस)
साद सागराची – रत्नागिरी,गणपतीपुळे,पावस
-
Sad Sagarachi – Dapoli Murud Harne Dabhol (साद सागराची-दापोली,मुरुड)
दापोली/मुरुड/कर्दे /हर्णे /आंजर्ले /केळशी /लाडघर /कोळथरे /दाभोळ
-
Yuddha Nakaranare Jag (युद्ध नाकारणारे जग)
युद्धाला द्यायला हवा ठाम नकार... जगाला संघर्षांनी वेढलेले असताना युद्ध आणि शांतता यांचा सम्यक विचार करणार्या या पुस्तकाचे महत्त्व अजोड आहे. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, ऑक्सफर्डचे स्कॉलर आणि ‘एका दिशेचा शोध' या १३ वर्षांत २५ आवृत्त्या निघालेल्या राजहंसी पुस्तकाचे लेखक आहेत. युद्धांमागील राजकारण, प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या शर्यती, अतिरेकी राष्ट्रवादाचे दुष्परिणाम यांचा उदाहरणांसह परखड उहापोह या पुस्तकात वाचायला मिळेल. मानवी संस्कृती व सभ्यता यांच्या विनाशाची शक्यता संहारक युद्धांमुळे वाढत चालली आहे, हे सत्य सुस्पष्टपणे मांडले आहे. सर्वनाश टाळायचा तर मानवी समाजाने एकत्र येऊन आणि राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून ठामपणे युद्धांना नकार दिला पाहिजे, असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा योग्य परामर्श घेतला आहे. युद्ध हा मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही. शांतता व युद्ध यातून शांततेची निवड करण्याची मुभा आपल्याला आहे, असे हे पुस्तक ठामपणे बजावते. एकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना हे त्याचे वैशिष्ट्य.
-
Patrapatri (पत्रापत्री)
आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उद्योग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...
-
San,Var Va Sanskar (सण वार व संस्कार)
मराठी महिन्यात असलेले सण, समारंभ, ते कशा पद्धतीने साजरे करावेत याची सविस्तर माहिती लेखिका डॉ सौ. अंजली जोगळेकर यांनी सण वार व संस्कार या पुस्तकात दिलेली आहे. वर्षाचे बारा महिने महिन्यातील सणांव्यतिरिक्त डोहाळजेवण, बारसे, लग्न, शांती, अंत्येष्टी, दृष्ट अशा धार्मिक संस्कारांची माहितीसुद्धा लेखिकेने दिलेली आहे.
-
Artificial Intelligence 2025 ++ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2025++)
संगणक क्षेत्रात अनेक लाटा येत असतात. त्यातील सध्याची लाट आहे एआय. ही लाट अजून काही वर्षं राज्य करेल. एआयच्या क्षेत्रातील सगळ्यात मोठी प्रगती मशीन लर्निंग आणि डीप लर्निंगमध्ये होईल. यामुळे यंत्रे अधिक स्मार्ट होतील, आणि मनुष्याच्या दृष्टीने 'स्वयंसिद्ध' कामे करू शकतील. चॅट जेनआय व चॅटबॉट्स सर्वमान्य होतील. चॅट जीपीटी, डीप सिक मुळे अनेकांना ह्याचे कुतूहल निर्माण झाले. गिबली ही पण एक नवीन लाट. आपले छायाचित्र गिबली वापरून अॅनिमेटेड रूपांतर करण्याचा धुमाकूळ सर्वत्र सुरू आहे. भविष्यात एआय वर आधारित यंत्रणा स्वतः निर्णय घेऊ शकतील. हे विविध क्षेत्रांमध्ये, जसे की वैद्यकीय निदान, उद्योग, वित्तीय क्षेत्र, आणि वाहतूक व्यवस्थापनात लागू होईल. एआयच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होतील. स्वयंचलित रोग निदान, वैद्यकीय उपचारांची अधिक अचूकता, आणि आरोग्य सेवांचे प्रभावी वितरण होईल. एआय आणि मनुष्य यांच्यातील सहकार्य वाढेल. यामुळे विविध उद्योगांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होईल, आणि हे दोन्ही एकमेकांना मदत करत कार्य करतील. एआय अनेक रोजगार संपवेल; पण अनेक निर्माणपण करेल. त्यामुळे त्याला स्पर्धक न मानता साहाय्यक मानणे सयुक्तिक ठरेल.
-
Bharat Viruddha Cheen Maitri Shakya Ka Nahi (भारत विरूद्ध चीन - मैत्री का शक्य नाही?)
भारत आणि चीन या दोन देशांतील संबंधांचा सखोल आणि समग्र वेध घेणारे, सर्वांत महत्त्वाचे पुस्तक आहे. ◆ “भारत विरुद्ध चीन” हे पुस्तक खरोखरच उत्तम आहे. यात कांती बाजपेयी यांनी भारत-चीन संबंधांचा इतिहास, राजकीय व लष्करी घडामोडी आणि दोन्ही देशांमधील संबंध कसे बदलत गेले याचं स्पष्ट आणि सोप्या भाषेत विवेचन केलं आहे. एखाद्या गंभीर विषयावर सखोल अभ्यास करून तो सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे. - रामचंद्र गुहा ◆ दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव वाढलेला असताना हे उपयुक्त पुस्तक अत्यंत योग्य वेळी आलेलं आहे. धोरणकर्ते आणि चीनबाबत अभ्यास करणाऱ्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे. - शशी थरूर
-
Nehrunchya 115 Ghodchuka (नेहरूंच्या ११५ घोडचुका)
घोडचुका' हा शब्दप्रयोग या पुस्तकात व्यापक अर्थाने वापरला आहे. त्यात केवळ चुकांचा समावेश नसून, नेहरूंना आलेली अपयशे, त्यांनी केलेले दुर्लक्ष, उपेक्षा, चुकीची राजकीय खेळी, महागात पडलेले निर्णय, आणि अकारण हडप केलेली पदं अशा अनेक बाबी मोडतात. या पुस्तकाचा हेतू नेहरूंवर केवळ टीका करणे नसून इतिहासातील कधी विपर्यास करून चमकदार मुलामा देऊन लपवलेल्या किंवा दडपलेल्या घटना सर्वांसमोर मांडणे हा आहे. जेणेकरून या चुकांची पुनरुक्ती होणार नाही आणि भारत उज्ज्वल भविष्याची आकांक्षा धरू शकेल. कुणी म्हणेल - नेहरूंवर एवढी माथेफोड कशासाठी? त्यांना सदेह आपल्यातून जाऊन बराच काळ उलटून गेलेला आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या बऱ्याच योजना आणि बरेच विचार आजही जिवंत आहेत. ते ज्या मार्गावर चालले तो चुकीचा होता हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.