-
Avani Ek Navi (अवनी एक नवी)
एकदा का मनुष्याला आपल्या स्वत:मधल्या अस्तित्वाची जाणीव झाली. त्याचं अवधान जागृत झालं की, स्वत:च्या ठिकाणचा दिव्यांश आणि प्रत्येक जीवाच्या ठिकाणी असलेली चेतना एक आहेत याची त्याला जाणीव होते. त्या जीवाविषयी त्याला प्रेम वाटू लागतं. जोवर हे घडत नाही तोवर बहुतेक लोक बाह्यरूपाकडे, मनोकायिक अस्तित्वाकडेच पाहतात. स्वत:च्या आणि आंतरिक चेतनेचं त्यांना भान नसतं. ज्यांना हे भान असतं त्यांना भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे काहीतरी अधिक आहे, याची जाणीव असते. बुद्ध, जीझस आणि अन्य अनाम आत्मे मनुष्य चेतनेच्या बहराची उमलण्याची साक्ष आहेत. त्यांनी मनुष्यजातीला दिलेल्या संदेशांचे आज विकृतीकरण झाले आहे. मनुष्यजातीची मनोरचना यांत्रिक झाली आहे. तिच्या जडतेतून चैतन्याचा प्रकाश आरपार जाऊन ती पारदर्शक होईल का? नाम, रूप, व्यक्तिमत्त्व, अहं यांच्या पिंजऱ्यातून ती मुक्त होईल का? या आंतरिक परिवर्तनाची गती कशी वाढवता येईल? अहं केंद्रित अशा चेतनेच्या प्राचीन काळापासून असलेल्या स्थितीला कसं ओळखायचं? नव्याने उदित होत असलेल्या मुक्त चेतनेची तरी खूण काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि सृष्टिविकासाला अनुकूल अशी नवी जीवनपद्धती या पुस्तकात सांगितली आहे. अहंकाराला दूर सारून चेतना जागरणाची सुरुवात करणं आणि स्वरूपाचा म्हणजे स्वत:चा शोध घेणं हा या पुस्तकाचा मुख्य हेतू आहे.
-
Bandh Mukta Hotana.... (बंधमुक्त्त होताना .... )
बंधमुक्त होताना हे आत्मकथन आहे अर्थतज्ज्ञ आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त पद्मा देसाई यांचे. लेखिकेचा जन्म १९३१ साली गुजरातमधील सुरत या ठिकाणी झाला. २०व्या शतकात एक सामान्य स्त्री ते संशोधक हा प्रवास त्यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक आणि खडतर ठरला. आज एक अर्थतज्ज्ञ म्हणून परिचित असणाऱ्या पद्मा देसाई लहानपणापासूनच शालेय अभ्यासात हुशार होत्या. घरी कडक शिस्त असली तरी शिक्षणासाठी मात्र खूप पाठिंबा होता. त्यामुळे त्यांची शिक्षणातली रुची उत्तरोत्तर वाढत गेली. परंतु वैयक्तिक आयुष्य मात्र संकटे आणि वादळांनी व्यापलेले होते. मुंबई विद्यापिठातून त्यांनी एम.ए.ची पदवी संपादित केली आणि त्याच वेळी त्यांना लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला. हा प्रेमविवाह होता. त्यातून त्यांच्या वाट्याला आली ती केवळ फसवणूक. हे लक्षात यायला त्यांना बराच वेळ लागला. त्या दरम्यान त्यांना शिक्षणानिमित्त अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. त्यांनी या संधीचे सोने केले. भारतीय संस्कृतीत वाढलेल्या लेखिकेला सुरुवातीला अमेरिकेतील संस्कृतीशी जुळवून घेणे खूपच कठीण गेले; परंतु लवकरच लेखिका त्या `ठिकाणी सरावली. तिथल्या संस्कृतीनेच लेखिकेला तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी विचार करण्यास भाग पाडले. डॉक्टरेट करत असताना केब्रिज युनिव्हर्सिटीत राहत असताना, तसेच कोलंबिया कॉलेजमध्ये आलेले अनेक अनुभव लेखिकेने सांगितले आहेत. लेखिकेवर तिचे वडील, आई आणि काकी यांचा आयुष्यभर प्रभाव होता, हे जाणवते. विसाव्या शतकात भारतासारख्या देशात स्त्री म्हणून वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी काही निर्णय घेणे तेवढे सोपे नव्हते. परंतु समाजाला, परंपरांना न जुमानता लेखिकेने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांपैकी पहिला धर्मांतराचा आणि दुसरा अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांच्याशी दुसरा विवाह करण्याचा. परंपरांच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतःला सिद्ध करणाऱ्या या विदुषीचे आत्मचरित्र प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायक ठरेल.
-
Brahmakanya (ब्रह्मकन्या)
झोया फन हे निसर्गाचे लेकरू. पूर्व बर्मातल्या जंगलांमध्ये वसलेल्या करेन गावांमध्ये तिचे बालपण व्यतीत झाले. तिच्या आईला सैनिकी पार्श्वभूमी लाभलेली तर बाबा करेन प्रतिकार चळवळीतील नेते. पण झोया आणि तिच्या भावा-बहिणींना बर्मी जुंत्याने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची जराही कल्पना नाही. मे यु क्लो नदीच्या काठावर वसलेल्या पेर हे लू गावात त्यांचे निरागस, अवखळ बालपण पुâलांच्या बागेत खेळण्यात, पुâलपाखरांमागे धावण्यात, आंब्याच्या झाडांवर चढण्यात, आंबे फस्त करण्यात झरझर सरते आहे. पण एके दिवशी त्यांच्या या सुंदर स्वप्नांना कोणाची तरी दृष्ट लागावी तसे होते.वयाच्या चौदाव्या वर्षी झोयाचे बालपण अचानकच संपून जाते. तिच्या गावावर बर्मी सैनिक हल्ला करतात आणि जीव वाचवण्यासाठी झोयाला आणि तिच्या कुटुंबीयांना पळ काढावा लागतो. आगीच्या ज्वाळांनी वेढलेले आपले घर डोळ्यांत साठवून त्याकडे पाठ फिरवल्यानंतर त्यांच्या भाळी लिहिलेली असते ती जंगलांमधून अर्धपोटी केलेली वणवण आणि सदैव पाठलागावर असणाNया बर्मी सैन्याची भीती. घरादाराला पारखे झालेल्या हजारो करेन लोकांसारखेच हे कुटुंबदेखील जंगलाचा आसरा घेत लपतछपत थायलंडमधील एका सैनिकी छावणीत आसरा घेते. पुढच्याच वर्षी प्रâी बर्मा मोर्चाच्या गर्दीतून तिलाच निवडून बोलण्याकरिता उभे केले जाते, त्यानिमित्ताने ती तिच्या आयुष्यातील पहिलीवहिली मुलाखत थेट बीबीसीवर देते आणि बघताबघता ती बर्माच्या स्वातंत्र्यलढ्याचा आंतरराष्ट्रीय आवाज बनते. त्यानिमित्ताने झोया अनेक मुरब्बी राजकारण्यांच्या भेटीगाठी घेते, अभिनेत्यांना सोबतीला घेऊन, व्यासपीठावरून मदतीचे आवाहन करते. पण तिच्या प्रत्येक हालचालीवर बर्मी जुंत्याचे लक्ष आहे. तिच्या प्रयत्नांनी तिला प्रसिद्ध तर केले आहेच पण तिच्या जिवाला आता कायम धोका असणार आहे. झोयाला तिच्या मायदेशी परतायला मिळाले का? मिळेल का?
-
Andhalya Baiche Vanshaj (आंधळ्या बाईचे वंशज)
"हम्सा आणि अस्मा या जोडप्यांची मुलं सोडली, तर त्या दोघांचं मिळून एकत्र म्हणावं असं काहीच नाही. अमर त्यांचा सगळ्यात धाकटा मुलगा. तो त्याच्या मामासारखा दिसतो. मामा आता या जगात नाही. अमरला एक रूपगर्विष्ठ बहीण आहे, जसिरा. त्याचा अकमल नावाचा भाऊ भलत्याच मार्गाला लागलाय. कर्मठ धर्म पाळता पाळता तो अतिरेकी बनतोय. त्याच्या सोफिया नावाच्या बहिणीचा बुडून अपघाती मृत्यू झालाय. एके काळी समृद्ध असणाऱ्या या कुटुंबाला उतरती कळा लागलीय. आपल्या आयुष्याला ते तोंड कसं देतायत, तेच या कादंबरीत सांगितलंय. दोन्ही भावांचा सुन्ता समारंभ आणि जसिराची शादी सोडली, तर त्यांच्या आयुष्यात सुखाचे प्रसंग येत नाहीत. शाळेच्या दिवसांपासून अमरचा संदीप नावाचा मित्र आहे. त्याचा अमरच्या आयुष्यावर बराच प्रभाव आहे. जसिराची शादी पार पाडण्यासाठी आंधळ्या आजीला फसवून तिचं घर विकतात आणि नंतर ती अमरच्याच घरी राहायला येते. अमरचं घर आणि आसपासचा परिसर याचं तपशीलवर वर्णन येतं. तिथंच तर बहुतांश कथानक घडतं. त्यांच्या छोट्याशा गावाच्या साध्याशा जीवनाचं परिणामकारक वर्णन केलंय. जसिराच्या शादीच्या वेळी घराची साफसफाई करत असताना त्यांच्या हाती फोटो लागतात. त्यामुळे अमर आणि त्याचा मामा यांच्या आयुष्यात असणारी समानता स्पष्ट व्हायला लागते. अमरची आत्या, तिची मुलगी जसिरा, संदीप, अमरच्या वडिलांचं दुसरं कुटुंब इत्यादी उपकथानकंही आहेत, त्यामुळे अमरच्या स्वभावचित्रणात भर पडते आणि कथानकही पुढे सरकतं. शेवटी अमरचं भविष्यही त्याच्या मामासारखं ठरतं. सविसाव्या वर्षी आत्महत्या. खरं तर, सुरुवातीलाच आपल्याला शेवटाची स्पष्ट कल्पना दिलीय. तरीही कथानकाची मांडणी आणि भाषाशैली आपल्याला गुंतवून ठेवते. "
-
Sadhane (साधने)
" माणसाचे जीवन यशस्वी व्हायचे असेल तर त्याला सगळ्यात जास्त गरज असते सकारात्मक विचारांची. सकारात्मक विचार करायची सवय स्वत:ला कशी लावायची आणि त्याप्रमाणे कृती कशी करायची, हे मानसोपचार तज्ज्ञ चांगल्या रीतीने सांगू शकतात; पण ही सकारात्मकता स्वत:मध्ये निर्माण करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ वेळोवेळी केवळ चर्चेतून रुग्णाचं समुपदेशन करत असतात. मात्र फिल स्टुट्झ या मानसोपचार तज्ज्ञाने रुग्णांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी चार साधने शोधून काढली आणि बॅरी मायकेल्स या मानसोपचार तज्ज्ञालाही त्याबाबतीत मार्गदर्शन केले. बॅरीने त्याच्या रुग्णांना या साधनांचा अवलंब करण्यास सांगितले. ती साधने कोणती, ती कधी वापरायची, कशी वापरायची, त्यांची उपयुक्तता इ. बाबत या पुस्तकात चर्चा केली आहे.या साधनांबाबत फिल स्टुट्झशी केलेली चर्चा, या साधनांचे रुग्णांवर केलेले प्रयोग आणि त्याचे आलेले अनुभव, या साधनांविषयी किंवा या साधनांशी संबंधित अन्य मुद्द्यांविषयी लोकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि बॅरीने त्याला दिलेली उत्तरं असं सर्वसाधारणपणे या पुस्तकाचं स्वरूप आहे. सकारात्मक विचार करण्यासाठी किंवा ते मनात निर्माण होण्यासाठी "
-
Magnolia (मॅग्नोलिया )
कुणाही व्यक्तीचं आयुष्य म्हणजे एक कथा असते आणि आपल्या परीनं ती अद्वितीय, चमत्कृतीपूर्णच असते! संवेदनेला झालेले अनेकविध स्पर्श शब्दात मांडणारी ओघवती भाषा असेल, तर ती कथा वाचनीयही होते. सूर-शब्द-रेषा-रंग यांवर मनस्वी प्रेम करत लेखिका भारत आणि अमेरिकेत एक समृद्ध आणि कलासक्त आयुष्य जगली. पन्नास वर्षांचं तिचं आयुष्य म्हणजे चौफेर अनुभव, साक्षात्कारी क्षण आणि नवरस यांचा जणू एक जगदव्यापी मेळाच! त्यातलं भावलं -भिडलं ते इतरांना आवर्जून सांगण्याची तिची गरज, हौस आणि तळमळ या पुस्तकातून व्यक्त होते. लेखिकेच्याच शब्दात, " 'मैत्र', 'भटकंत्या','कलंदरी' ही प्रकरणं लिहिताना आठवणीतली शेकडो माणसं, जागा, प्रसंग जिवंत झाले आणि नेसत्या वस्त्रानिशी मी त्या जथ्यात घुसले. नेपाळी मित्रांची नितळ हास्यं. शिशिराच्या पानगळीची भूल. तीव्र-कोमल सुरांच्या अनाहत श्रुतींचे ब्लू -रिज पर्वतांत घुमणारे भाव. केपकॉडच्या एकाकी टोकावर भर रात्री समुद्रातल्या बिनकठड्याच्या लाकडी कॉजवेवरून चालवलेली गाडी आणि येणाऱ्या भरतीचा थरार. जॉर्जियातल्या किर्र रानात मध्यरात्री पसरलेलं दुधासारखं चांदणं. मार्टिनला चोवीस वर्षांनी अचानक सापडलेली लिंडा. निर्मितीच्या गाभ्यातून निघणारी आणि पसरत जाऊन हलकेच परत अज्ञातात विरणारी कवितेची वर्तुळं...... मनावर कोरून राहिलेलं असं बरंच काही आणि त्यांना घेऊन उलगडणारे दिवस यांची रंगीत वीण! सरसकट, तसंच डिझाइनर टाक्यांची ही बहुपदरी वीण आपण कधी, कशी घातली? किती मोहक आहे तिची अनवट लय! .... आवडणारं काही वाचलं की मला छान मोकळा आनंद सापडतो. भाषेचं सौन्दर्य फार भावतं. कधी वाचनानंतर अस्वस्थताही येते. ही तर आनंदाची दुसरी बाजू. मंथन - चर्वण घडलं नाही, काहीच चिकटून राहिलं नाही तर मग तो वेळेचा खुर्दाच. लिखाण करून आपणही त्या पाण्यात उतरावं हा मोह झाला खरा! " ... आर्किटेक्चरचा अभ्यास सुरु केल्यानंतर लेखिकेला आनंदाचं एक शिवार सापडलं. मॅग्नोलियातल्या अनेक नोंदी आर्किटेक्चर या विषयातल्या आहेत. विचारांचा, व्यवसायाचा आणि जगण्याचाच सर्वंकष तात्त्विक आधार तिला या 'कला-जननी' विषयात सापडतो. या पुस्तकाचं स्वरूप मुख्यत्वे वैचारिक लेख, स्फुटं, चिंतनं, रसग्रहण, समीक्षा असं आहे. उत्सुक, रसिक वाचकाशी यातल्या काही लिखाणांनी संवाद साधला, तरी निर्मितीचं एक आवर्तन पूर्ण होईल!
-
Best Kept Secret Part-3 (बेस्ट केप्ट सीक्रेट खंड-३
बॅरिंग्टन हे लंडनमधील एक सधन आणि नामवंत घराणं. ह्यूगो बॅरिंग्टन हा त्या घराण्याचा वंशज. गाइल्स आणि एमा ही त्याची दोन अपत्यं. हॅरी क्लिप्टन हा ह्यूगोचा अनौरस मुलगा. ह्यूगोची झालेली हत्या, हॅरी क्लिप्टन आणि एमा बॅरिंग्टन यांच्या लग्नाला चर्चने केलेली मनाई, ह्यूगोच्या हत्येनंतर बॅरिंग्टन घराण्याच्या वारसाबाबत न्यायालयात उभा राहिलेला वाद, या प्रकरणात गाइल्सच्या बाजूने लागलेला निकाल, त्यानंतर हॅरी व एमाचा झालेला विवाह, त्यानंतर त्यांच्या मुलाचा सॅबेस्टियनचा जन्म, ह्यूगोच्या एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलगी जेसिका हिला एमा आणि हॅरीने दत्तक घेणे, यथावकाश सॅबेस्टियनचा तारुण्यात प्रवेश, गाइल्सचा निवडणुकीत विजय, एमा आणि गाइल्सच्या आईचा एलिझाबेथचा मृत्यू, मृत्यूसमयी तिने हॅरीच्या हातात दिलेला लिफाफा, खट्याळ पण अतिशय हुशार असणारा सेबॅस्टियन एका डॉनच्या जाळ्यात सापडणं, डॉनचा सज्जन मुलगा ब्रूनोशी सेबॅस्टियनची चांगली मैत्री होणं, सेबॅस्टियनकडून आपल्या बनावट नोटा रोदिनने बनवलेल्या एका पुतळ्यातून इंग्लंडमध्ये आणण्याचा बेत डॉनने रचणं, सेबॅस्टियनला याची कल्पनाच नसणं, या बेताचा सुगावा पोलिसांसहित हॅरी, एमा आणि गाइल्सलाही लागणं, त्याच वेळी सेबॅस्टियनाला केंब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाल्याची बातमीही सर्वांना समजणं अशा नाट्यपूर्ण घटनांसाठी आणि डॉन या बनावट नोटा इंग्लंडमध्ये आणण्यात यशस्वी होतो का, डॉनच्या तावडीतून सुटून सेबॅस्टियन आपल्या आई-वडिलांचे केंब्रिज विद्यापीठात त्याने शिक्षण घ्यावे हे स्वप्न पूर्ण करू शकेल का, हे जाणून घेण्यासाठी ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’ हे पुस्तक वाचलं पाहिजे.
-
Garudjanmachi Katha (गरुडजन्माची कथा)
ब्रह्मदेवाला कोणे एके काळी पाच मस्तकं होती हे तुम्हास माहीत आहे का? भगवान शंकराने आपल्या जटांमध्ये चंद्रकोर का धारण केली आहे, याबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का? देव इतरांची फसवणूक करतात का? आपणा सर्वांना एक गोष्ट निश्चित माहीत आहे – ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं चराचरात अस्तित्व असून, हे जग आणि आपली मानवजात अस्तित्वात आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच. संपूर्ण भारतात सगळीकडे या तीनही देवतांची उपासना केली जाते; परंतु या देवतांबद्दलच्या अनेक सुरस आणि चमत्कृतीजन्य कथा अजूनही फारशा कुणाला माहीत नसतात. अनेक पुरस्कारविजेत्या लेखिका सुधा मूर्ती या वाचकांना हाताला धरून या अनोख्या, अज्ञात प्रदेशात घेऊन जातात. प्राचीन युगातील या तीन अत्यंत शक्तिशाली देवतांविषयीच्या अद्भुतरम्य कथा त्या वाचकांसमोर उलगडतात. कथा संग्रहातील प्रत्येक कथा तुम्हा सर्वांना एका वेगळ्याच मंतरलेल्या विश्वात घेऊन जाईल. त्या कथा ज्या कालखंडात घडतात, तेव्हाच्या व्यक्ती मनोवेगाने दूरदूरच्या प्रदेशात भ्रमंती करू शकतात, यातले प्राणी उडू शकतात आणि यात पुनर्जन्म तर नेहमीच होत असतात.
-
Be Careful What You Wish For Part-4 (बी केअरफुल व्
‘बी केअरफुल व्हॉट यु विश फॉर’ हा ‘बेस्ट केप्ट सिक्रेट’चा पुढचा भाग आहे. या कादंबरीची सुरुवात होते, ती एमाला सॅबेस्टियनचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजते, अशा थरारक आणि भावपूर्ण प्रसंगाने. या कादंबरीचा प्रवास नंतरही रोमांचकतेने आणि भावात्मकतेने सुरू राहतो. सॅबेस्टियन या अपघातातून वाचला आहे आणि आपला मुलगा ब्रुनो अपघातात मरण पावला आहे., हे समजल्यावर डॉन मार्टिनेझ संतापाने वेडापिसा होतो आणि मग बॅरिंग्टन कुटुंबाच्या तो हात धुऊन मागे लागतो. बॅरिंग्टन कंपनीच्या बकिंगहॅम जहाजाच्या बांधणीचं काम चालू असताना तिथल्या डायरेक्टरला हटवण्याचा प्रयत्न करणे, शेअर बाजारात बॅरिंग्टन यांची कंपनी भुईसपाट होण्यासाठी प्लॅन करणे, जेसिकाचा खून करणे आणि बकिंगहॅम जहाजावर बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखणे इ. थरारक घटनांतून बॅरिंग्टन कुटुंब आणि डॉन मार्टिनेझ यांच्यातील तीव्र संघर्ष रंगविणारी ही रहस्यमय, उत्कंठावर्धक कादंबरी वाचलीच पाहिजे.
-
Parvana Jagnyacha (परवाना जगण्याचा)
"‘लायसेन्स टु लिव्ह’ ही एक स्फूर्ती देणारी थरारकथा आहे. ज्याला स्वतःची प्रगती करायची आहे, अशा व्यक्तीचा स्वतःमधील मोठेपणाचा शोधप्रवास आहे हा. ज्या दिशेने तुमची प्रगती होण्याचे नियतीने ठरवले आहे ते शोधून आपल्या मनाप्रमाणे हवे ते प्राप्त कसे करता येते, याचे सुंदर वर्णन करणारी ही कथा आहे. एक यशस्वी उद्योजक जगताची शिक्षक योगायोगाने यशाचा मार्ग दाखवणाऱ्या एका जगप्रसिद्ध प्रशिक्षकाने आयोजलेल्या कार्यशाळेत दाखल होते. तेव्हा होणाऱ्या, तिचे आयुष्य संपूर्णपणे बदलून टाकणाऱ्या प्रवासाचे वर्णन या पुस्तकात आहे. सात दिवसांच्या या कार्यशाळेत तिचा प्रवास तीन देशांत होतो. त्या वेळी तिला आत्मशोध घ्यावा लागतो, आत्मपरीक्षण करावे लागते, स्वतःच स्वतःचा गुरू आणि मार्गदर्शक व्हावे लागते. इतरांना तसे वागायला ती उत्तम रीतीने शिकवत असे; पण स्वतःच्या बाबतीत तिने हा मंत्र वापरून पाहिला नव्हता. वाचक तिच्या या प्रवासात सामील होतो आणि अनेक धडे शिकतो. त्याच्या आयुष्यात बदल होण्यास, सतत आत्मपरीक्षण करण्यास तो त्यामुळे उद्युक्त होतो. आपल्या विद्यार्थ्याला जे ज्ञान सर्वांत जास्त आवश्यक आहे, ते त्याला शिकू देईल, शिकवेल तोच खरा शिक्षक. या दृष्टिकोनातून कुर्ट अतिशय उत्तम प्रशिक्षक होता. ‘जगण्याचा परवाना’ हे पुस्तक प्रत्यक्ष वास्तव जगात कसे वावरावे याची माहिती सांगते व त्याच्याआधी जगाच्या वास्तवाची ओळख करून देते. या वास्तव जगात चांगले आणि आणि वाईट यांची बेमालूम सरमिसळ झालेली दिसेल. तसेच समजूतदार, शहाण्या लोकांबरोबरच भ्रमिष्टपणाचे कातडे पांघरलेल्या लोकांचा भरणा सापडेल. तुम्हाला क्षणात योग्य मार्ग सापडेल, तर काही वेळाने तुम्ही भरकटत आहात असे वाटेल. या सर्वांमधून नियतीने तुमच्यासाठी आखलेला मार्ग शोधून काढून तुमची आयुष्याबद्दलची स्वप्ने योग्य प्रकारे प्रत्यक्षात उतरवायची कशी, हे या पुस्तकात सांगितले आहे. तुम्हाला न समजणाऱ्या लोकांबरोबर कसे निभावून न्यायचे, आपल्या नियंत्रणात नसलेल्या पेचप्रसंगांतून कसा मार्ग काढायचा आणि हे करता करता आपण त्यातून कसे प्रगल्भ व्हायचे, हे या पुस्तकावरून समजेल. तुमच्या रोजच्या जीवनातील निवड करताना, निर्णय करताना तुमची अध्यात्मिक वृत्ती त्यात कशी प्रकट होईल, याबद्दल हे पुस्तक आहे. काही वेळा आपल्याला आपले इतरांशी असलेले बंध दिसत नाहीत. आपल्या कृतीचा इतरांवर काय परिणाम होईल याचा आपण बऱ्याच वेळा विचारच केलेला नसतो; पण आपला इतरांशी काहीच संबंध नाही असे समजणे आणि आपल्याच विश्वात मग्न असणे, हे चुकीचे आहे. इतरांच्या दृष्टीने आपण कःपदार्थ आहोत असे समजणे चूक आहे. आपले अस्तित्व, आपल्या कृती इतरांच्या दृष्टीने निश्चित महत्त्वाच्या आहेत "
-
Blue Bird (ब्लू बर्ड)
"बोस्निया-हरझेगोविना या ठिकाणी युद्धाला सुरुवात झाल्यावर लेखिका आणि तिची बहीण निर्वासित म्हणून इंग्लंडला आल्या. इंग्लंडला आल्यावर तिथली संस्कृती, राहणीमान हे आपल्यापेक्षा भिन्न आहे हे त्यांना समजले. या भिन्नतेमुळे लेखिका आणि तिची बहीण यांना अनेक मजेदार प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. त्याच स्मृतिचित्रांचे वर्णन लेखिकेने केले आहे. इंग्लंडसारख्या देशात बोलली जाणारी भाषा हेच सर्वांत मोठे आव्हान लेखिकेपुढे होते. वेळोवेळी सॉरी, प्लीज, थँक्यू सारखे शब्द वापरणे, हा त्यांच्यासाठी विनोदच होता. परंतु केवळ एकच वर्षात लेखिका ही भाषा सराईतपणे बोलू लागली. पुढे ती अनुवादाचे कामही करू लागली. अपरिचित, अनोळखी अशा ठिकाणी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी नाइलाजाने स्थलांतरित झालेली लेखिका इंग्लंडच्या संस्कृतीशी- वातावरणाशी एकरूप झाली. शिक्षणाद्वारा तिने आपली प्रगती साधली. बोस्नियाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आणि नवे अनुभव घेत तिने इंग्लंडमधील संस्कृती आपलीशी केली. या तिच्या जीवनप्रवासाचे वर्णन तिने तिच्या शब्दांत मांडले आहे. "
-
Work Less Do More (वर्क लेस डू मोअर)
या पुस्तकात कमीत कमी कष्टात अधिक श्रम कसे करता येतील याविषयी चर्चा केली आहे. परंतु कष्ट कमी करायचे असतील तर त्यासाठी प्रथम आपण कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च करतो याचा विचार करावा लागेल. त्याकरीता आपला दिनक्रम कसा आहे, याचा आधी विचार करावा लागेल. आपल्या दिनक्रमात असणाऱ्या चुका शोधण्यात मदत करण्यासाठी पुस्तकात तालिकांचा समावेश केला आहे. त्या तालिकांच्या आधारे कोणत्या गोष्टीत विनाकारण वेळ खर्च होतो व तो वेळ योग्य ठिकाणी कसा वापरता येईल, वेळेचे सुव्यवस्थापन कशा पद्धतीचे असावे याची चर्चा पुस्तकात केली आहे. त्याचप्रमाणे कामाचे नियोजन व उद्दिष्ट निश्चिती वरही लेखकाने भर दिला आहे. उद्दिष्ट कशी निश्चित करावीत, दीर्घकालीन उद्दिष्ट, अल्पकालीन उद्दिष्ट, कामाच्या संदर्भातील उद्दिष्ट, वैयक्तिक संदर्भातील उद्दिष्ट असे उद्दिष्टांचे वर्गीकरण करून त्यानुसार नियोजन कसे करावे हे सांगितले आहे. कामाबरोबर वैयक्तिक आवडीनिवडी, आरोग्य, कुटुंब यांना योग्य पुरेसा वेळ कसा देता येईल? यांचाही विचार केला आहे. कामाबरोबरच येणारा ताण उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या मदतीने कसा टाळता येईल याचेही विवेचन पुस्तकात आले आहे. नकारात्मकता, चिडचिडेपणा, कामात दिरंगाई या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जरी उद्दिष्ट ठरवली तरी त्यांना अति महत्त्व न देता योग्य विश्रांती (ब्रेक) घेऊन त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहावे. एकूणच योग्य वेळ व्यवस्थापन, कामाचे योग्य नियोजन यांच्या मदतीने कमी कष्टात अधिक श्रम हे ध्येय साध्य करणे निश्चितच सोपे आहे.
-
Karmachari
You who stand in a queue, who try to board a running local, who tolerate your boss's snide remarks and the trials and tribulations of marital life - you still manage to discuss politics with enthusiasm, to finish a game of cards, to laugh and to make others laugh ... You are a true karmachari. A collection of unforgettable short stories about ordinary people, Karmachari is a mirror held up to society. Set in suburban Mumbai of the 1970s, yet universal, it is peopled by characters we might meet in real life. They come alive under V.P. Kale's sharp but compassionate gaze, and prod us gently towards a world of greater kindness and understanding.