-
Bhutkalantun Mukti Vartamanashi Maitri (भूतकाळातून मुक्ती वर्तमानाशी मैत्री)
* तुम्हीच आहात तुमचे उत्तम डॉक्टर * मन आणि शरीरावरील उपचारांचा अभ्यास * आघातांमधून (ट्रॉमा) बाहेर कसे यावे * विश्वासाची शक्ती * स्व जागरूकता * तुमच्यात लपलेल्या लहान मुलाची भेट आणि पुनर्पालकत्व * मन, शरीर आणि आत्मा यांच्या आरोग्यासाठी वेगळा शास्त्रीय दृष्टिकोन
-
Karna Putra (कर्ण पुत्र)
“आचार्य आपण मला शिकवण्यास नकार का दिला?” आचार्य शांतच होते. काही क्षण तसेच गेले. “युगंधर कुठे आहे? त्याला तुम्ही कुठे पाठवलंय का? नक्की काय चाललंय? माझ्याशी कोणी बोलत का नाही?” तो एकामागे एक प्रश्न विचारत होता. आचार्य मात्र शांत होते. “सुवेध एक मोठा श्वास घे...” आचार्यांनी आपलं मौन तोडलं. “तुझ्यासारखा शिष्य मिळणं हे कुठल्याही गुरूचं भाग्यच असेल. तुला मी नाकारत नाहीये. परंतु माझ्या मनात दुसरीच काही योजना चालली आहे. तुझ्या क्षमतांचं योग्य प्रकटीकरण करायचं असेल तर त्याला त्याच ताकदीचा गुरू हवा. मी तुला कदाचित शस्त्रांमध्ये पारंगत करेन. परंतु तुझी क्षमता अस्त्रांवर प्रभुत्व मिळवण्याची आहे. पण त्यासाठी तुला योग्य स्थानी जावंच लागेल.” “अस्त्र?” सुवेधच्या शब्दांमध्ये प्रश्न डोकावत होता. “शस्त्र ही कला आहे, कौशल्य आहे. पण अस्त्र ही विद्या आहे. शस्त्रांचं कौशल्य आत्मसात करता येतं. पण अस्त्रांची विद्या मिळवण्यासाठी मात्र योग्य गुरू लागतात. अर्थात हे मिळवण्यासाठी तुला खूप संघर्ष करावा लागणार आहे. पण...” असं म्हणून शैलाचार्य शांत झाले. काही काळ शांततेत गेला. “काय आचार्य?” सुवेधला ही शांतता सहन होत नव्हती. “काही प्रश्नांची उत्तरं मिळवल्याशिवाय मला पुढचा मार्ग दिसत नाही आणि तुला कोणाकडे पाठवावं याचा संकेतही मिळत नाही.”
-
Aabhjan Priyajan (अभिजन प्रियजन)
बहुआयामी, बहुरंगी व्यक्तिचित्रांचा किंवा शब्दचित्रांचा हा संग्रह म्हणजे एका अर्थाने जयराज साळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आरसाच आहे. त्यांच्या व्यासंगाचा आवडीचा आवाका बघून अचंबित होणे एवढेच आपल्या हाती उरते. चोखंदळ वाचन, नुसते पाहणे नाही तर खोलात जाऊन पूर्ण माहितीसह जीवनाचा आस्वाद घेणे या वृत्तीमुळेच असे लिखाण करणे शक्य होते आणि सोबत वाचकालाही समृद्ध करते ! -- रघुवीर कुल
-
Jane Kaha Gaye Wo Din (जाने कहां गये वो दिन)
वर्तमानकाळ चैतन्यशीलपणे जगतानाही आपल्या प्रत्येकाच्या मनात लहानपणी किंवा तरुणपणी जी पुस्तके वाचली, जे संगीत ऐकले अथवा जे नाटक वा चित्रपट पहिले, त्यांच्या आठवणी मनात रुतलेल्या असतात. `जाने कहाँ गये वो दिन' या पुस्तकात नामवंत लेखक बाबू मोशाय उर्फ हेमंत देसाई यांनी अमिताभ, प्राण, वहिदा रहमान, धर्मेंद्र, शशी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर, विनोद खन्ना, प्रदीपकुमार असे अनेक कलावंत तसेच गीतकार आनंद बक्षी यांच्यावर देखील आपल्या रसिल्या शैलीत लिहिले आहे. दुर्मिळ माहिती, भन्नाट किस्से आणि वेधक व्यक्तिचित्रे हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
-
1948 ch Agnitandav (१९४८ चं अग्नितांडव)
कित्येक गावांतून ब्राह्मणांची घरं जाळली, त्यांना एका रात्रीत देशोधडीला लावलं असं असलं तरी...काही गावांमध्ये लोकांनी ब्राह्मणांना मदतीचा हात पुढं केला. त्यांचे जीव, त्यांचे संसार वाचवले. जातीजातींमधल्या भांडणांनी आपण आपलं आणि आपल्या देशाचं किती मोठं नुकसान करतो याची जाणीव ठेवून सामान्य माणसाने जगलं पाहिजे, हे अधोरेखित करणारं... १९४८चं अग्नितांडव...!
-
Yogache Vishwa-Vishwatla Yog (योगाचे विश्व- विश्वातला योग)
२१जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हायला लागून दहा वर्षे झाली. प्राचीन भारतीय ज्ञान, परंपरा , सौम्य संपदा म्हणून योग जगमान्य होत आहे. त्याचबरोबर काही आव्हाने सुद्धा आहेत. आज जगातला योग कसा आहे व योगाचे जग कसे असायला हवे याबद्दलचा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक. योग हा व्यवसाय म्हणून बाजारपेठेच्या आधीन होणे ,अशा आव्हानांची चर्चा सुद्धा हे पुस्तक करते.. भारतासमोर उभ्या असलेल्या योग अपहरणाच्या धोक्याची स्पष्ट जाणीव सुद्धा या पुस्तकातून होते . वैश्विकरणाच्या युगात योगाचा आर्थिक, सांस्कृतिक , मुत्सद्देगिरी व सौम्य संपदा म्हणून वेध घेणारे मराठी मधले किंबहुना भारतातले हे पहिलेच पुस्तक आहे. म्हणून याचे विशेष महत्त्व. नक्की आपल्या संग्रही ठेवावे, वाचावे इतरांनाही वाचण्यासाठी प्रवृत्त करावे असे हे पुस्तक
-
Kanya Zali Ho (कन्या झाली हो)
भारतीय समाजाने स्त्रियांवर हजारो वर्षे अनन्वित अत्याचार केले. याविरूद्ध राजाराम मोहनरॉय, महात्मा फुले वगैरेंनी आवाज उठवला आणि स्त्रियांच्या प्रगतीचा मार्ग हळूहळू मोकळा होत गेला. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात असं लक्षात आलं की स्त्रियांवर अन्याय फक्त भारतातच होतात असं नाही, युरोप/अमेरिकासारखे प्रगत देशसुद्धा याला अपवाद नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५-१९८५ हे 'स्त्रीमुक्तीचे दशक' म्हणून घोषित केले. यामुळे स्त्रीमुक्तीला जागतिक आयाम प्राप्त झाला. याचे जगभर परिणाम झाले तसेच पडसाद उमटले. असेच पडसाद मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या, एका विवाहित, मध्यमवयीन, लेकुरवाळ्या, ब्राह्मणेतर, प्राथमिक शाळेत शिकवत असलेल्या स्त्रीच्या जीवनात उमटले. स्त्रीमुक्तीच्या या जागतिक वाऱ्यांनी तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. त्याची ही कहाणी.
-
Bharat Pakistan yudha -1965(भारत पाकिस्तान युद्ध -१९६५ )
1965 साली झालेलं भारत पाकिस्तान युद्ध इस्लामिक स्टेट ऑफ पाकिस्तानने भारतीयांवर लागलेल्या अनेक युद्धांपैकी एक युद्ध होतं. या युद्धात आपल्या सेना दलाने अत्यंत पराक्रम आणि सर्वोच्च बलिदान करून लष्करी विजय मिळवला. भारतीयांचं मनोबलही काही पटीने उंचावण्यास हातभार लागला हे त्रिवार सत्य आहे. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या आदरणीय लाल बहादूर शास्त्रीजी आणि संरक्षण मंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी पाकिस्तानी इस्लामिक स्टेट च्या सशस्त्र आक्रमणाला सशस्त्र प्रतिकाराने उत्तर देण्याचा निर्णय घेतला हेही उत्तमच झाले. त्याच 1965 च्या युद्धाची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. सर्वांच्या संग्रही असावे असे हे ५७६ पानी पुस्तक.