-
Maharani Durgavati (महाराणी दुर्गावती)
इतिहास गाजवणाऱ्या ज्या काही थोड्या स्त्रिया होऊन गेल्या, त्यातली दुर्गावती एक अग्रगण्य आहे. दुर्देवाने तिच्याबद्दल फारच थोडी माहिती लिहिण्यात आली आहे. ती शूर जितकी तितकीच देखणीही होती, हे तिचे आणखीही एक वैशिष्ट्य. शेरशहा, हेमू, राणी रूपमती व गौंड राजा संग्रामसिंह आणि त्याचा पुत्र दलपतराय सिंह या त्या काळातल्या म्हणजे सोळाव्या शतकातल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा होत्या. या समजून घेण्यासाठीही प्रस्तुत कादांबरी वाचणे आवश्यक आहे. या काळात अकबर दिल्लीचा बादशहा होता. त्याने स्वतःव्यतिरिक्त दुसऱ्या सर्वांची नावे इतिहासातून वगळण्याचा हुकूम केल्यामुळे या व्यक्तिरेखांची नोंद इतिहासात नाही, दुर्गावतीच्या सौंदर्यामुळे तिला अनेकांनी मागण्या घातल्या त्यापैकी एक अकबर. क्षत्रिय असूनही दलपतराय या गोंड म्हणजे आदिवासी राजपुत्रावर तिचे प्रेम बसले. ही प्रेमकहाणीही सुंदर आहे. दुर्दैवाने विवाहानंतर पाचच वर्षांनी दलपतराय स्वर्गवासी झाला परंतु दुर्गावतीने राज्य ताकतीने सांभाळले, ही कादंबरी विलक्षण घटनामय आहे. खेरीज नवनवीन माहिती देणारी आहे.
-
Maharajadhiraj Chadragupta Vikramaditya (महाराजाधि
चौथ्या शतकातील आर्यावर्ताचे सार्वभौम महाराजाधिराज विक्रमादित्य यांची चरित्रगाथा ही सामान्य युद्धकथा नव्हे. या कथेला असंख्य, अचाट व अकल्पनीय पैलू आहेत. येथे पात्रांचे व घटनांचे जे वैविध्य आहे, ते इतरत्र क्वचितच असेल. विक्रमादित्याची नवरत्ने, त्याला मदत करणाऱ्या दोन गणिका व त्याचा शत्रू रुद्रसिंह ही वेगळ्या प्रकारची पात्रे आहेत. नवरत्नांमध्ये कालिदास प्रमुख. कालिदासाने स्वतःबद्दल बोटभरही माहिती लिहून ठेवली नाही; परंतु त्याचा मित्र व आश्रयदाता विक्रमादित्य याच्याबद्दलच्या कृतज्ञतेचे अनेक संकेत त्याने मागे ठेवले. ते मी उलगडून दाखवले आहेत. त्या काळात गणिकांना समाजात मानाचे स्थान होते. म्हणून त्या दोन पात्रांनाही वेगळपण आहे. या पात्रांव्यतिरिक्त वेताळ व शनिदेव ही दोन पात्रे विक्रम-चरित्राशी निगडित आहेत. वेताळाच्या कथा मी जशाच्या तशा ठेवल्या आहेत. सगळ्या अर्थातच उल्लेखिल्या नाहीत; पण वेताळाचाही मी वेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला आहे. नवरत्नांमध्ये काहींच्या चरित्रकथा नमुनेदार आहेत. त्याही दिल्या आहेत. - इंद्रायणी सावकार
-
Angaraj Karna (अंगराज कर्ण)
अंगराज कर्ण ही महाभारतातील सर्वात लोकप्रिय व दिलखेचक व्यक्तिरेखा आहे, परंतु इंद्रायणी सावकारांचा कर्ण रडवा नाही. आपण महापराक्रमी व कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असूनही त्या उच्चवर्णीय जातीत आपल्याला प्रवेश नाही, या घटनेचे दुःख त्याला निश्चित आहे. परंतु ते त्याने मनाच्या कोपऱ्यात ढकलून दिले आहे. किंबहुना जे दुःख निवारता येत नाही ते विस्मृतीत ढकला आणि आपले जीवन सकारात्मक करा हाच या कर्णाचा संदेश आहे. या कर्णाचा आणखी एक विशेष मनावर ठसतो तो म्हणजे त्याचे वक्तृत्व युक्तिवाद करण्याचे त्याचे कौशल्य. जेव्हा जेव्हा दुर्योधन अडचणीत येतो तेव्हा तेव्हा कर्णाने त्याच्यावतीने जबरदस्त व बिनतोड युक्तिवाद केला आहे. वृषालीची व त्याची प्रेमकथा मनोरंजक आहे. कर्णाने उपस्थित केलेले मुद्दे वाचनीय आहेत. महाभारत हे एक भलेमोठे काव्य आहे. पण घटनाप्रधान आहे. त्या काव्यातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये लेखिकेने रंग भरले आहेत. सूर्य व इंद्र या देवांच्या स्वभावामधील फरक महाभारतात नाही पण इथे स्पष्ट केला आहे
-
Chatrapati Sambhaji Maharaj-Fauladi Manachi jabard
मराठ्यांच्या इतिहासात संभाजी महाराजांच्या चरित्रगाथे- इतकी दुसरी शोकांतिका सापडणार नाही, इंद्रायणी सावकारांनी नेहमीच्या रसाळ व आकर्षक शैलीत आणि इतिहास जराही न बदलता ही चरित्रगाथा रंगवली आहे. संभाजी महाराजांच्या चरित्रगाथेत शिवाजी महाराजांनाही बरोबरीचे महत्त्व आहे. त्यांच्याही व्यक्तिरेखेतले बारकावे इंद्रायणी सावकारांनी उकलले आहेत. इंद्रायणी सावकारांनी संभाजी महाराजांची चरित्रगाथा ते दोन वर्षाचे असल्यापासून सुरू केली आहे. संभाजी महाराजांचे चरित्र अतीव घटनात्मक आहे. या सर्व घटनांचा तपशील व पूर्वपीठिका लेखिकेने दिली आहे, संभाजी महाराज शूरवीर होते तसेच गुणवानही होते पण राजकारणात आवश्यक असलेले दोन गुण त्यांच्याकडे नव्हते. सहनशीलता व सरळमार्गीपणा.. 'राजकारणात हे दोन गुण अग्रिम महत्त्वाचे आहेत' असा उपदेश शिवाजी महाराजांनी त्यांना वारंवार केला, पण स्वतःला बदलणे त्यांना शक्य झाले नाही या दोन गुणांचा अतिरेक त्यांना नडला व या शोकांतिकेस कसा कारणीभूत झाला याचे हे मर्मभेदक चित्रण आहे.