-
Phashi Bakhal
मनाची टोचणी चालूच होती. आपण एका माणसाला मरू दिलं, फासावर लटकावलं, हे मनाला खातच होतं. कुठंही दोरी दिसली, की ते सारं आठवायचं. मग हाताचा चाळा सुरू व्हायचा. सहज दोरीची गाठ मारली जायची. माझं वागणं शहाणपणाचं नव्हतं, हे माझं मलाच कळत असे. पण दोरी पाहिली, की ती रात्र डोक्यात फिरायची. आणि घरात सगळीकडे दो-या; चिकाच्या पडद्याला दोरी, ताक घुसळायला दोरी, अंघोळ करायला घरामागच्या विहिरीवर जावं, तर चांगला जाडजूड दोरखंड. त्या दोरखंडाचा गच्च फास कळशीभोवती आवळताना, ती रात्र डोळ्यांसमोर यायची. जीव गलबलायचा. मी रहाट गडगडत सोडून द्यायचा आणि तळापासून थोड्या अंतरावर कळशी तशीच लोंबकळत ठेवायचा. अधांतरी... फाशी गेलेल्या माणसासारखी. गूढकथेला मानवी मनाचे कंगोरे देणा-या आणि त्यामुळेच मराठी कथासाहित्यात अढळपद मिळवणा-या, रत्नाकर मतकरी यांच्या कथांचा आगळावेगळा संग्रह.
-
Not Gone With The Wind
वाऱ्यासोबत न वाहून गेलेली आणि वाऱ्यावर स्वार झालेली जगातील अव्वल चित्रशिल्पे आणि शब्दशिल्पे!हॉलीवूड-बॉलीवूडच्या अंतर्बाह्य दृष्टीक्षेपासह इटालियन, फ्रेंच , ब्रिटिश अशा अनेक अभिनव चाकोऱ्यांचा, विश्वास पाटील यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण ललित धांडोळा.शेक्सपिअर, टॉलस्टॉय, जॉन फोर्ड, दोस्तायव्हस्की, गार्बो, सोफिया लॉरेन, थॉमस हार्डी, शरत्चंद्र, डेव्हिड लीन, मार्लन ब्रँडो, स्टॅन्ले क्युब्रिक, रोमन पोलन्स्की, चार्ली चॅप्लीन, स्टीव्हन स्पीलबर्ग, मेहबूब खान, कोपोला, मधुबाला, के. असिफ, इनग्रिड बर्गमन, व्ही. शांताराम असे अवघ्या विश्वाचे अनेक सगेसोयरे या शब्दांगणात तुमच्याशी हृद्गत करतील!
-
The Company Of Women
खुशवंतसिंग ह्यांची शैली खोचक आहे, रोचक आहे न् बिनधास्त आहे, त्याच शैलीतील ही कादंबरी. विविध जातींच्या, धर्मांच्या, वयाच्या स्त्रियांशी मुक्तपणे केलेली वासनातृप्ती म्हणजे ही कादंबरी असे म्हणता येईल. सर[...]
-
Premacha Renu
विज्ञानकथा या मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनासाठीही लिहिल्या गेल्या पाहिजेत, असे मानणा-या डॉ. संजय ढोले यांचा हा कथासंग्रह निश्चितच वाचकांची बौद्धिक पूर्तता करेल. कथेच्या माध्यमाद्वारे विज्ञानातील गुंत[...]
-
Intimate
व. पु.काळे ह्यांचा कथातले जग हे आपल्या अवतीभोवतीचेच असते. किंबहुना त्यात कोठे ना कोठे आपण असतोच परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसणे किंवा लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपुंनी मार्मिकपणे टिपलेले असते आणि त्यावर मिष्कीलपणे शब्द केलेले असते. त्यातून मत्सरी मंडळींचे 'दिलासा मंडळ’ सारख्या अफलातून कल्पना वाचकांसमोर देतात न त्यातून असे अचूक लिहू शकणार्याबद्दलही मत्सर वाटू लागतो! संवादातून कथा फुलविणे ही तर वपुंची खासियतच. त्यामुळेच तर वपुंच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात- अश्याच वपुंच्या नऊ कथा ह्या संग्रहात आल्या आहेत. ज्यता 'मोदी अँड मोदी’ सारखी वाचकांनी उचलून धरलेली कथाही ह्यात आहे.
-
Zopala
मनाच्या विविध रंगछटांचं र्दन वपुंच्या या पुस्तकातून घडतं यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणार्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा आपल्याला अंतर्मुख करतात. स्वत:चा ोध घ्यायला भाग पाडतात. या कथांमधील माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.
-
Karmachari
वपु काळेसुद्धा एकेकाळी कर्मचारीच होते. रांगा-निरनिराळ्या कारणांसाठी. आणि त्यात ताटकळत उभे राहणे, लोकल पकडण्यासाठी म्हणजे ऑफीस गाठण्यासाठीची घाई, त्या सार्यात आडवे येणारे बंद वगैरे प्रकार, साहेबांसह इतरांची खवचट बोलणी, कँटीन नामे ठिकाणी दिला जाणारा चहा वगैरे वगैरे त्यांनी सुद्धा अनुभवले आहे आणि त्यांनीसुद्धा इतरांप्रमाणेच सारे हसत हसत हसण्यावारी नेले आहे पण सोडून नाही दिले- त्यांच्या लेखकीय मनाने हे सारे मिस्किलपणे टिपले आहे- वेळोवेळी म्हणूनच गोखले, खांबेटे, सातवळेकर, वंदना वगैरेंना बरोबर टिपणार्या ह्या कथा त्यांचे हातून लिहून झाल्या आहेत व ह्याच मंडळीनी त्या डोक्यावर घेतल्याने त्याच्या ह्या संग्रहाच्या पुन्हा पुन्हा आवृत्त्या निघाल्या आहेत.
-
Chaturbhuj (चतुर्भुज)
दोनाचे चार हात' झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठी-मोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ 'लग्न' या शब्दाभोवती ! 'चतुर्भुज' कथेतला चिंतातूर वर, 'चुडा' मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, 'अंतर' मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि 'बलिदान' मधील नियतीच्या फे-यात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास 'वपु' शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली.
-
Aik Sakhe
वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्ट सांगत जाणारे, 'अरेबियन नाइट्स’ सारखे त्याचे स्वरूप आहे. वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे.
-
Ka Re Bhulalasi
का रे भुललासी' हा वपुंचा कथासंग्रह 'वरलिया रंगा'चा भेद करून माणसाच्या खर्या रंगांचे दर्शन घडवितो. माणसाला जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे घालून वावरावे लागते. प्रसंग निराळे तसा मुखवटाही निराळा, त्यात माणूस आपले अंतरंग, सुख-दु:खे, प्रेम, प्रतारणा, भ्याडपणा, हताशपणा, सूड लपवत जगत असतो. हे मुखवटे, बुरखे परिस्थितीनुरूप घालावे लागतात तर लबाडपणाने घातलेले बुरखे वेगळेच असतात ! प्रत्येकाचा जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो. आपण आपल्याच रंगांनी माणसं, प्रसंग रंगवू पाहतो. खुल्या मनाने, खुल्या दिलाने विचार करत नाही. दुसर्यावर आपले विचार लादू पाहतो. हे ही एक प्रकारचे मुखवटेच की ! वपुंच्याच भाषेत सांगायचं झालं तर, "ह्या वरवरच्या भुलण्यामध्ये आपल्याला माणसाचे, जगाचे, निसर्गाचे खरे रंग कधी सापडतच नाहीत."
-
Gulmohar
गुलमोहराचं झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं, तेवढ्याच श्रीमंतीनं - काळ्याभोर पावसाळी ढगांवरसुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. पण दिवाकरपंतांना गुलमोहराचं झाड आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता, भंग पावलेलं स्वप्न होतं. लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुर्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसर्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणार्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं.
-
Me Manus Shodhtoy
वपुंच्या ह्या कथासंग्रहाचे नावच 'मी माणूस शोधतोय' असे आहे आणि ते त्यांच्या लेखनाशी व वृत्तीशीही सुसंगत नाही. वपु जी माणसे शोधतात ती इकडे तिकडे सर्वांनाच दिसणारी असतात पण वपु ज्या नजरेने त्यांच्याकडे बघतात व त्यांना 'टिपतात' ते चकित करणारे असते. आपल्या लक्षात हे कसे आले नाही असे जरी ते वाचल्यावर वाटले तरी आपल्या लक्षात येऊनही आपल्याला ते असे टिपता नसते आले हेही लक्षात येते न् मग ह्या लेखणीद्वारे कौतुक सप्तर्षी, दुर्वास, इत्यादी माणसाचा शोध वाचकांना खुलवून जातो. म्हणूनच ह्या शोधकथांचया संग्रहाच्या पंचवीस वर्षात चार आवृत्त्या निघाल्या आहेत.
-
Nimith
ललितगद्य हा तसा वाचकांना आवडणारा साहित्यप्रकार. याचा आवाकाही मोठा. लेखकाच्या मनातले विचार, भावना स्वप्नमयी कल्पना विविध मोहमयी शब्दरूप घेऊन ललितरूपात अवतरली की त्याचं ताजं टवटवीत रूप अधिकच मोहवणारं छोट्या छोट्या प्रसंगांचं ललित शब्दरूप जणू समूहात येतं. वाचनानंदाचं दान अलगद वाचकांच्या हाती पडतं. लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांच्या या आगळ्या वेगळ्या लेखनाचा हा संग्रह लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वत:ला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. काही 'निमित्तानं’ त्यांनावा वाचा फुटते. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ निमित्ता रूढार्थाने असो, नसो वपु काळ्यांची स्वत:ची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे खास ढंगदार ललितबंध.
-
Premmayi
ओशो यांच्या 'बिलव्हेड’ या ग्रंथाच्या आधारे वपुंनी केलेलं हे स्वैर लेखन आहे. ओशोंना अभिप्रेत असलेल्या आधुनिक मानवाचं दर्शन वपुंच्या लेखनातून घडतं. कुठल्याही जाती, धर्म, पंथ, विचारसरणीच्या वैचारिक, भावनिक दबावापासून मुक्त होऊन खर्या अर्थानं मुक्त तत्वज्ञान जगणार्या माणसाचं अनोखं चित्रण येथे वपुंनी केले आहे. हा माणूस कसा असतो ? त्याचं कोणतंही प्रार्थनास्थळ नाही. निसर्ग, झाडं, झरे, नद्या यातला आणि स्वत:मधला परमेश्वर हा त्यांचा देव. प्रेम, प्रेम आणि प्रेम हाच त्यांचा स्थायीभाव. जगाला बदलणार्या फंदात न पडता स्वत:ला अभिप्रेत असलेलं विश्व स्वत:तच निर्माण करण्याची वेगळी वाट ते चोखाळत असतात. त्यांचा प्रवास अंतर्मनाकडे असतो. त्यामुळं प्रत्येकाचा देव स्वतंत्र स्वयंभू असतो. हा माणूस म्हणजे बाऊल. हा माणूस उत्कटतेनं, उत्स्फूर्तपणे जगतो. अधिक नैसर्गिक बनतो. तो शांत असतो. आपल्या जीवनात विरघळून गेलेला असतो. परमेश्वरानं दरवाजा वाजवला म्हणजे दार उघडण्याकरीता तो सज्ज असतो. 'बाऊल’ माणसाच्या विविध विषयातील आगळ्या दृष्टीकोनावर वपुंनी येथे प्रकाशझोत टाकला आहे. प्रेमाचा खरा अर्थ, विविध अंगांनी येथे बहरला आहे. त्यात गहनता आहे, गूढता आहे आणि वैचारिक सधनताही आहे. तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील हे प्रेमाचे अनोखे दर्शन वाचकाला चाकोरीबद्ध वैचारिकेतून बाहेर काढते. मुक्त मानवाच्या उच्च वैचारिक पातळीचे दर्शन घडवते.