-
Asadharan Hota Hota.. Bhagyashrunkhalanchi Manohar Kahani (असाधारण होता होता... भाग्यशृंखलांची मनोहर कहाणी)
सुखी, आनंदी आयुष्याचं प्रमाण हे दिशादर्शक असतं. 'किती' पेक्षा 'कुठल्या दिशेने' यावर ते अवलंबून असतं. विनोद आलकरी हे पेशाने इंजिनियर असल्यामुळे त्यांना यातील गाभा बरोबर उमजेल. 'टेल्स ऑफ ग्रोइंग लेस ऑर्डीनरी' हे विनोद आलकरी यांचे अनुभव आहेत, मंद गतीने चालणाऱ्या छोट्या शहरातील साधारण आणि मर्यादित आयुष्यातून सुटलेला त्यांच्या करियरचा बाण युनाइटेड नेशन्सच्या जागतिक पदाकडे कसा निर्देशित झाला हे या पुस्तकात अत्यंत रोचकपणे वाचायला मिळते. रिगवर प्रत्यक्ष काम करणाऱ्या या इंजिनीयरने आपला प्रत्येक चित्तथरारक अनुभव आपल्यासमोर जिवंत केला आहे. नंतर तो युनिसेफचा अधिकारी या त्याच्या बदललेल्या भूमिकेत आपल्याला भेटतो आणि त्याच्याबरोबर आपण नायजेरिया आणि इराकच्या भूमीत घडलेल्या प्रसंगांमध्ये सामील होतो. कार्लाइल या लेखकाने म्हटल्याप्रमाणे 'जगाचा इतिहास म्हणजे फक्त थोरामोठ्यांच्या चरित्रगाथा!' खरंच असं असतं का ? त्या महान लेखकाची माफी मागून असं म्हणावं लागेल की बऱ्याचदा या गाथा असत्य घटनांनी मढवलेल्या असतात. महानतेचा बुरखा पांघरलेल्या या कथा, 'काय' मिळवलं या विषयाभोवतीच घोटाळत राहतात. ते महान लोक जीवन 'कसं' जगले याचा मागमूसही त्यात नसतो. विनोद आलकरी यांचं 'टेल्स ऑफ ग्रोइंग लेस ऑर्डीनरी' हे कथन या महानतेच्या सापळ्यात न अडकल्यामुळे 'असाधारण' झालं आहे
-
Nave Nitisar (नवे नीतिसार)
मूल जन्माला आल्यापासून त्याचा खऱ्या अर्थाने माणूस बनण्यासाठी आई, वडील, गुरू व उन्नत समाज यांच्या मार्गदर्शनाची, सुदृढ व भक्कम पायाची त्याला नितांत आवश्यकता असते. हे खांब त्याच्या जीवनाला आकार देतात. मानवतेचा धर्म शिकवतात. संस्कारांचा त्याच्यावर योग्य तो परिणाम होतो. फक्त त्यासाठी श्रवण, वाचन, मनन याची गरज असते. मनात आले अनेक माणसांशी आलेल्या संबंधातून, घडलेल्या घटनांतून जे दिसले, मनात राहिले ते पुस्तकरूपात शब्दबद्ध करावे. विद्यार्थ्यांनी यातले थोडे फार नीतिसार उचलले किंवा त्यांच्या मनात राहिले तरी खूप काही मिळवल्यासारखे होईल.
-
Suvarnkan - Bhag 2 (सुवर्णकण - भाग 2)
खरे तर त्या काळात शिक्षकांची आर्थिक स्थितीही हालाखीची असे. अशा काळात संगेवार सर जेव्हा सांगतात, 'मनात प्रश्न साठवून ठेवू नका, शिकवताना काही समजले नाही तर केव्हाही मला विचारा, शाळेनंतर घरी येऊन विचारलेत तरी चालेल.' तेव्हा गणिताची भीती घालवून जगण्याची अगणित जिद्द देणारे संगेवार सर मात्र प्रातःस्मरणीय वाटतात. आज तुलनेने शिक्षकांची स्थिती पूर्वीहून बरी आहे. पण ते समर्पण आज क्वचित दिसते. 'सुवर्णकण' भाग २ वाचताना तो समर्पणाचा परीस आपणास लाभो ही शुभेच्छा! हे पुस्तक कोल्हापूर भागापुरते न राहता सर्वत्र जायला हवे. नेटके व महत्त्वाचे पुस्तक संपादन केल्याबद्दल संपादक डॉ. विजया वाड, शिल्पा खेर आणि मनीषा कदम यांचे अभिनंदन! -- श्री. प्रविण दवणे
-
Be Dune Panch ! (बे दुणे पाच!)
विविध दिवाळी अंकांतून वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ललित कथा लिहिणाऱ्या लेखिका म्हणून सारिका कुलकर्णी प्रसिद्ध आहेतच. साप्ताहिक मार्मिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या बे दुणे पाच या लेखमालेतून त्या, विनोदी लिखाण देखील तितकंच उत्तम करू शकतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. सारिका कुलकर्णीच्या लेखणीतून उतरलेला विनोद हा अस्सल मध्यमवर्गीय मराठी मातीत जन्मलेला आहे. तो ओढूनताणून आणलेला नाहीये, तो खुलविण्यासाठी थिल्लरपणाची रासायनिक खते वापरली नाहीयेत, तो बहरण्यासाठी सवंगतेची कीटकनाशके फवारली नाहीयेत. आजच्या पिढीचा शब्द वापरायचा तर त्यांचा विनोद अगदी ऑरगॅनिक आहे. सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यातील घटना, सण-उत्सव, त्यातील गमती, विसंगती ह्यांचं सूक्ष्म अवलोकन आणि त्यावर लेखिकेने केलेली मार्मिक नर्मविनोदी मल्लिनाथी वाचकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणते आणि बहुतेक सर्वच लेखांचा समारोप करताना त्यांनी केलेलं भाष्य वाचकांना अंतर्मुख करायला लावते हेच या पुस्तकातील लेखांचे यश आहे. मराठी साहित्यात सकस विनोदी लिखाणाला वाचकांकडून मागणी खूप असली तरी त्यामानाने पुरवठा अगदीच कमी आहे. विनोदी लिहिणाऱ्या लेखिकांची तर अक्षरशः वानवाच आहे. या पार्श्वभूमीवर दर्जेदार, निर्विष विनोदाच्या शोधात असणारे मराठी वाचक, सारिका कुलकर्णीींच्या 'बे दुणे पाच' या लेखसंग्रहाचे जोरदार स्वागत करतील अशी आशा आहे. --- सॅबी परेरा
-
Jagavegala Lindbergh (जगावेगळा लिंडबर्ग)
'तुमच्या वयांमध्ये अंतर बरंच आहे गं,' आईनं मुलीला विचारलेल्या प्रश्नाला बगल देत तिनं लग्न केलं पण आईची शंकाच खरी ठरली. विसंवादी असलेल्या (लिंडबर्ग) दांपत्याचा मुलगा पुढली अनेक वर्षे एकाकी आयुष्याचा 'भागीदार' ठरला. बालवयात त्यानं आकाशात उडणारं चिमुकलं विमान पाहिलं... काही वर्षांनी विमानांच्या स्पर्धा पाहिल्या. विमानविषयक प्रेमाचं बीज तेव्हाच त्याच्या मनात अंकुरलं... सुरुवातीच्या काळातील वेड्या साहसकृत्यांमुळे तो 'उडता वेडा' (Flying Fool) ठरला. त्याच वेडापायी त्यानं उत्तुंग झेप घेतली आणि तो जगातील सर्वोत्कृष्ट साहसवीर ठरला...सुखसमृद्धीची सोनेरी पहाट उगवली, मनाजोगती सुविद्य, सुसंस्कृत सहचारिणी मिळाली, संसार बहरला आणि एक दिवस वीजप्रपात झाला... आयुष्यानं नवं वळण घेतलं, नवी आव्हानं समोर ठाकली त्यांनाही तो पुरून उरला..पुन्हा नव्यानं जन्मला, पुनःपुन्हा जन्मला, खंडप्राय मातृभूमीच्या राष्ट्राध्यक्षांना आव्हान देत दंड ठोकून तो उभा राहिला. आयुष्याच्या मध्यावर उभा असताना प्रत्यक्ष युद्धाच्या धुमश्चक्रीत त्यानं पुन्हा एकदा 'साहसवीर' हे बिरुद सार्थ ठरवलं. सेनेमधला सर्वोच्च मान- 'ब्रिगेडियर जनरल' - मिळवला. पण ही तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची केवळ एक बाजू... अनेक अंगांनी त्याचं व्यक्तिमत्त्व झळाळून उठलं. विमानक्षेत्रात भरीव कामगिरी करणारा कुशल प्रशासक, एक वैज्ञानिक, एक लेखक, एक पर्यावरणप्रेमी ही त्याची आणखी काही लोभस रूपं... असा हा कोण जगावेगळा पुरुषोत्तम ?
-
Periplus Of Hindusthan Khand 2 (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा खंड २)
अज्ञाताचा शोध ही मानवाची आदिम काळापासूनची प्रेरणा. क्षितिजापारच्या अवकाशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपली वस्ती, आपली माणसं, आपला प्रदेश आणि सारं काही मागे ठेवून तो निघतो.... जग जिंकायच्या ईर्ष्यने खैबर खिंड ओलांडून आलेला अलेक्झांडर सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरून परततो. त्यानंतर कुणी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकस निकोटरचा ग्रीक राजदूत म्हणून राहतो आणि तत्कालीन भवताल 'इंडिका' नावाने नोंदवून ठेवतो. मेगॅस्थेनिसचा 'इंडिका', अज्ञात नाविकाचा 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी', अल्बेरुनीचा 'तहकिक-ए-हिंद' किंवा अफानासी निकितीनच्या 'नोटस'... अशा मूळ ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरबी, चिनी, रशियन दस्तावेजांतून सुमारे दोन हजार वर्षांचा तत्कालीन हिंदुस्थानचा सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला... खरं तर, फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा!
-
Periplus Of Hindusthan Khand 1 (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा खंड १)
अज्ञाताचा शोध ही मानवाची आदिम काळापासूनची प्रेरणा. क्षितिजापारच्या अवकाशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपली वस्ती, आपली माणसं, आपला प्रदेश आणि सारं काही मागे ठेवून तो निघतो.... जग जिंकायच्या ईर्ष्यने खैबर खिंड ओलांडून आलेला अलेक्झांडर सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरून परततो. त्यानंतर कुणी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकस निकोटरचा ग्रीक राजदूत म्हणून राहतो आणि तत्कालीन भवताल 'इंडिका' नावाने नोंदवून ठेवतो. मेगॅस्थेनिसचा 'इंडिका', अज्ञात नाविकाचा 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी', अल्बेरुनीचा 'तहकिक-ए-हिंद' किंवा अफानासी निकितीनच्या 'नोटस'... अशा मूळ ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरबी, चिनी, रशियन दस्तावेजांतून सुमारे दोन हजार वर्षांचा तत्कालीन हिंदुस्थानचा सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला... खरं तर, फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा!
-
Lokshahi Aani Hukumshahi (लोकशाही आणि हुकूमशाही)
आदरणीय नरेंद्रजी चपळगावकर यांचा आपल्या सर्वांचे प्रबोधन करणारा एक ग्रंथ आपल्या भेटीसाठी येत आहे. ते लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे पुरस्कर्ते व अभ्यासक आहेत. विचारस्वातंत्र्यासाठी आपल्या लेखणीने व वाणीने त्यांनी लढा दिला आहे. साहित्यसंमेलनातील विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे त्यांचे भाषण अविस्मरणीय होते. अनेकांना हे भाषण ऐकून कै. दुर्गाबाई भागवतांच्या प्रसिद्ध भाषणाची आठवण झाली. चपळगावकर यांचे लेखन व त्यांची भाषणे अतिशय संयत व समतोल असतात. ते विचार स्पष्टपणे मांडतात, पण त्यात अभिनिवेश नसतो. ते कधीही दुसर्यााच्या मताचा अनादर करीत नाहीत. सध्याचा काळ हा आक्रस्ताळेपणाने विचार व्यक्त करण्याचा व न पटणार्यास विचारांचा अवमान करण्याचा काळ आहे, असे कधीतरी वाटते. या काळात चपळगावकरांचे लेखन व त्यांची भाषणे फार आशादायक वाटतात. लोकशाही समाजवाद व गांधीवादाचे ते नुसतेच पुरस्कर्ते नाहीत, तर ते विचार ते प्रत्यक्षपणे आचरणात आणतात. लोकशाही संस्कृतीचा पुरस्कार करणार्यांेना त्यांचे लेखन आशेच्या किरणासारखे वाटते. न्या. अभय ओक, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सशक्त लोकशाहीसाठी अत्यावश्यक असलेले विचारमंथन लोकशाही आणि हुकुमशाही
-
Anhad (अनहद)
अनहद' हा मनातील निःशब्द शांततेला शब्दांत उतरविण्याचा वैशिष्ट्यपूर्ण ललितघाट. चिमुकल्या काळातील हा हृदयसंवाद आहे. 'तो' आणि 'ती' यांच्याबरोबरच 'स्व'शी तसेच सृष्टिविषयीची ही अनावर अशी संवादरूपे आहेत. या लेखनविश्वात प्रत्यक्षातल्या जगापेक्षा एका वेगळ्या जगाची खेच आहे. ते जग म्हणजे भूतकाळ, आदिमता आणि अमूर्ताचे जग. प्रत्यक्षातले जग हे मानवी अस्तित्व छाटणारे जग आहे. या जगात आणि स्वप्नसृष्टीत ताणतणाव आहेत. त्यामुळे भोवतालच्या जगाला म्यूट करून विहिरीतळातील जिवंत झऱ्यांच्या सृष्टीबद्दलचा जिव्हाळाभाव त्यामधून प्रकटला आहे. त्याच्या जोडीला चंद्र चांदवा, चांदणं, चांदुकली, जलदेवता आणि झाडफुलांच्या मोहमायारूपी ऋतुचक्राच्या नांदवणुकीचे भरगच्च संदर्भ आहेत. एका अर्थाने या जगात झेपविसावा आहे. टेकडीबाईच्या त्रिकोणाची हवीहवीशी नजर आणि अनेक 'हाकां'चे ध्वनी - प्रतिध्वनी आहेत. याबरोबरच काव्यनिर्मितीची अनामिक हुरहुर आणि त्या तरुतळी विसरलेल्या गीतांचा आठव आहे. स्त्रीजीवनाच्या संदर्भात खास भारतीयत्वाचे संदर्भ आहेत. त्यामुळेच आभाळओल्या हळदकुंकवाच्या ओढीचा स्त्रीचिंतनाचा पैस त्यास लाभला आहे. स्वप्नील जगाबरोबर काही प्रमाणात गतकातरता, रोमँटिकतेच्या आकर्षणाबरोबरच सहजसंवादी सलगीची भाषा, काव्यात्मता, चिंतनशीलता, दृश्य रंगसंवेदनांचे घनदाट प्राचुर्य, संगीतादिचित्रांचे संदर्भ, हिंदी-उर्दूतील मिठीजुबान आणि मोहक शब्दकळेचे आकर्षण ही या गद्याची वैशिष्ट्ये होत. भाषेतील पद्मनादमेळाचे विलक्षण आकर्षण या गद्यशैलीस आहे. त्यामुळे, या ललितगद्यास खुल्या प्रसरणशील ललितगद्याचा घाट प्राप्त झाला आहे. 'अनहद' नादाचे प्रतिध्वनी वाचकांना बहुमुखी अर्थवलयांचा नक्कीच भरगच्च प्रत्यय देतील. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे
-
Nani Palkhiwala (नानी पालखीवाला)
नानी पालखीवाला : एक सहृदयी, सुसंस्कृत वकील' हे पुस्तक नानी पालखीवाला यांच्या जीवनावर आधारित आहे. ते त्यांच्या जीवनाचे विविध पैलू आपणास दाखवते. या पुस्तकाचे हस्तलिखित वाचताना प्रकर्षाने जाणवले, की पुस्तकाचा आशय खूप विस्तृत व अंतरंगाला भिडणारा आहे. हे पुस्तक ॲड. विजय गोखले यांनी मोठ्या प्रयासाने, अभ्यासपूर्ण असे लिहिलेले आहे व मोठ्या खुबीने वाचकांसमोर मांडलेले आहे. नानाभॉय आर्देशीर पालखीवाला ह्यांना सर्व नानी पालखीवाला या नावाने ओळखतात. पुस्तकाचे नावच त्यातील आशय दर्शवते. नानी पालखीवाला यांच्या स्वभावातील व आयुष्यातील वेगळे पैलू लेखकाने वाचकांच्या समोर समर्पकपणे मांडले आहेत. 'नानी पालखीवाला ही परमेश्वराने भारताला दिलेली देणगी आहे' हे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी काढलेले उद्गार यथोचित आहेत. नानी पालखीवाला यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते कायदेपंडित तर होतेच, शिवाय एक निष्णात अर्थतज्ज्ञ, करतज्ज्ञ व उत्कृष्ट वक्ते होते. त्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व हे वादातीत व असामान्य होते. ही असामान्यता त्यांना मिळालेली जन्मजात किंवा निसर्गदत्त देणगी नव्हती तर त्यांनी प्रचंड मेहनत व प्रयत्न यांच्या साहाय्याने ती विकसित केली होती. लहानपणापासूनच ते महत्त्वाकांक्षी होते व एखादे काम करायचे ठरवल्यास ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा ध्यास घेत व ते पूर्ण झाल्यावरच स्वस्थ बसत. त्यांना लहान-पणापासूनच वाचनाची प्रचंड आवड होती. विविध विषयांवरील पुस्तके ते वाचत असत. त्यांच्या वाचनछंदाच्या अनेक मार्मिक गोष्टी व किस्से लेखकाने या पुस्तकात उद्धृत केले आहेत.
-
Niragastecha Najarana (निरागसतेचा नजराणा)
बालकांच्या मनोविश्वातील स्वर्गीय रंगांची दुनिया कलावंत किती संवेदनशीलतेने... तरलतेने आपल्यासमोर खुली करतात. बालमनाची निरागसता केवळ मौनातून, मंद-स्मितातून बोलती करतात. बालकांचे निरभ्र... नितळ... निर्मळ मन... जाती, धर्म, देश, रंग, रूप यांच्या सीमा पार करून आपल्याशी संवाद साधतं. कोमेजलेल्या मनाला पुलकित करण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यांचं रूपडंच मुळात आरस्पानी! त्यांच्या पारदर्शीपणात आपण आपलं प्रतिबिंब पहावं... आणि आपणच लख्ख होऊन जावं !!