-
Thakare Viruddha Thakare (ठाकरे विरुद्ध ठाकरे)
‘ठाकरे’ म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले घराणे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. ‘शिवसेना’ स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दरारा असलेले नाव. पण बाळासाहेबांच्या डोळ्यांदेखत ‘शिवसेने’त फूट पडली अन् ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ जन्माला आली. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले ! दोन सेना. दोन सेनापती. काय असणार या दोघांची रणनीती अन् नियती ? महाराष्ट्राच्या राजकारणातील एका विलक्षण सत्तासंघर्षाचा विविध अंगांनी घेतलेला वेध
-
Palvi (पालवी)
पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला तो. बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला. आईची माया, बहिणीचा जिव्हाळा, काहीच त्याला रोखू शकलं नाही. ना धड शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय ! रस्ता हेच घर. पोलीस-कोठडीची हवाही खाल्ली. तो व्यसनातून सुटू पाहत होता. सुटल्यासारखा वाटला, तरी पुन्हा खेचला जात होता. br>अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर स्वत: एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन.
-
Pramanikahi Sundarahi (प्रामाणिकही सुंदरही)
अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू...’ ‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे...’ ‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा...’ ‘अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो...’या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक
-
Kalam 370 Aagraha Ani Duragraha (कलम ३७० आग्रह आणि
३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक व अकल्पित निर्णयामुळे उठलेले वादळ अजूनही घोंघावत आहे आणि त्यात अनेक बाबी दृष्टीआड होत आहेत वा केल्या जात आहेत. १९४७-४८च्या काश्मीरमधील युद्धजन्य परिस्थितीपेक्षाही शेख अब्दुल्लांच्या दुराग्रहामुळे कलम ३७० राज्यघटनेत समाविष्ट करावे लागले. महाराजा हरिसिंग यांनी हिंदुस्थानात संमीलित होण्यास संमती दिल्यानंतरही काश्मीरच्या जनतेचे मत अजमावावे, हा काँग्रेसचा आग्रह होता; पण त्याची परिणती ३७०व्या कलमात होईल आणि शेख अब्दुल्लांच्या अवास्तव मागण्या भारताच्या राज्यघटनेचा विपर्यास करतील, ही कल्पनाही कोणी केली नव्हती. नेहरूंना माणसांची पारख नव्हती. काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना, वेगळे नागरिकत्व, वेगळा ध्वज आणि सदर-इ-रियासत व पंतप्रधान ही पदे, अशा बहुतेक सर्व मागण्या दिल्ली करारान्वये मान्य झाल्या. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा प्रश्न लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला विचारला होता. तोच प्रश्न तत्कालीन सरकारला विचारणे आवश्यक होते. गेली ७० वर्षे अनेक प्रयत्न करूनही काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होऊ शकलेली नाही; कारण शेवटी सर्व चर्चा कलम ३७० वर येऊन थांबत असे. हे कलम रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न वैधानिक व भावनिक आहेत. त्यांची सखोल चर्चा या पुस्तकात केली आहे.
-
Manuche Aranya Amazonchya Khoryatil Jangalbhatkant
‘मनू’ हे नाव आहे पेरू देशाच्या दक्षिणेला उगम पावणाऱ्या अन् नंतर महाकाय अॅमेझॉनला मिळणाऱ्या या एका नदीचे. अॅमेझॉनचे खोरे म्हणजे पृथ्वीतलावरील जैवविविधतेने स समृद्ध अशी जागा. पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया असो, हजारो प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींचे बहरलेले विश्व असो, जलचर अन् उभयचर प्राण्यांपासून कीटक अन् सस्तन प्राण्यांपर्यंतच्या हजारो प्रजाती असोत, या साऱ्या विविधांगी, विविधरंगी जीवसृष्टीला अंतरंगात सामावून घेणारे मनूचे अरण्य. पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेल्या या सदाहरित घनदाट जंगलात एका झपाटलेल्या निसर्गप्रेमीने मनसोक्त भटवंती केली. त्या भटवंतीतून नजरेपुढे साकार झालेले, शब्दांतून अन् छायाचित्रांमधून पानांवर उमटलेले मनुचे अरण्य: मोठा आकार, विपुल रंगीत/ कृष्णधवल छायाचित्रे.
-
Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)
सरदार कुलवंतसिंग कोहली.मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांतमोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व.योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशीकुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक,मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका,व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक,नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक -किती किती नावं सांगायची?अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या.सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारेहे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींनाहाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे -सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन -झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखेराजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन्त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळकुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे|
-
Hamarasta Nakaratana (हमरस्ता नाकारताना)
हमरस्ता नाकारायचाच, असं काही ठरवलं नव्हतं.पण स्वत: स्वतःची साक्ष काढत पुढे जातानापिढ्यानपिढ्या तुडवून तुडवून गुळगुळीत झालेलीवाट मागे पडली खरी.घेतलेली वाट बिकट होती, अनपेक्षित वळणांची होती,तशीच मधूनच सुखावणाऱ्या हिरवाईचीही होती.खूपसं चालून गेल्यावर मागे वळून पहावंसं वाटलं.भूतकाळच्या मुसक्या बांधून विस्मरणाच्या दरीतफेकून देण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती करावीशी वाटली.आपली मुळं शोधावीशी वाटली.नदीचं मूळ कधी शोधू नये म्हणतात –पण करू नये ते केलं.हा शोध घेता घेता मला माझ्यात दडलेलीमाझी आई गवसली, आजी सापडली.भूतकाळाशी दोस्ती करताना त्यातल्या माणसांबरोबर पुन्हा जगले…मला स्त्रीत्वाचं भान देणाऱ्या पुरुषांकडेप्रौढपणाच्या चष्म्यातून नीट न्याहाळलं.त्यावेळी भावनांच्या धुक्यात बुडालेले तिढे आज लक्षात आले.नात्यांचे निखळलेले सांधे जुळवताना वाटलं की,निखळ ‘मी’ अशी नाहीच. अनेक माणसांनी-त्यांच्या राग, लोभ, प्रेम, असूया, मैत्र अशाअनेक भावनांनी भारलेल्या नात्यांनी मला घडवलं आहे.गोष्ट माझीच नाही, तर त्या सर्वांची आहे.या गोष्टींशी जैवपणे जुळलेल्या काळाची ही गोष्ट आहे|
-
Vivekachya Vatevar (विवेकाच्या वाटेवर)
डॉक्टर, तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकातून, लेखातून; तुम्ही दिलेल्या प्रत्येक व्याख्यानातून, मुलाखतीतून; तुमच्या प्रत्येक उक्तितून अन् कृतीतून विवेकवादाचे पाऊल पुढे पडत राहिले. ही विवेकाची वाटचाल भविष्यातही अशीच चालू राहावी, यासाठीच हा पुस्तक-प्रपंच.
-
Bhootan (भूतान)
देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश म्हणजे भूतान… पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान… वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भूतान… सगळा देशच जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणाऱ्यांचा देश म्हणजे भूतान… हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान ! अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक.
-
Nyootanate Vaat Pusatu (न्यूटनांते वाट पुसतू)
गीता-ज्ञानेश्वरीतील काही विधाने आजच्या आधुनिक विज्ञानातील काही संकल्पनांशी आश्चर्यकारक साम्य दाखवतात. या विधानांना वैज्ञानिक आधार नाही, पण म्हणूनच ती अधिक कुतुहलजनक ठरतात. ‘अध्यात्म विरुद्ध विज्ञान’ असे कृत्रिम द्वंद्व उभारून वितंडवाद घालत बसण्याऐवजी या विधानांचा वेगळ्या प्रकारे अभ्यास करता येईल का? विज्ञानाने दाखवलेल्या मार्गाने भौतिकशास्त्रातील एका वैज्ञानिकाने घेतलेला गीता-ज्ञानेश्वरीत प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानाच्या काही अंगांचा वेध म्हणजे न्यूटनांते वाट पुसतु
-
Kon Hote Sindhu Lok (कोण होते सिंधू लोक)
पद्मश्री डॉ. म. के. ढवळीकर. पुरातत्त्वातील अनेक कूटस्थळांचा वेध घेणारे जागतिक कीर्तीचे पुरातत्त्वज्ञ. सहजसोपी लेखनशैली अन् नेटकी मांडणी यामुळे पुरातत्त्वासारखा व्यापक विषय त्यांनी रंजक आणि रुचिपूर्ण बनवला. प्राचीन सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन काळातील पर्यावरण, प्राचीन भारतीय कला, स्थापत्य अन् त्यातून उलगडणारे लोकजीवन, गणेश या दैवताची उत्क्रांती असे विविध विषय त्यांनी अनेक पुस्तकांमधून वाचकांसाठी सुबोध बनवले. इसवीसनपूर्व तिसरे सहस्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृतिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात मागोवा घेत आहेत एका आजवर न उलगडलेल्या प्रश्नाचा – कोण होते सिंधू लोक ?
-
BhagatSinghcha Khatla (भगतसिंगचा खटला)
भगतसिंगच्या खटल्यातील काळी बाजू फारशी कुणाला माहीत नाही. त्या बाजूवर प्रकाश पाडणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा अखेरचा शब्द नाही. ज्या बाबींकडे आजवर पुरेसे लक्ष पुरवले गेले नाही, अशा काही बाबी ते नजरेस आणू इच्छिते. हा खटला म्हणजे एक फार्सच होता, या मुद्द्याची सखोल चिकित्सा आजवर झालेली नाही. कदाचित साँडर्सच्या हत्येत भगतसिंगचा नि:संशय सहभाग होता, म्हणून अशी चिकित्सा झाली नसेल. पण ‘लाहोर कटा’च्या खटल्याचा तपशीलवार अभ्यास गरजेचा आहे. आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी न्यायप्रक्रियेचा गैरवापर कसा केला गेला, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा खटला, १ मे १९३० रोजी गव्हर्नर जनरलनी वटहुकमाद्वारे हा खटला चालवण्यासाठी एका खास न्यायाधिकरणाची स्थापना केली. खटल्यातील आरोपींना उच्च न्यायालयात अपील करण्याची संधीच मिळू नये आणि त्यांची फाशीची शिक्षा कायम राहावी – हाच या वटहुकमाचा हेतू होता.
-
Swarthatoon Sarwarthakade (स्वार्थातून सर्वार्थाकड
हवेतले इमले बांधून पृथ्वीतलावर कुणीही सुखाने जगू शकत नाही. जगायचे जर जमिनीवर आणि तेही समाजाचा एक घटक म्हणून, तर समूहाचे अर्थशास्त्र आणि मानस समजून घेणे भाग आहे. सुखी समाज निर्माण करण्यासाठी आदर्श हवेतच. पण आदर्शांच्या पतंगाची दोरी किती लांब ठेवायची; आणि ती हातातून सुटली, तर पतंग कुठेही भरकटू शकतो, याचे भान येण्यासाठी अर्थशास्त्राचे भान हवे आणि मानसशास्त्राचेसुद्धा ! अर्थशास्त्रामागील मानसशास्त्राचा रंजक मागोवा घेणारे चार्ल्स व्हीलन यांचे ‘नेकेड इकॉनॉमिक्स’ हे जगप्रसिद्ध पुस्तक आता मराठीत.
-
Nahi Mi Ekala (नाही मी एकला)
आमच्या वाडवडलांच्या हाती पाटी-पुस्तक आले नाही, परंतु त्यांच्याकडे जन्मजात शहाणीव होती. गरिबी होती, लाचारी नव्हती. दैन्य होते, दारिद्र्य नव्हते. संघर्ष होते, वैर नव्हते. अंधश्रद्धा होती, अमानुषता नव्हती. जीवनाने कधी क्रूर थट्टा केली, तरी त्यांनी प्राणपणाने श्रद्धेच्या वातीचे रक्षण केले आणि श्रद्धेने त्यांना तारले. श्रद्धेसाठी ते ‘भावरत’ असा शब्दप्रयोग करीत. पिढ्यान् पिढ्यांचा ‘भावरता’चा वारसा जपणारे स्फटिकासारखे स्वच्छ, पाण्यासारखे प्रवाही, निसर्गासारखे निर्मळ आत्मकथन.