-
Piece Of Cake
वय वर्षे 13 : 'बाटा'च्या दुकानात 'मेन्स सेक्शन'मध्ये बुटांची खरेदी. वय वर्षे 15 : दातांना हिरव्या रंगाच्या ब्रेसेस आणि डोळ्यांना चष्मा असलेल्या मुलानं मैत्री सोडली. वय वर्षे 26 : नेभळट जग्गू 'बॉस' म्हणून मिळाला. वय वर्षे 29 : 'हिंदुस्थान टाइम्स'च्या 'विवाह विषयक' जाहिरातीत 'किरकोळ' विभागात प्रथमच आलेली छोटी जाहिरात. मीनल शर्मा, एमबीए, वय वर्षं एकोणतीस, उंची पाच फूट दहा इंच; जरा अधिकच कार्यान्वित झालेली सदसद्विवेकबुद्धी आणि ऐटबाजपणा. मीनलला सगळं काही पाहिजे. इंटरनॅशनल फूड्समध्ये यशस्वी 'करिअर', करिअरला जुळणारी जीवनपद्धती आणि एक 'कूल' तरुण, जो तिला हि-यांचे दागिने देईल, फुलं देऊन स्वागत करेल आणि तिच्या विनोदांना हसून दाद देईल, असा. पण तिच्या आयुष्यात आत्तापर्यंत घडलेल्या ओशाळवाणं करणा-या घटनांकडे नजर टाकली, तर हे सगळं तेवढं साधंसोपं नाही हे लक्षात येतं. विशेषत: जेव्हा तिच्या आईनंच तिचं लग्न जमवायला पुढाकार घेतलाय आणि मीनलला आता आयुष्याचा जोडीदार निवडताना एक तल्लख पण कंटाळवाणा कॅन्सर स्पेशालिस्ट आणि वादळी व्यक्तिमत्त्वाचा 'सेक्सी' रेडिओ जॉकी हे दोन पर्याय आहेत. भरीत भर म्हणून तिचा एक खोडसाळ बालमित्र आहे, आता तिचा सहकारी, जो तिचं 'करिअर' बरबाद करण्याची संधी दवडू इच्छित नाही. खोडकरपणानं भरलेली ताजीतवानी कथावस्तू वाचकाला प्रफुल्लित करत उत्सुकतेनं पानं उलटवीत ठेवते, पुस्तक वाचून पुरं होईपर्यंत...
-
Moonrekar
बॉँड बोलायचं थांबला. या जगावेगळ्या माणसाची कहाणी सांगता सांगता जणू त्याचं भान हरपलं होतं. "होय," एम् म्हणाले. "ते बातम्यांचे मथळे मला चांगलेच आठवतात. शांततेची हमी - मूनरेकर ! आपलं स्वत:चं क्षेपणास्त्र आता जवळ जवळ तयारही झालंय. मूनरेकरच्या क्षमतेबद्दल ह्यूगो ड्रॅक्सला प्रचंड आत्मविश्वास आहे. त्याचा दावा खराही असेल. तरी पण फारच विचित्र..." एवढं बोलून ते खिडकीबाहेर पाहात गप्प बसून राहिले. थोड्या वेळानं त्यांनी नजर आत वळवली आणि ती बॉंडवर खिळवत ते सावकाश म्हणाले, "फारच विलक्षण कहाणी आहे. मनुष्य मुलखावेगळाच दिसतो." ते पुन्हा बोलायचं थांबले. थोडा वेळ विचारात गढून गेले. "आणखी एक गोष्ट आहे..." एम् हातातील पाईप विमनस्कपणे दातावर वाजवत राहिले. "कोणती, सर ?" बॉंडनं विचारलं. एम्नी शेवटी मनाची तयारी केली असावी. काहीशा थंड नजरेनं त्यांनी बॉंडकडे पाहिलं. "क्लबमध्ये खेळताना..." त्यांचा आवाज कमालीचा गंभीर झाला होता, "...सर ह्यूगो ड्रॅक्स पत्त्यांमध्ये फसतात."
-
For Your Eyes Only
ती टेबलापाशी पोहोचली. बॉंडची नजर तिच्यावरच खिळलेली होती. "काही उपयोग नाही," त्यानं निराशेनं स्वत:शीच म्हटलं. "आपल्याकडे कसली येते ती ? ती नक्कीच तिच्या कुणा दोस्ताला भेटायला येत असणार. असली सुंदर पोरगी नेहमी दुसर्याच कुणाच्या नशिबात असते. हं ! काय पण नशीब आहे !" पण त्यानं स्वत:ला सावरण्याआधीच ती त्याच्या जवळ आलेली होती. एवढंच काय,चक्क त्याच्या शेजारच्या खुर्चीवर बसलीही होती. "सॉरी मला उशीर झाला. आपल्याला लगेच निघावं लागेल. तुला ताबडतोब ऑफिसमध्ये बोलावलंय." भराभरा ती बोलली आणि मग तिनं हळूच दोन शब्द उच्चारले, "क्रॅश ड्राईव्ह." अचानक आलेल्या अडचणी आणि दिसतात त्यापेक्षा कुणी वेगळ्याच असलेल्या सुंदर पोरी, या दोन्ही गोष्टी जेम्स बॉंडच्या आयुष्याचा अविभाज्य भागच बनून गेल्या आहेत आणि जेव्हा एखादी कामगिरी त्याच्यावर सोपवलेली असते, तेव्हा ही सगळी कहाणी उत्कंठावर्धक असणार हे नक्की असतं. - एखाद्या क्यूबन गुंडाच्या हत्येची अमेरिकेतली कहाणी असो. हेरॉईनचा व्यापार करणार्या आंतरराष्ट्रीय टोळीचा नायनाट करण्याची कामगिरी असो किंवा सेशेल्समध्ये अचानक झालेला एखादा मृत्यू असो, बॉंड ती कामगिरी त्याच्या खास पद्धतीनंच पार पाडणार...
-
Ketkarvahini
गेल्या शतकाचा पूर्वार्ध. स्त्री-शिक्षणाची सुरूवात. शहरातली एक मुलगी लग्न करून कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात गेली.उराशी सुंदर संसाराची स्वप्नं बाळगून. कडू-गोड अनुभवामधून जाताना तिच्या जीवनात वादळ आलं. आणि मग सुरु झला तिचा प्रतिकूल परिस्थितीशी झगडा. त्यातच मिसळली कायद्याची लढाई. ज्या कायद्याच्या लढाईत पतीची हत्या झाली, त्या युद्धभूमीला पाठ न दाखवता यशस्वीपणे लढत- झगडत राहणार्या केतकरवहिनींची कहाणी. गेल्या शतकातील स्त्रीजीवन आणि तिची आंतरिक शक्ती यांचं मनोज्ञ दर्शन घडवणारी वास्तव कहाणी. उमा कुलकर्णींच्या ओघवत्या शैलीत. त्यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती.
-
Sambhaji (संभाजी)
औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले; पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला विंâवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही! गेली सव्वातीनशे वर्षे या विचारी,कवी-राज्यकत्र्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथासंशयाच्या धडप्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली होती!आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार विश्वास पाटील यांनासह्याद्रीच्या निबिड दऱ्याखोऱ्यांनी,सागरखाड्यांनी आणि दुर्लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली शिवपुत्र संभाजीराजांचीचित्तथरारक, वादळी, पण वास्तव गाथा!!
-
Operation Molasys (ऑपरेशन मोलॅसिस)
परदेशात काम करणारा एक तरुण, जिज्ञासू भारतीय संशोधक. संशोधन करताकरता हाती आलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुपितापायी मारला जातो, आणखी एक अनाकलनीय गुपित मागे ठेवून. त्या गुपिताचा एक हिस्सा असते त्याची बहीण. एक सामान्य मुलगी. ही सामान्य मुलगी त्या अनोळख्या देशात आपल्या मृत भावाचं शरीर ताब्यात घ्यायला निघते. तेथील अपरंपार अडचणींची जाणीव असूनही स्वत:ला खंबीर बनवते. प्रत्यक्षात मात्र संकटांची एक जीवघेणी मालिकाच तिच्याभोवती सुरूहोते... तिचा अक्षरश: अंत बघू लागते... ते गुपित आणि त्या जीवघेण्या गुपिताची पाळंमुळं जिथपय|त पोहोचली होती, तो भयानक मार्ग ! सारंच गूढ, अतर्क्य...
-
Sex Worker
स्त्री म्हणून जन्माला आल्यानंतर एखादीच्या आयुष्याची वाट इतकी वळणावळणाची आणि काटेरी का असावी? समाजाच्या रूढ, नौतिक चौकटीबाहेरचं जीवन स्वीकारावं लागलेल्या, देहविक्रय व्यवसायात येऊन जीवनाशी विलक्षण संघर्ष करत, करकरीत वास्तवाशी थेट नजर भिडवून वाटचाल करणार्या स्त्रीच्या प्रांजळ लेखणीतून उतरलेली ही आत्मकथा "ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन"चा अनुभव देते. अत्यंत वैचित्र्यपूर्ण घटना-प्रसंग कथन करत, समाजाच्या बेगडी नौतिकतेवर सहज शब्दांत पण भेदक प्रहार करत वाचकाच्या मनाचा ठाव घेते.
-
Parv (पर्व)
कर्नाटकातील अग्रगण्य कादंबरीकार तत्वचिंतक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी महाभारतावर लिहिलेली ही महाकादंबरी. यात मूळ महाभारतातील आभाळाएवढ्या उंचीच्या पात्रांचे वास्तव रूप रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय संकल्पनेच्या प्रकाशझोतात महाभारताच्या व्यक्तिरेखांची संगती भैरप्पांनी लावली आहे. या कांदबरीमध्ये लेखकाने संज्ञा प्रवाहाचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. कादंबरीतील पात्रांच्या मनात येणारे विचार व्यक्त होता होता शेवटच्या एक दोन शब्दांबरोबर विचारांचा प्रवाह वेगळ्याच दिशेला वाहू लागतो. कुंती, भीष्म, द्रोणाचार्य यांच्यासारख्या दीर्घायुषी पात्रांच्या वाढत्या वयाचा 'फील’ देण्यासाठी त्यांच्या अवाढ्य आयुष्याला गवसणी घालण्यासाठी लेखकाने याचा अत्यंत चतुराईने आणि कलात्मकतेने वापर करून घेतला आहे. महाभारतातील दैवी चमत्कार, वर, शाप या गोष्टींना भैरप्पांनी संपूर्ण फाटा दिला आहे. व प्रत्येक घटना, प्रसंगांचा अत्यंत वस्तुनिष्ठ अर्थ लावून वेगळ्या दृष्टीकोनातून ही कथा मांडली आहे. आधुनिक समाजातील व्यक्तीस 'महाभारतातील व्यक्ती अशाच असल्या पाहिजेत’ असे या कादंबरीमुळे वाटू लागले. भैरप्पांनी शापांच्या, वरदानांच्या भक्कम पडद्याआड लपलेल्या माणसाचा घेतलेला शोध वाचकांना विचारप्रवण करणारा ठरला आहे. 'पर्व’ प्रसिद्ध झाल्यापासून या कादंबरीवर उलट सुलट अनेक चर्चा घडल्या, आरोप-प्रत्यारोप केले गेले. परंतू तरीही पर्व महाभारताची एक विलक्षण प्रत्ययकारी अनुभव देणारी कलाकृती ठरली.
-
I Dare Kiran Bedi
आय डेअर' हे किरण बेदींच्या व्यक्तीत्त्वाचे विविध पैलू प्रकट करणारे एक दमदार पुस्तक आहे. अंगी असलेले मूलभूत गुज अनुभवाने कसे अधिकाधिक विकसित होत गेले याचा प्रत्ययकारी आलेख वाचकांपुढे मांडला जातो. लहानपणापासून ते तिहार महानिरिक्षक पदापर्यंतचा प्रवास हा एका विजिगिषु वृत्तीचा निदर्शक आहे. किरण बेदींना मिळत गेलेल्या जबाबदार्या या नेहमीच कठीण होत्या. ज्या ठिकाणी परिस्थिती बदलणे अत्यंत कठीण आहे, वस्तुत: अशक्य आहे अशा ठिकाणीच त्यांना पाठवले गेले. परंतू समस्येचा अत्यंत सखोल अभ्यास व त्यावर आधारित कामांची आखणी यामुळे किरण बेदी नेहमीच यशस्वी ठरल्या. एखाद्या झंजावाताप्रमाणे परिस्थिती पालटून टाकण्याचे किरण बेदींचे सामर्थ्य थक्क करणारे आहे. संपूर्ण समाजाला, तरूण पिढीला आदर्शवत ठरणार्या या तेजस्वी व्यक्तीत्त्वाची ओळख करून देणारे प्रेरणादायी पुस्तक.
-
Five Point Someone (फाईव्ह पॉइंट समवन)
राष्ट्रीय स्तरावर 'बेस्टसेलर' ठरलेली हलकीफुलकी कादंबरी. या कादंबरीवर लवकरच चित्रपट बनणार आहे. तुम्हाला या पुस्तकात आयआयटी या भव्यदिव्य स्वप्नाची पूर्ती कशी करावी किंवा तिथे कसा प्रवेश मिळवावा किंवा तिथे कसं तरून जावं याचं मार्गदर्शन मिळणार नाही, पण जर तुमची विचारसरणी 'सरळ' नसेल तर तिथं काय घडू शकेल, ते मात्र नक्की समजेल ! अतिशय तरल विनोदाचा शिडकावा करतानाच अनेक सूक्ष्म गोष्टींवर नेमकं बोट ठेवणार्या ओघवत्या कथनशैलीतील वाचनीय कादंबरी. आयआयटी कॅम्पस व कॉलेज-जीवनाची पार्श्वभूमी लालेली ही कादंबरी तीन मित्रांची कथा सांगतानाच आजूबाजूच्या अनेक गोष्टींवर भाष्य करत वाचकाला खिळवून ठेवते आणि एका आगळ्या विश्वाचं भावपूर्ण दर्शन घडवते, ते सुद्धा हलक्याफुलक्या शैलीत. 'फाइव्ह पॉइंट समवन' हे पुस्तक लाट बनू शकेल. - आऊटलुक निखळ मौजेच्या या कादंबरीला दहापैकी दहा - द हिंदू चेतन भगत यांचे हे पहिलेवहिले पुस्तक तुम्हाला आयआयटीच्या मौजेच्या सफरीला नेते. - इकॉनॉमिक टाईम्स आयआयटीचा माजी विद्यार्थी असणारा लेखक त्याच्या पहिल्या कादंबरीत आपल्याला भारतातील सर्वात प्रतिष्ठित इंजिनिअरिंग संस्थांमधील विक्षिप्त व श्रेष्ठ मानणार्या जगताची झलक दाखवतो. - इंडियन एक्स्प्रेस
-
Popcorn
क्या बोलती तू...', 'क्या यार ?', 'सहीऽऽ ना ?', 'सुपर्ब...', 'अरे, चल ना...' अशी भाषा कधी, कशी आपल्या तोंडात बसली, आपल्यालाही कळलं नाही. 'बॉलीवूड-हॉलीवूड' शब्द जाता-येता कानांवर पडतात. आपलं बोलणं, वागणं, खाणं-पिणं, रोजचे कपडे, राहणीमान या सगळ्याच गोष्टींवर 'फिल्मी' छाप पडत चालली आहे. काहीतरी खटकतंय... बरंच काही हवंहवंसं वाटतंय असं हे भन्नाट विश्व ! आपलं सामान्यांचं स्वप्नांचं जग ! याच स्वप्नमयी-मोहमयी फिल्मी दुनियेतले 'पॉपकॉर्न' ! खुसखुशीत, टेस्टी, सऽऽही टाईमपास !
-
The Demon In The Freezer
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी, हजारो समर्पित माणसांच्या जागतिक पातळीवरील अथक परिश्रमांतून मानवजातीचा हजारो वर्षे संहार करणा-या देवीच्या रोगाचं उच्चाटन होऊ शकलं, पण गरज पडली तर असाव्यात म्हणून तत्कालीन दोन महासत्तांनी विषाणूंच्या काही कुप्या फ्रीजरमध्ये गोठवून ठेवल्या. आता हा देवीचा विषाणू पुन्हा अवतरण्याचा धोका दिसू लागला आहे. दहशतवादी गटांनी किंवा राष्ट्रांनी तो जीविक अस्त्र म्हणून वापरला तर मानवी इतिहासानं कधीही न पाहिलेला भीषण नरसंहार होईल. हे सगळं कळत असूनही आत्ता या क्षणी कोणीतरी त्या महाभयानक दैत्याला फ्रीजरमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे...
-
He Bandh Purane
हे बंध आहेत, पण बंधनं नाहीत. ना काळाची, ना भौगोलिक परिसीमांची, ना राजकीय पातळीवरील अपेक्षित-अनपेक्षित बदलांची. आज सहा दशकं लोटल्यानंतरही ज्या अर्थी हे बंध पुराणे झालेले नाहीत, त्या अर्थी कुठं तरी 'अंतरीची ओळख-खूण' पटलेली आहे. एकमेकांना विदेशी-परदेशी न मानण्याइतके आपण जवळचे आहोत. कितीतरी सोव्हिएत आणि रशियन कवी-कलावंतांनी या बंधांना आपापल्या कृतींमधून साज चढविलेला आहे. कवी रसूल गमझातव यांना स्त्रीच्या ललाटावरील कुंकुमतिलक हे तिचं ओळखपत्र वाटतं, तर स्व्यातस्लाव रेरिख यांना लक्ष्मीदेवता ही महन्मंगल सृजनाची मूर्ती वाटते. इल्या ग्लझुनोव या चित्रकारानं भारतीय राष्ट्रध्वजाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या कुंचल्यानं पंडित नेहरू असे विलक्षणरित्या चितारले आहेत, की वाटावं आत्ता याच क्षणी ते हस्तांदोलनासाठी पुढं होतील. नुकताच उभय देशांच्या राजनौतिक संबंधांचा हीरकमहोत्सव साजरा केला गेला. त्या साठाच्या आकड्यावर पुढे आणखी कितीही शून्यं चढली, तरी हे बंध जुने होणार नाहीत. कधीच नाही.
-
Business Legend
जी. डी. बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, कस्तुरभाई लालभाई व जे. आर्. डी. टाटा या आपल्या आयुष्यातच 'आख्यायिका’ ठरलेल्या भारतातील चार महान उद्योगपतींच्या आयुष्याचा व अफाट कर्तृत्वाचा अत्यंत वेधक व विस्मयचकित करून टाकणारा पट येथे उलगडला आहे. ही या चार उद्योगमहर्षींची व्यक्तिचित्रं आहेत. त्यांचं व्यक्तिगत जीवन - त्यांच्या सवयी, जीवनशैली, त्यांची वैचारिक धारणा, अचूक निर्णयक्षमता, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, भोवतालचे ताणतणाव यांचे मनोज्ञ, दुर्मीळ रंग भरता भरता, त्यांच पायाभूत काम करण्याची जिद्द कशी अफाट होती, ब्रिटिश राजवटीत - प्रतिकूल परिस्थितीत कोणकोणते संघर्ष करीत त्यांनी उद्योग उभारले, अडचणींचे 'संधी’त रूपांतर करण्याचे त्यांचे सामर्ध्य किती प्रचंड होते, वैयक्तिक संपत्ती जमविण्याच्या पार पलीकडची त्यांची देशभक्तीमय उद्योजकता व आर्थिक राष्ट्रवादाची दुर्मीळ दूरदृष्टी किती प्रखर होती, याचे लेखिकेनं चैतन्यमय व गहिरे चित्र येथे रेखाटले आहे. त्यांच्या काळाच्या - देशाच्या राजकीय, आर्थिक, सामजिक ताणाबाणाच्या विस्तृत अवकाशावर हे चित्र उभं केलं आहे. हा या लेखनाचा विशेष आहे. लेखिकेनं आजवर अस्पर्श राहिलेल्या अनेक स्रोतांतून तपशील मिळवून संशोधनपूर्वक केलेलं हे लेखन नव्या उद्योजकांना प्रेरक ठरेल."
-
Radhey (राधेय)
"राधेय’ ही रणजित देसाईची सर्वात आवडती कादंबरी. देसाईंनी एकाकी कर्ण, उपेक्षीत आणि अवमानीत कर्ण, त्याचं वृशालीशी असलेलं नातं कृष्ण आणि दुर्योधनाशी असलेलं नातं हे सगळं इतक्या कमालीच्या संवेदशीलतेनं चित्रित केलेलं आहे की कर्णाच्या संपूर्ण जीवनालाच एक शोकान्तिकेचं परिमाण लाभतं. "राधेय’च्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की "राधेय’मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो. यावरूनच या कहाणीची सार्वत्रिकता देसाईंनी दाखवून दिली आहे. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून उंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. कर्णाचं जीवनविषयक तत्वज्ञान सर्वाहून वेगळं आहे. कर्ण म्हणतो "आयुष्यात चारित्र्य जपता आलं, उदंड स्नेह संपादन करता आला, मित्रच नव्हे तर शत्रूही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला तोही परमेश्वररूपाशी. यापेक्षा जीवनाचं यश वेगळं काय असतं? कर्णाचं मनस्वी दर्शन घडवणारी, प्रत्येकाने कधीना कधी वाचावी अशी हृद्य कादंबरी.
-
Timepass
टाईमपास’ ही एका अपरिमित उर्जा व धैर्य असलेल्या बुद्धीमान स्त्रीची कहाणी आहे. ही स्त्री स्वत:च्या मनाला पटेल त्याच प्रकारचं आयुष्य जगली, स्वत:च्या जबाबदारीवर जगली. ही विलक्षण स्त्री म्हणजे सुप्रसिद्ध मॉडेल आणि ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी. 1949 साली जन्मलेल्या प्रोतिमा बेदी यांचा मृत्यू 1998 साली एका दुर्दैवी अपघातात झाला.या अवघ्या 49 वर्षांच्या आयुष्यात त्या अतिशय वादात्मक आणि अपवादात्मक वेगळ्या घटनांनी व्यापलेलं जीवन जगल्या. 'टाईमपास’ बनलंय ते प्रोतिमा बेदींच्या आत्मचरित्रातील काही अंश, त्यांच्या रोजनिशीतला काही भाग, आणि त्यांनी त्यांच्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबिय, प्रियकर यांना लिहिलेल्या पत्रांवरुन 'टाईमपास मध्ये प्रोतिमा बेदींच्या अत्युत्कट स्मृती आहेत..... अगदी मुक्तपणे लिहिलेल्या. आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर 'वळण’ बनणार्या सगळ्या घटना प्रोतिमा बेदींनी अतिशय प्रामाणिकपणे आणि निर्भिडपणे मांडल्या आहेत. स्कॅन्डलस् मॉडेल, बिनधास्त तरुणी, समर्पित नृत्यांगना..... अशी प्रोतिमा बेदींची विविध रुपं 'टाईमपास’ मध्ये पाहायला मिळतात. हातचं काहीही राखून न ठेवता अतिशय मनमोकळेपणे मांडलेलं हे आत्मकथन आहे.
-
College
या कॉलेजमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे. डिपार्टमेंट सुरू मी करायचं. एस्टॅब्लिश मी करायचं. मग हळूच कोणीतरी संधिसाधू मतलबी वाकडेबाई गरजू म्हणून, लाचार बनून येणार आणि शिरजोर होऊन टेकओव्हर करणार. विद्यार्थी आपण जमवायचे. तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. मग तथाकथित संस्थाचालक आणि प्राचार्य आपल्यापुढं गोंडा घोळणार्या माणसांची अध्यापक म्हणून वर्णी लावणार. रिझल्ट उत्तम लागावेत म्हणून आपण मरमर करणार. रजा न घेता एस्ट्रॉ क्लासेस घेणार. नोट्स देणार. त्यातून तुकडी तयार होणार. त्या तुकडीला हे नवे लोक शिकवणार. उत्तम शिक्षक म्हणून आपलाच उदो उदो करायला विद्यार्थ्यांना चलाखीनं प्रेरित करणार. इतकं सगळं किळसवाणं आहे,ओंगळ आहे... या सगळ्याची चीड येत नाही तुम्हाला, सर ? तुम्ही अजूनही पक्क्या मुरलेल्या प्राध्यापिका झाला नाहीत. अजून अनुभव येतील. मग इतकी चीड येणार नाही. फक्त असहाय्यता जाणवेल. तीही आपण काही करू शकत नाही याची ! सगळेजण एकच गोष्ट सांगतील. सगळ्या कॉलेजमध्ये असंच चालतं. पुढं पुढं आपलीही खात्री पटते की, सगळीकडे हेच चालत असेल तर भल्याभल्यांनी हात टेकले असणार. त्यामुळे तुम्हाला एक पोक्त सल्ला देतो, तुमचं करियर पाहा." सध्याच्या महाविद्यालयीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख काढणारी आणि अंतर्मुख करणारी सामर्थ्यशाली कादंबरी.