-
Mahagai Ek Chakravyuh (महागाई एक चक्रव्यूह)
महागाई हा विषय केंद्रस्थानी घेऊन महागाईला कारणीभूत ठरणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष गोष्टींबद्दल व महागाईवर परिणाम करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, नियम, करार इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न लेखनाद्वारे केलेला आहे. त्याच वेळेला प्रसारमाध्यमे, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी व सर्वसामान्य जनता यांनी हक्काबरोबर कर्तव्याची जाण ठेवल्यास फक्त महागाईच नाही, तर भेडसावणाऱ्या सर्व अडचणींवर मात करणे कसे सोपे जाईल, याबद्दलही विचार मांडले आहेत.
-
Chasing Tomorrow (चेसिंग टुमॉरो)
ट्रेसी व्हिटनी या सौंदर्यवतीच्या आयुष्यात जेफ स्टीव्हन्सच्या रूपाने एक देखणा तरुण येतो आणि ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकतात. जवाहिरांच्या, पुरातन मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या करण्याचे आपले जुने आयुष्य मागे ठेवून संसाराला लागतात. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळच टिकतो. एक प्रचंड वावटळ त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांचा संसार उधळून लावते. त्यांच्या औटघडीच्या संसाराला कायमचे ग्रहण लागते. ट्रेसी जेफच्या आयुष्यातून नाहीशी होते. जेफ सैरभैर होतो आणि तिला शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो. पण त्याला आपल्या पत्नीचा काहीही ठावठिकाणा लागत नाही.
-
Rujwai (रुजवाई)
नकळत्या वयात संजूला हेतुतः दुर्लक्षित करणाऱ्या मानसीची योगायोगाने त्याच्याशी भेट होते आणि जुन्या ‘ऋणानुबंधा’ची जाणीव ठेवत त्याने केलेली पाठराखण तिला स्पर्शून जाते. मुकुंदाची आई ही प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मुलाला मोठे करते; पण सून आल्यावर या आईवर बेघर होण्याची वेळ येते; मात्र तिचा कसा कायापालट होतो, ते सांगते ‘कायापालट’ ही कथा. ‘नातिचरामि’ कथेतील माधवीने एका कलंदर कलाकाराच्या प्रेमात पडून पस्तीस वर्षे त्याला मनापासून साथ दिली. आयुष्याच्या उतरणीवर त्यानेही खुल्या मनाने त्याचे श्रेय तिला दिले, पण एक अबोध अदृश्य सल तिला सतत खुपत होता... मानवी भावना व नातेसंबंधाच्या मनोहारी अनुबंधाचं मनोज्ञ दर्शन घडविणाऱ्या कथांचा संग्रह ‘रुजवाई’...
-
Madam Butterfly (मदाम बटरफ्लाय)
ही गोष्ट आहे जपानच्या एका फुलपाखरासारख्या नाजूक मदाम, च्यो-च्योची. 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील अमेरिकी प्रभावातल्या जपानी वातावरणातलं हे कथाबीज. स्वयंभू, आत्मनिर्भर च्यो-च्यो कष्टाळू जपानी स्त्रीचं मूर्तिमंत उदाहरण.. एका अमेरिकी माणसासोबत ती प्रेमानं संसार थाटते. पण आयुष्यातले कष्ट कमी होण्याऐवजी तिच्या आयुष्यात नव्या प्रश्नांची भर पडते. जीवनातल्या चढउतारांना कणखरपणे सामोरं जाणारी च्यो च्यो ती सारी आव्हाने पेलते. पण या फुलपाखराला जणू दुर्दैवाचा शापच असतो. तिचा अमेरिकी नवरा पुन्हा नवं वादळ घेऊन तिच्या आयुष्यात येतो..आणि आयुष्याची घटी पुन्हा विस्कटते. आता मदाम बटरफ्लाय पुन्हा आशानिराशेच्या हिंदोळयावर भिरभिरू लागते..
-
Hows That (हाऊज दॅट)
‘पॉपकॉर्न’नंतर, सुप्रिया वकील यांचा ‘हाऊज दॅट!’ हा दुसरा विनोदी ललित गद्य संग्रह. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी, होणारे बदल, स्वभावविशेष, जीवनातील विविध रंग टिपत, खुसखुशीत शैलीत लिहिलेले हे लेख वाचकांना आपलेसे वाटतील आणि खळखळून हसवतील. सूक्ष्म निरीक्षणातून जीवनातील गंमत टिपताना, त्यांची लेखणी कुठेही कडवट न होता निखळ विनोद फुलवते. अनुवादक म्हणून सुपरिचित असलेल्या सुप्रिया वकील यांचे हे स्वतंत्र लेखनही वाचकांना नक्की आवडेल.
-
Ruk Jaana Nahi (रुक जाना नाही)
ही जीवन गाथा आहे भावेश भाटिया यांची. राष्ट्रपती पुरस्काराने तीन वेळा सन्मानित करण्यात आलेले भावेश भाटिया म्हणजे ‘सनराईज कॅन्डल्स’ या उद्योगाचे संस्थापक. पूर्णत: दृष्टिहीन असूनही त्यांनी निश्चय व मेहनतीच्या बळावर महाबळेश्वरमध्ये एका हातगाडीवर मेणबत्त्यांचा व्यवसाय सुरू केला. आज कोटींत उलाढाल असलेला हा उद्योग हजारो दृष्टिबाधित बंधूभगिनींच्या जीवनात प्रकाश निर्माण करतो आहे. नेत्रदिपक व्यावसायिक भरभराटीसोबतच भाटिया यांनी क्रीडा क्षेत्रातही अतुलनीय योगदान देत ‘राष्ट्रीय पॅरालिम्पिक’ व ‘इंडियन ब्लाइन्ड स्पोर्ट्स असोसिएशन’ची एकूण ११४ पदके जिंकली आहेत.
-
Karnalok (कर्णलोक)
‘अनाथ' शब्दाची चीड असलेला बारा-चौदा वर्षांचा एक मुलगा योगायोगानं नेमका अनाथालयाशीच जोडला जातो. मी ‘त्यांच्यातला' नाही हे स्वतःला आणि जगाला बजावत असतानाच नकळत ‘त्यांच्या' सुखदुःखांशी बांधला जातो... त्याची आणि दहाव्या-बाराव्या वर्षीच त्या अनाथालयातल्या अवघ्या मुलांची आई झालेली दुर्गाई, तिची ती अनेक लहान मुलं.... तिथले कर्मचारी, संचालक, मार्गदर्शक, हितचिंतक, मुलांना दत्तक घेऊ इच्छिणारे भावी पालक यांची कहाणी...म्हणजेच ‘कर्णलोक.
-
Cocktail Carnival (कॉकटेल कार्निव्हल)
कॉकटेल कार्निव्हल हा तुमच्या साहित्यिक अभिरुचीला साद घालणाऱ्या कथांचा एक उत्सव आहे, एक रुचकर मेजवानी आहे. यात अनेक रस चाखायला मिळतात - मनोरंजनापासून ते कुतूहलापर्यंत, कारुण्यापासून ते विस्मयापर्यंत – कुठला रस केव्हा पुढे ठाकेल याची पूर्वकल्पना न देता. ज्याला विविध प्रकारच्या निमंत्रितांच्यात मिसळायला आवडेल अश्या वाचनवेड्यांसाठी ही जत्रा.
-
Nabhantmani (नभांतमणी)
ग्रामीण भागातील हुशार मुलगा मणिभद्र कात्यायिनी मठाचा भावी धर्मगुरू होण्याची संधी स्वीकारतो... यामुळे त्याला आजन्म ब्रह्मचारी राहावं लागणार असतं...डॉ. नभा महंती ही तरुण अध्यापिका त्याच्या प्रेमात पडते... धर्मशास्त्रातील आणि शिक्षणशास्त्रातील यशाच्या पायऱ्या चढलेला मणिभद्र नभाचं प्रेम स्वीकारू शकत नाही...वासनारहित, आत्मिक प्रेमाची महती मणिभद्र नभाला सांगू पाहतो....धर्म आणि लौकिक जीवन यांच्यातील द्वंद्वाचं प्रभावी चित्रण करणारी कादंबरी ‘नभांतमणी’
-
No Not Never (नो नॉट नेव्हर)
ही कहाणी आहे वऱ्हाड विदर्भातल्या दोन मुलींची. गुणी, सोज्वळ आणि गरीब राणीची आणि श्रीमंत कुटुंबातल्या हटखोर मंकीची. राणीच्या घरची परिस्थिती नसतानाही मंकीच्या वडिलांच्या दयेमुळे तिला पुढील शिक्षणाची संधी मिळते. बारावीनंतर इंजिनिअरिंग करण्यासाठी या दोघी पुण्यासारख्या महानगरात दाखल होतात. या महानगराचे रागरंग, इंजिनिअरिंग महाविद्यालयातील खळबळजनक वातावरण आणि दोघींचा परस्परविरोधी स्वभाव यातून या कथानकाला वेगवेगळी वळणं मिळत जातात. स्वैर, उच्छृंखल मंकी आपल्या अनिर्बंध जगण्यासाठी वेळोवेळी राणीला वेठीस धरते. आणि राणीचं पुण्यातलं जगणं आव्हानांनी भरून जातं. तरुणाईची मानसिकता आणि मोकळ्या अवकाशात मिळालेलं स्वातंत्र्य यांचा सुरस मेळ असणारी, कधी अंगावर शहारे आणणारी तर कधी सुखद रोमांच आणणारी विलक्षण कादंबरी
-
Jallianwala Baug (जालियनवाला बाग)
१३ एप्रिल, १९१९ या दिवशी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बागेत शीख समुदायावर केलेला बेछूट गोळीबार... या गोळीबारातून वाचलेला एक विशीचा तरुण राम मोहम्मद सिंग आझाद... या हत्याकांडाचा सूड घेण्याची त्याने घेतलेली शपथ... मार्गात आलेल्या अनेक अडचणींना तोंड देत या हत्याकांडास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यास या ध्येयवेड्याने लंडनमध्ये जाऊन दिलेले देहान्त शासन... एका क्रांतिवीराची धगधगती कहाणी..सत्यकथेवर आधारित कथाबीज असलेली विलक्षण कादंबरी
-
Atmavanchana (आत्मवंचना)
सेल्फ डिसेप्शन’ (आत्मवंचना) या पुस्तकात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहार आणि त्या संदर्भात केलेली भाषणे यांचा आढावा घेऊन त्यावर अरुण शौरींनी भाष्य केलं आहे. त्यातून भारत-चीन संदर्भात नेहरूंचं धोरण कसं होतं, त्या धोरणांचे परिणाम काय झाले, तत्कालीन राजदूतांची भारत-चीन संदर्भातील मते, या प्रश्नाच्या संदर्भात माध्यमं काय करतात इ. मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे
-
Lady Jallad (लेडी जल्लाद)
जल्लाद...हा शब्दही अंगावर शहारे आणणारा. स्त्रियांच्या नाजूक स्वभावाकडे पाहता हे काम कुणी स्त्री करू शकेल, याबाबत क्वचितच कुणाला विश्वास बसेल. पण बावीस वर्षीय चेतना मुल्लीक वर जल्लाद या वडिलोपार्जित कामाची जबाबदारी येते. आणि तिचं संपूर्ण आयुष्यचं नवं वळण घेतं. सामाजिक गृहितकांना धक्का देत वेगळ्या वाटा धुंटाळणारी ही चेतनाची कहाणी अनेक अर्थ्यांनी वाचकांसाठी उत्कंठावर्धक आहे
-
Saad Ghalto Kalahari (साद घालतो कालाहारी)
This is the story of the Owens' Travel and life in the Kalahari desert. Here they met and studied unique animals and were confronted with danger from drought, fire, storms, and the animals they loved. This best-selling book is for both travellers and animal lovers. ‘क्राय ऑफ कालाहारी’ हे पुस्तक म्हणजे कालाहारी वाळवंटात सात वर्षे राहिलेल्या मार्क आणि डेलिया ओवेन्स यांच्या जंगली प्राण्यांच्या सहवासातील अनुभवांवर आधारित कादंबरी आहे. त्याचा मंदार गोडबाले यांनी मराठी अनुवाद केला आहे. बदली कपड्यांचा एक जोड आणि एक दुर्बीण वगळता बाकी विशेष काही न घेता मार्क आणि डेलिया या तरुण अमेरिकन जोडप्याने प्राणिजीवनाचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिकेचे विमान पकडले. तिथे पोहोचल्यावर एक जुनाट लँडरोव्हर गाडी विकत घेऊन त्यांनी कालाहारी वाळवंटात (डिसेप्शन व्हॅली) खोलवर मजल मारली. ते सात वर्षे त्या परिसरात राहिले. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कोणीही मानव कधीही गेलेला नव्हता, तिथे ना कोणते रस्ते होते, ना कोणी माणसे. हजारो चौरसमैलांच्या परिसरात पाण्याचा कोणताही स्रोत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला जे प्राणी होते, त्यांनीही कधी माणूस पाहिला नव्हता. मध्य कालाहारी कितीही मोठे असले, तरी त्यामध्ये तेथील अस्थिर प्राणिसृष्टीसाठी पे अन्न-पाणी नाही, चरणाऱ्या आणि शिकारी दोन्ही प्राण्यांसाठी! त्या अभयारण्यात एकही कायमस्वरूपी पाणवठ्याची जागा नाही; त्यामुळे पिल्लांची व स्वतःची सुरक्षितता आणि बदलत्या ऋतूमानानुसार कालाहारीतील हायना (तरस), सिंह, हरणे, कोल्हे आणि इतर अनेक प्राणी सतत आपली निवासाची जागा बदलत असतात. या प्रचंड जंगलात ओवेन्स जोडप्याने आपला प्राणिशास्त्राचा अभ्यास केला. यामध्ये या जोडीने दिवसा तसेच रात्री-अपरात्री पा वेळ देऊन अनेक प्राण्यांचे अगदी बारकाईने निरीक्षण केले व अभ्यास केला आणि वेळोवेळी त्याच्या नोंदी केल्या.
-
The Mind Gym Relationships (द माइंड जिम रिलेशनशिप्
माणसामाणसांतील संबंध कसे सुधारावेत, हे सांगणारं पुस्तक आहे ‘द माइंड जिम रिलेशनशिप्स.’ या पुस्तकात एकूण चार विभाग आहेत. ते चार विभाग आणि त्यात चर्चेसाठी घेतलेले मुद्दे असे आहेत – संबंध जुळलेले - या विभागात योग्य मन, तुमची नाडी तपासा, शांत राहणं, संकोचणारा ते चमकणारा. एकत्र येणं - आपण ऐकता का?, आनंदी शाळा, लक्ष द्या, माझ्यावर विश्वास ठेवा. कठीण हे प्रेम! -फाइट क्लब, विष काढा, व्यवहार किंवा व्यवहार नाही, त्रास असल्याचा संशय, कठीण शब्द. त्वेगळ्या पद्धतीचे संबंध - चाकोरीबाहेर, कठोर बोलणं, तापदायक माणसं, सन्माननीय सुटका. तसेच या पुस्तकात काही कार्यक्रम आणि ‘ऑनलाइन माइंड जिम’ या संकल्पनेचा अंतर्भाव आहे. संबंध सुधारण्याचं सखोल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक जरूर वाचलं पाहिजे.
-
Gabhulalelya Chandrabanat (गाभुळलेल्या चंद्रबनात)
बाकेराव एक गुणी तमाशा कलावंत. त्याच्या उतारवयात रंगकली या सोळा-सतरा वर्षाच्या कलावतीचा त्याच्या जीवनात प्रवेश होतो. त्या दोघांच्या एकत्र येण्याने त्यांचं कलाजीवन बहरतं; पण नंतर त्यांच्या नात्याला उतरती कळा लागते. तमाशा कलावंतांची कला आणि त्यांचं जीवन यांच्या एकमेकांत गुंफलेल्या धाग्यांचं वास्तव चित्रण. Tamasha, the traditional Marathi folk theatre was standing on four major pillars- drama, erotic sensual lavani songs and traditional rhythmic music played on percussional instruments like dholki. Along with such social and historical dramas played in the Tamasha mobile theatres in the jamboree of village fairs, the galaxy of many great actors and female artists had also created their own significant lore. Vishwas Patil has interwoven his new novel on that backdrop of mobile Tamasha troops’ heritage and culture. Here, protagonists are Bakerao, who is a great singer, musician and a prolific actor. Beautiful Rangakali is the creator of her own nebula of songs, dances and acting. This is a painful love story between Bakerao and Rangakali’s passion and attraction towards each other’s legendary artistic virtues. Their seperation is unavoidable but their reunion is enchanting, and finally, that purest love marches towards the cobwebs of destiny. A powerful novel written by today’s major Indian novelist on the backdrop of folk songs, drama and culture, will surely enamor the readers and will take them through an entirely new, unknown and captivating world.
-
Bhabnagulo (भाबनगुलो)
Taslima nasrin is known for her writing on women's oppression and criticism of religion, despite forced exile and multiple fatwas calling for her death. & in this essays she once again rightly pointed out the various social issues. ‘भाबनागुलो’ अर्थात चिंताच चिंता..समाजातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांचे संवेदनशील मनात उमटणारे पडसाद या पुस्तकात प्रतिबिंबित होतात. कवीमनाच्या तसलिमा नासरिन नानाविध विषयांवर मुक्त चिंतन करतात. मुल्ला-मौलवीच्या फतव्यांमध्ये घुसमटणारं स्त्रीमन...मूलतत्त्ववादाच्या भोवऱ्यात अडकलेला राष्ट्रवाद...स्थलांतरातली अपरिहार्यता...अशा प्रश्नांची सल तसलिमा नासरिन यांना टोचणी देत br> राहते. त्यातून त्या अंतर्मुख करणारे प्रश्न विचारतात. त्यांच्या या अभिव्यक्तीतून जणू समकालीन वास्तवाचा आरसा आपल्यासमोर उभा ठाकतो. आणि सामाजिक चिंतांकडे अंगुलीनिर्देश करत br> राहतो.
-
Drushtidata (दृष्टि दाता)
When a crippling disease shattered his lifelong ambition Dr V venkataswamy chose an impossible new dream to cure the world of blindness the tiny clinic he founded in India defied conventional business logic and is now the largest provider of eye care on the planet.
-
Four Seasons (फोर सीझन्स)
कामायनी ही व्यक्तिरेखाच आपल्या आयुष्याचा पट आपल्यासमोर उलगडत आहे. निर्णय एकटीनं घेऊन तो परिणामांसकट जबाबदारीनं निभावण्याची हिंमत तिच्यात यावी ही तिच्या बाबाची अपेक्षा तिनं कधीच पूर्ण केली नाही. तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेल्या पुरुषांनी त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली तिचे निर्णय झाकोळून टाकले. आणि मग त्यांचे टेकू घेतले म्हणूनच तिचं आयुष्य आQस्थर राहिलं. आपलं आयुष्य आपल्या स्वतःच्या विचारांच्या पायावरच भक्कम आणि ठाम स्थिरावू शकतं, हे शिकायला तिला माळरानावरच्या या कणखर कातळावर यावं लागलं. इथल्या चार ऋतूंमध्ये ती जे शिकली ते आजवर मिळालेल्या धड्यांपेक्षा कितीतरी अधिक, जास्त सकारात्मक आहे. सगळं संपल्यानंतरही नव्याने जीवन सुरू करण्याची उमेद, जीवनचक्रातली लय, ठामपणा, चिवटपणा.. आयुष्याने जे दान दिलं ते स्वीकारून, अन्यायाने कुढत न बसता नव्या वाटा शोधत पुढे जाण्याची जीवनेच्छा, विस्थापनानंतरचं स्थलांतर, नवजीवन.. या कातळावर, इथल्या ओसाडीत तिच्यात बरंच काही नव्यानं रुजलं. निसर्गाचं- ऋतूंचं एक जीवनचक्र माळरानानं आश्वासकतेनं पूर्ण करून दिलं, अशीच भावना घेऊन ती या माळरानावरून पुढच्या प्रवासाकरता निघते.
-
Chanaksha (चाणाक्ष)
अनासक्ती, अफाट व्यासंग, चाणाक्ष बुद्धिमत्ता, धोरणी राजकारण, इतक्या सर्व सद्गुणांचा समुच्चय एका चाणक्य नावाच्या व्यक्तीत झाला आहे. धूर्त व यशस्वी राजकारणी असून देखील चाणक्याला राजपदाचा मोह नव्हता. राजसत्तेच्या वैभवाला निर्मोही वैराग्याची जोड असणे, हा आदर्श आर्य संस्कृतीचा विचार चाणक्यामुळे दृढ झाला. वर्तमान जगताला आजदेखील या परंपरेची नितांत आवश्यकता भासते आहे, हे अमान्य करून चालणार नाही. सामान्यत: फारसा परिचित नसलेला हा एका महानायकाचा इतिहास कथास्वरूपात या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
-
The Greater Goal (द ग्रेटर गोल)
कंपनीचा अध्यक्ष म्हणून नव्यानेच सूत्रे हाती घेतलेल्या अॅलेक्स बेकले नावाच्या एका तरुणाची ही कथा आहे. कंपनीचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पेलताना अॅलेक्सला आपल्या व्यावसायिक व कौटुंबिक जीवनातील अयशस्विता प्रकर्षाने जाणवत असते. अशातच त्याला जीवघेणा अपघात होतो. अपघातातून वाचलेल्या अॅलेक्सला कंपन्यांसाठी सल्लागार व विशेष तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करणारा क्विन मॅक्डगॉल मार्गदर्शक म्हणून भेटतो. तो अॅलनला पाच महत्त्वाच्या आचरण पद्धती सांगतो. त्या आचरण पद्धतींचा सखोल अभ्यास आणि अवलंब करून अॅलनचं व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन कसं बहरतं, याची मनोवेधक आणि मार्गदर्शक कहाणी आहे ‘द ग्रेटर गोल.’