-
Congress Viruddha Maharashtra (काँग्रेस विरुद्ध मह
आचार्य अत्रे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता; पण काही कारणाने अत्रे आणि काँग्रेस यांच्यात वितुष्ट आलं आणि अत्रे काँग्रेसच्या बाहेर पडले. अत्र्यांनी काँग्रेसवर, विशेषत: यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंवर आपल्या लेखणीने नेहमीच शरसंधान केलं. ‘काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र’ या पुस्तकातून अत्र्यांमधील कट्टर काँग्रेस विरोधकाचं दर्शन घडतं. यशवंतरावांची नेहरूनिष्ठा आणि नेहरूंचा महाराष्ट्रद्वेष यावर अत्र्यांनी कडाडून टीका केली. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात घेतलेली भूमिका, आणीबाणीच्या वेळी यशवंतरावांनी काँग्रेसचा केलेला त्याग आणि त्यादरम्यान इंदिरा गांधींनी त्यांची केलेली निंदा आणि यशवंतरावांची मलिन झालेली प्रतिमा, भाषावार प्रांतरचनेला नेहरूंनी केलेला विरोध इ. अनेक महत्त्वाच्या घटनांवर या पुस्तकातून तपशीलवार भाष्य करण्यात आलं आहे आणि अत्र्यांच्या निर्भीड, पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचं दर्शनही घडवलं आहे.
-
Never Go Back (नेव्हर गो बॅक)
मिलिटरी पोलीस म्हणून सैन्यामधून निवृत्त झालेला जॅक रीचर हा सडाफटिंग, असामान्य बुद्धीचा, ताकदवान माणूस. त्याच्यावर सोळा वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचा आरोप ठेवण्यात येतो आणि त्याला पुन्हा सैन्यात भरती करून घेण्यात येते. तसंच त्याला एका प्रेमप्रकरणातही अडकवण्यात येतं. त्याला कोण आणि का गुंतवत असतं अशा आरोपांत? एका अफगाणीने दोन डेप्युटी चीफ्स ऑफ स्टाफ्सच्या मदतीने चालवलेला बेकायदा व्यापार... रीचरने या सर्वच प्रकरणांचा लावलेला छडा
-
Shubh Shubhmangal (शुभ शुभमंगल)
पति-पत्नी ही संसाररथाची दोन चाके आहेत. काही वेळा वाद, मतभेद, भांडण यामुळे ही चाके कुरकूर करू लागली तरी प्रेम, सामंजस्य यांचं वंगण घालून ती चाकं चालती ठेवणं महत्त्वाचं. वाद, मतभेद टोकाला जाऊ न देण्यासाठी काय करावं, याचं मार्गदर्शन करणारं, वैवाहिक नात्यात निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांचे परिणाम यांचा विचार करतानाच त्यावरील उपाययोजना सुचवणारं, सुखी वैवाहिक जीवनाचा मूलमंत्र देणारं पुस्तक.
-
The Mute Anklet (द म्यूट अँक्लेट)
म्हैसूरचे संस्थानिक महाराज. उमा ही त्यांच्या मृत बहिणीची आणि वॉरेन या ब्रिटिश सैनिकाची मुलगी. म्हैसूरच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला इंग्रज सैन्यातील देखणा ब्रिटिश तरुण अॅश्टन एका नाट्यमय प्रसंगामुळे महाराजांच्या तावडीत सापडतो. ते त्याच्यासमोर उमाशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवतात. उमाच्या मनात ब्रिटिशांविषयी द्वेष आणि अॅश्टनलाही विवाहबंधनात अडकायचं नसतानाही त्यांचा विवाह होतो. अॅश्टनशी झालेला विवाह हा उमाच्या जीवनातील नावडता, तरी महत्त्वाचा अध्याय आहे. तर दुसर्या बाजूला उमाकडे असलेल्या एका वस्तूमुळे (ज्या वस्तूबद्दल ती स्वत: अनभिज्ञ आहे) तिच्यावर हल्ल्याचे, तिच्या अपहरणाचे प्रयत्न होत आहेत. उमा आणि अॅश्टनचं वैवाहिक जीवन फुलतं का, तिच्याजवळ असलेल्या वस्तूचा शोध तिला लागतो का आणि ती वस्तू कुणाला आणि का हवी असते, याचं काय रहस्य असतं? ऐतिहासिक पार्श्वभूमीवर फुललेली एक हळुवार, रहस्यमय प्रेमकहाणी.
-
The Innocent Man (द इनोसंट मॅन)
अडा या ओक्लाहोमाच्या छोट्या गावातील रॉन विल्यमसन... बेसबॉलमध्ये उज्ज्वल भविष्य असताना दारू आणि अमली पदार्थांच्या आहारी गेलेला, विचित्र वागणारा, आईबरोबर राहणारा एक बेरोजगार, घटस्फोटित, मानसिक विकारांनी त्रस्त तरुण.. नाइट क्लबमध्ये काम करणाऱ्या डेबी कार्टर या कॉकटेल वेट्रेसवर अमानुष बलात्कार करून तिचा खून करण्यात येतो... खुनाच्या आदल्या रात्री ग्लेन गोअर या माणसाबरोबर तिला पाहिल्याचं बNयाच साक्षीदारांनी सांगूनही रॉन विल्यमसनवर या खुनाचा आळ येतो... त्याला खुनी ठरवणारा एकमेव साक्षीदार असतो ग्लेन गोअर... रॉनचा मित्र डेनिस प्रिÂट्झ यालाही त्यात अडकवलं जातं... डेनिसला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येते, तर रॉनला मृत्युदंडाची...ते दोघं आपलं निरपराधित्व सिद्ध करू शकतात का याचा थरारक वेध घेणारी सत्य घटनेवर आधारित कादंबरी द इनोसन्ट मॅन
-
A Quiver Full Of Arrows (अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज)
जेफ्री आर्चर यांचा ‘अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज’ हा कथासंग्रह शीर्षकाला अगदी सार्थ ठरवणारा आहे. जेफ्रीच्या भात्यातला प्रत्येक बाण अगदी धारदार आहे. या बारा कथांमधील प्रत्येक कथा वाचकांच्या मनावर जबरदस्त परिणाम घडवून आणते. कथालेखनात जेफ्री आर्चर यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्यांच्या कथेचा शेवट नक्की कसा होणार आहे याचा अगदी शेवटच्या ओळीपर्यंतसुद्धा वाचकाला अंदाज येऊ शकत नाही. या पुस्तकातील बारा कथांपैकी प्रत्येक कथा एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी, एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणात घडते. मग ते ठिकाण प्राचीन बेथलहेम असो नाहीतर ब्राझीलमधील पंचतारांकित हॉटेल असो. एक गोष्ट तर उघडच आहे, या प्रत्येक ठिकाणाचा, तसंच गोष्टीत चित्रित केलेल्या कालखंडाचा जेफ्री आर्चर यांनी तपशीलवार अभ्यास केलेला आहे. त्या संदर्भात पुष्कळ संशोधन केलेलं आहे. जेफ्री यांच्या कथांचे विषयही अत्यंत वैविध्यपूर्ण असतात. प्रेम, राजकारण, विनोद यांपैकी कोणत्याही विषयावरील त्यांची कथा तेवढीच रोचक आणि उत्कंठावर्धक असते. जेफ्री आर्चर यांना ‘मास्टर स्टोरीटेलर’ असं म्हटलं जातं, कारण विंचवाचा डंख जसा त्याच्या शेपटीच्या टोकात असतो, त्याचप्रमाणे जेफ्री यांच्या प्रत्येक कथेचा शेवट वाचकांची मती गुंग करून टाकणारा असतो. शेवटच्या क्षणी त्यांची कथा असं काही अनपेक्षित, वेगळंच वळण घेते की, वाचकाला आधी त्याचा काही अंदाजच येऊ शकत नाही. अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज हा कथासंग्रहही याला अपवाद नाही. सोदबीज्च्या लिलावगृहामध्ये खरेदीसाठी आलेल्या एका कलासक्त रसिकाला, एका लहानशा संगमरवरात कोरलेल्या चिनी मूर्तीमध्ये एक विलक्षण रहस्य दडलेलं सापडतं. अभिजात साहित्याच्या अभ्यासात रममाण होणारा एक तरुण आणि एक तरुणी परस्परांशी स्पर्धा, हेवेदावे आणि चढाओढ करता करता एकमेकांमध्ये असे काही गुंतून जातात, की तो अनुबंध त्यांच्या मृत्यूनंतरही तुटत नाही. न्यूयॉर्कच्या एका पंचतारांकित मेजवानीच्या वेळी अनपेक्षितरीत्या एका लेखकाची गाठ त्याच्या जुन्या चाहत्याशी पडते आणि ती त्याला भूतकाळात घेऊन जाते.
-
Kar Har Maidan Fateh (कर हर मैदान फ़तेह)
सबंध महाराष्ट्रातील तरुणाईच्या गळ्यातला ताईत आणि उत्तुंग मनोबल व धैर्यानं दहशतवाद्यांशी दोन हात करणारं पराक्रमी व्यक्तिमत्त्वं म्हणजे श्री.विश्वास नांगरे पाटील. त्यांचा आजवरचा प्रवास, पोलीस अधिकारी म्हणून जडणघडण होत असतानाचे टक्केटोणपे आणि गुन्हेगारी जगतावर त्यांनी बसवलेला चाप, या सर्वाची दमदार यशोगाथा म्हणजे श्री. विश्वास नांगरे पाटील यांचं ‘कर हर मैदान फ़तेह’ हे पुस्तक. एका ग्रामीण युवकाचं एका अधिकाऱ्यात रूपांतर होत असतानाचे विलक्षण अनुभव आणि त्या अनुभवांच्या आधारे घडलेली यशस्वी कारकीर्द यांचा सांगोपांग आढावा म्हणजे हे पुस्तक.
-
A Twist In The Tale (अ ट्विस्ट इन द टेल)
कार्लाचा खून होतो... एक इन्शुरन्स एजंट मेन्झीस आणि तिचा प्रियकर कॅसानोव्हा तिच्या खुनाच्या आधी वेगवेगळ्या वेळी तिच्याकडे आलेले असतात...कुणी केलेला असतो खून?...भ्रष्टाचाऱ्यांचं पितळ उघडं पाडणारा नायजेरियाचा अर्थमंत्री इग्नेशियस एका स्विस बँकेच्या चेअरमनकडून त्या बँकेतील खात्यांचे तपशील प्राप्त करण्यासाठी त्याच्या डोक्याला पिस्तूल लावतो... मल्टाव्हियाच्या राजाकडून जेराल्डला सोन्याचा एक रत्नजडित हार बक्षीस म्हणून मिळतो...काय होतं त्या हाराचं? धक्कादायक शेवट असलेल्या कथा
-
The Railway Man (द रेल्वे मॅन)
मलाया-सियामच्या निबिड जंगलात जपान्यांनी बलाढ्य ब्रिटिश सैन्याला शह दिला. अतिशय दुष्टप्राप्य खडतर अशा रेल्वे मार्गाच्या उभारणीचा चंग जपानी सैन्याने बांधला व त्यासाठी तब्बल २,००,००० दोस्त राष्ट्रांच्या ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन सैनिकांना युद्धबंदी बनवून त्यांच्याकडून हया रेल्वेमार्गाची उभारणी केली. वैयक्तिक पातळीवर ही अमानुषता अनुभवलेल्या एका सैनिकाची ही प्रथमपुरुषी कहाणी, परंतु एका विशिष्ट कालखंडाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी अद्भुत कथा.
-
Aagaman (आगमन)
अविचल...तंत्रविद्या कोळून प्यायलेला एक श्रीमंत तरुण...वामपंथीयांच्या तावडीत सापडलेल्यांची सुटका करण्याचं काम निरपेक्षपणे करणारा... श्रीनिवास...एका खेडेगावातील पुजाऱ्याचा तरुण मुलगा...प्रिया नावाच्या तरुण मुलीच्या माध्यमातून हंबीर नावाचा वामपंथी त्याच्यावर जाळं टाकतो...श्रीनिवास त्या जाळ्यात पुरेपूर अडकतो... अविचल त्याची त्या जाळ्यातून सुटका करतो...बाहेरची बाधा झालेल्या तनयाची बाधा उतरवायला एका गूढ वाड्यात अविचल जातो आणि तनयाच्या आजीच्या जाळ्यात सापडतो...अविचलचा मित्र भैरव आणि दत्तभक्त पाठक त्या जाळ्यातून अविचलला सोडवतात आणि अविचल तनयाच्या आजीला धडा शिकवतो...वांचूमाळ या आदिवासी माणसाबरोबर अविचल आणि त्याच्यासारखे काही तांत्रिक वांचूमाळच्या गावी पोचतात आणि मृत्यूच्या सापळ्यात अडकतात...थरारक घटनांची रेलचेल असलेल्या उत्कंठावर्धक लघुकादंबऱ्या ‘‘वेताळाय नम:। तीव्राय नम:। तमनायकाय नम:।’’ असं म्हणत त्यांनी मद्याने भरलेल्या उलट्या वलयाच्या शंखातून धार ओतून विचमन केलं आणि जारण मंत्राच्या पठणाला त्यांनी सुरुवात केली. जारण मंत्राच्या जबर तडाख्याखाली अविचलचं मन होलपटलं. खोल भोवऱ्यात सापडल्याप्रमाणे अविचलचं मन चोळामोळा होण्यापूर्वी त्याच्या मनात लख्ख प्रकाश पडला. तनयाचं झपाटणं म्हणजे फक्त आमिष होतं! खरं सावज तर तोच होता. त्याचं मन पूर्ण असंरक्षित आणि बेसावध असताना त्याच्यावर जारण जागवता यावं म्हणून हा सर्व खेळ काळजीपूर्वक आखला गेला होता. तनयाचं संरक्षण करताना जेव्हा त्याच्या शक्ती पूर्णपणे एका दिशेने एकवटल्या गेल्या होत्या, त्या वेळी त्याच्यावर हल्ला करण्याचा हा कावा भ्याडपणाचा होता यात शंकाच नव्हती! पण वाममार्गात योग्य काय आणि अयोग्य तरी काय?
-
Factory Girls (फॅक्टरी गर्ल्स)
छांग यांनी त्यांच्या कुटुंबाच्या चीनअंतर्गत स्थलांतराची आणि त्यानंतर पश्चिमेकडच्या स्थलांतराची कहाणी कुशलतेनं गुंफली आहे. चीनमध्ये अंदाजे १३ कोटी स्थलांतरित कामगार आहेत. त्यांपैकी जवळजवळ सगळेच तिशीच्या आतले आहेत. फॅक्टरी गर्ल्स पुस्तकामध्ये लेस्ली टी. छांग यांनी प्रामुख्याने दोन तरुणींची जीवनकथा उलगडून या कामगारांची कहाणी मांडली आहे. तोंगकुआन या औद्योगिक शहरामध्ये या दोघी तरुणी करिअरमध्ये असेम्ब्ली लाइनपासून मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नांत असतानाच्या तीन वर्षांतला त्यांचा जीवनसंघर्ष लेखिकेनं त्यांच्या सोबत राहून प्रत्यक्ष अनुभवला. छांग यांनी स्वतःचं रुग्णालय असलेला महाकाय स्नीकर कारखाना, विद्यार्थी अतिशय समर्पणानं शिकत असलेले इंग्रजीचे वर्ग, आणि मुलींना घर सोडून बाहेर पडायला लावणारी गरिबी आणि रिकामपणानं ग्रासलेली शेतीप्रधान गावं अशा ठिकाणांची सफर आपल्याला घडवली आहे. जागतिक स्तरावर अतिशय महत्त्वाचे असलेले फॅक्टरी गर्ल्स हे पुस्तक, ग्रामीण भागातल्या गावांपासून शहरांकडे होत असलेल्या प्रचंड स्थलांतरामुळे चिनी समाजामध्ये कसे बदल घडवत आहे, हे दर्शवते.
-
Prescriptions For Living (प्रिस्क्रिप्शन्स फॉर लिव
‘लव्ह, मेडिसिन अँड मिरॅकल्स` या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाच्या लेखकाकडून आयुष्याबद्दल हे व्यावहारिक आणि प्रेरणादायी धडे सादर करत आहोत. तन–मनाच्या औषधांचे प्रणेते डॉ. बर्नी सिगल यांनी आपल्या प्रात्यक्षिकामधून नवा पाया रचला आहे. सकारात्मक दृष्टिकोन नि प्रेम देण्याघेण्याची क्षमता यांचा फार मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर, बरे होण्याच्या आपल्या क्षमतेवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर होत असतो. हे अफलातून पुस्तक त्यांनी अधिक सुखी आणि सर्जनक्षम आयुष्याचा मागोवा घेणाNया आपल्यासारख्या लोकांना उद्देशून लिहिलं आहे. यात उल्लेखलेले वैयाQक्तक आयुष्यातील प्रसंग आणि हृदयाला भिडणाNया कथा सुरस आणि प्रेरणादायी आहेत. ज्ञानी अंतर्दृष्टीने आणि लेखकाच्या सखोल करुणेने ओथंबलेल्या ‘प्रिाQस्क्रप्शन्स फॉर लिाQव्हंग` या पुस्तकात तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता आहे हे नक्की.
-
The Magic Of Getting What You Want (द मॅजिक ऑफ गेट
‘द मॅजिक ऑफ गेटिंग व्हॉट यू वॉन्ट’ अर्थात ‘किमया! हवे ते प्राप्त करण्याची’ हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आशा-आकांक्षाची पूर्ती करण्यासाठी तुमच्यासमोर ठेवलेली ब्ल्यू-प्रिंटच. मोटिव्हेशन विषयावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या आणि ‘द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग’ या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक डॉ. डेव्हिड श्वार्त्झ यांचे ‘द मॅजिक ऑफ गेटिंग व्हॉट यू वॉन्ट’ हे तितक्याच तोलामोलाचे पुस्तक अतिशय वाचनीय, वास्तववादी आणि मनाला उभारी देणारे आहे. आयुष्याकडे आणि प्रत्येक समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले, आपले ध्येय कल्पकतेने निश्चित करून त्याप्रमाणे कृती केली तर आपण भरभरून समृद्धी मिळवू शकतो, समाजावर जबरदस्त प्रभाव टाकू शकतो आणि जीवनातला आनंद मनमुराद उपभोगू शकतो, हे या पुस्तकात प्रामुख्याने सांगितले आहे. ते कसे करायचे याचे विस्तृत मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.
-
Suramya Suryast (सुरम्य सूर्यास्त)
मावळतीच्या सूर्योस्तासारखं म्हातारपण... मानलं तर निवांतपण, मानलं तर मानसिक खळबळ... या उतारवयाचा स्वीकार करणं आणि ते आनंददायी करणं इतकंही अवघड नाही. पण त्यासाठी हवा असतो, थरथरत्या हातांना आधार देणारा एक सच्चा मार्गदर्शक, हे पुस्तक असंच मावळतीचा सूर्यास्त सूरम्य करणारा मार्गदर्शक आहे.दिनकर जोषी या पुस्तकात म्हातारपणातील शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा अनेक प्रश्नांचा सांगोपांग आढावा घेतात. आणि म्हातारपणाचा विचार केवळ म्हातारपणीच का नसतो, याची खोल जाणीवही पेरतात.
-
Harit Yuddhe (हरित युद्धे)
एका पर्यावरण पत्रकार स्त्रीने केलेलं अनुभवकथन म्हणजे ‘ग्रीन वॉर्स.’ पर्यावरण रक्षणाच्या विविध मोहिमांदरम्यान आलेले हे अनुभव आहेत. त्या अनुभवांचं हे तपशीलवार चित्रण आहे. गारुड्यांचं पुनर्वसन, सारस पक्ष्यांना वाचविण्याची मोहीम, सुसरींच्या कमी होणाnया संख्येबाबत अभ्यास, मेघालयातील जंगलतोड थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न, हुलॉक वानरांसाठी चालवलेलं मुक्तिकेंद्र, ‘सरस्वती वन्यजीव अभयारण्य’ वाचविण्यासाठी उघडलेली मोहीम, गोव्यात खाणमाफियांना दिलेली टक्कर, इंडोनेशियातील जंगल आणि ओरंग उटान माकडाचं अस्तित्व जपण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, हिमनद्या, ग्लोबल वॉर्मिंगसाठी अभ्यासदौरा इ. विविध प्रकारच्या पर्यावरण मोहिमा त्यांनी राबवल्या. तर पर्यावरणाच्या विविध अंगांचा बहार यांनी केलेला अभ्यास, पर्यावरणाच्या त्या त्या प्रश्नातील वंगोरे आणि आव्हानं, या समस्यांच्या संदर्भातील त्यांना भेटलेली माणसं इत्यादी बाबींबद्दल बहार यांनी वाचकांशी साधलेला हा.
-
Sokol Griho Haralo Jar (शोकोल ग्रिह हारालो जार)
अनंत अडचणींचा सामना करत, खुनाच्या धमक्या येऊनसुद्धा अंतरातल्या आवाजाला सतत प्रतिसाद देत, तळमळीने, निर्भयपणाने लिहिणाऱ्या मोजक्या लेखकांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे तसलिमा नासरिन. ‘शोकोल ग्रिह हारालो जार’ हे पुस्तक उपरोक्त विधानाला पुष्टी देणारे असेच आहे. या पुस्तकात तसलिमाने विविध विषयांचा परामर्श घेतला आहे. अगदी अमेरिकेच्या निवडणुकीपासून ते फिडेल कॅस्ट्रोच्या क्यूबापासून अंधश्रद्धांपर्यंत अनेक विषयांवर तिने पोटतिडकीने, निर्भयतेने रोखठोक शब्दांत स्वतःची मते मांडली आहेत. त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्यातील अडचणी, अन्याय, एकाहत्तर सालच्या कटू आठवणी यांबद्दलही लिहिले आहे. सर्व प्रकारची विषमता दूर होऊन सर्व जग म्हणजे एक एकसंध, सुसंस्कृत, मानवतावादी समाज घडावा, ही तळमळ हा तिच्या लिखाणाचा पाया आहे.
-
Udayan (उदयन)
‘कथासरित्सागर’ या सोमदेव शर्मा यांनी रचलेल्या संस्कृत ग्रंथात उदयनकथा विस्ताराने कथन केली आहे. राजेन्द्र खेर यांनी उदयन-वासवदत्ता यांची हीच भावमधुर प्रेमकथा उत्कटतेने रंगवली आहे. कलासक्त उदयन संगीतसाधना आणि विलासात मग्न होतो. त्याचीच परिणती वत्सदेशाच्या पतनात होते. पांडवानंतरच्या पाच पराक्रमी पिढ्यांनी अबाधित ठेवलेल्या सम्राज्याला पराजयाचे ग्रहण लागते. सम्राटपद गमावलेला उदयनराजा वीणावादन आणि नाट्यशालेत मश्गूल असतो. त्याचे वीणावादन इतके कर्णमधुर असते, की त्या स्वर्गीय वादनामुळे श्रोतेच नव्हे, तर पशुपक्षी, मदोन्मत्त हत्ती आणि निसर्गसुद्धा मंत्रमुग्ध होतो. अवंतीनरेश प्रद्योत आपली रूपसुंदर कन्या वासवदत्ता हिला वीणावादन शिकविण्यासाठी उदयनचं कुटिल डाव रचून अपहरण करतो. वीणेच्या प्रशिक्षणकाळात घडलेल्या सहवासातून उभयतांचं परस्परांवर प्रगाढ प्रेम बसतं. कलेच्या साक्षीने त्यांची प्रेमाराधना पुâलत जाते. वत्सदेशाचे महाअमात्य यौगंधरायण यांच्या मनात पराजयाचं शल्य असतंच, त्यात उदयनच्या अपहरणाच्या व्यथेची भर पडते. ते प्रतिज्ञा करतात... पुढे काय काय वेगवान घटना घडतात ते जाणून घेण्यासाठी ही उत्वंâठावर्धक कादंबरी अवश्य वाचायला हवी. ही कथा जशी उदयन-वासवदत्ता या युगुलाची आहे, तशीच साम्राज्याच्या पुनस्र्थापनेची प्रतिज्ञा घेणारे चाणाक्ष
-
Churchilchya Paulkhuna (चर्चिलच्या पाऊलखुणा)
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचं यशस्वी नेतृत्व केलेले ख्यातकीर्त नेते म्हणजे विन्स्टन चर्चिल. जागतिक इतिहासात त्यांची कामगिरी कधी सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी, तर कधी विपरीत अर्थाने इतिहास घडवणारी ठरली. अशा या वादळी वा आलेख या पुस्तकामध्ये मांडला आहे. चर्चिल यांचे राजकीय व आणि वैयक्तिक जीवन या अपरिहार्यपणे एकमेकांमध्ये मिसळलेल्या वाटा होत्या. विन्स्टनच्या स्वभावाचे पडसाद त्यांच्या सार्वजनिक जीवनावर आणि पर्यायाने ब्रिटनच्या आणि उर्वरित जगाच्याही पटलावर कसे उमटले? याचा मार्मिक लेखाजोखा होम्स यांनी मांडला आहे.
-
River God (रिव्हर गॉड)
फेरोंच्या आधिपत्याखालील, सोन्याचा प्रचंड साठा असलेल्या एका समृद्ध प्रदेशातील म्हणजे इजिप्तमधील ही कहाणी आहे. पेÂरो मेमोसे हे इजिप्तचे राजे आहेत. इन्टेफ हा वजीर आहे. त्या वजीराला एक सुंदर मुलगी असते, लॉस्ट्रीस. ताईता, हा इन्टेफ वजीराचा गुणी गुलाम असतो. इन्टेफ हा व्रूÂर आणि विकृत असतो. त्याला स्त्रियांऐवजी पुरुषांबद्दल शारीरिक आकर्षण असते. तरुण गुलाम मुलांचं लैंगिक शोषण तो करत असतो. त्या दृष्टीने ताईता हा त्याचा आवडता गुलाम असतो. तसेच ताईताला वैद्यकशास्त्राची, ज्योतिषशास्त्राची चांगली माहिती असते, एवूÂणच तो हुशार असल्यामुळे त्याच्यावर इन्टेफची मर्जी असते. पण, अलीडा नावाच्या युवतीवर ताईताचं मन जडतं. हे जेव्हा इन्टेफला समजतं, तेव्हा तो ताईतासमोर अमानुष रीतीने अलीडाला मृत्युदंड देतो. अलीडाला मृत्युदंड देण्याचं काम रासफर या अधिकाNयाने केलेलं असतं.
-
Chotya Shaharacha Darya (छोट्या शहराचा दर्या)
ही गोष्ट आहे आयुष्याच्या पटावरील घटनांना अनिवार्यपणे सोसणाऱ्या एका किशोरवयीन मुलाची. वडिलांच्या दुर्धर आजारामुळं त्यांना त्यांच्या मूळ गावी अखेरचा श्वास घ्यायचा असतो. पण त्यांच्या इच्छेनं नायकाचं आयुष्य मात्र ढवळून निघतं. त्याचं मोठ्या शहरातलं धावपळीचं आयुष्य उखडून छोट्या शहरात रूजवलं जातं. तिथं जुळवून घेण्यासाठीची त्याची धडपड नव्या अवकाशातील माणसं..त्यांचं जगणं..नायकाच्या आयुष्याचा भाग होत जातं..पण तेव्हाच एक नवी वेदना त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहते. प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधांवरील मनाची पकड घेणारी कादंबरी.