Chatrapati Sambhaji Maharaj-Fauladi Manachi jabard
मराठ्यांच्या इतिहासात संभाजी महाराजांच्या चरित्रगाथे- इतकी दुसरी शोकांतिका सापडणार नाही, इंद्रायणी सावकारांनी नेहमीच्या रसाळ व आकर्षक शैलीत आणि इतिहास जराही न बदलता ही चरित्रगाथा रंगवली आहे. संभाजी महाराजांच्या चरित्रगाथेत शिवाजी महाराजांनाही बरोबरीचे महत्त्व आहे. त्यांच्याही व्यक्तिरेखेतले बारकावे इंद्रायणी सावकारांनी उकलले आहेत. इंद्रायणी सावकारांनी संभाजी महाराजांची चरित्रगाथा ते दोन वर्षाचे असल्यापासून सुरू केली आहे. संभाजी महाराजांचे चरित्र अतीव घटनात्मक आहे. या सर्व घटनांचा तपशील व पूर्वपीठिका लेखिकेने दिली आहे, संभाजी महाराज शूरवीर होते तसेच गुणवानही होते पण राजकारणात आवश्यक असलेले दोन गुण त्यांच्याकडे नव्हते. सहनशीलता व सरळमार्गीपणा.. 'राजकारणात हे दोन गुण अग्रिम महत्त्वाचे आहेत' असा उपदेश शिवाजी महाराजांनी त्यांना वारंवार केला, पण स्वतःला बदलणे त्यांना शक्य झाले नाही या दोन गुणांचा अतिरेक त्यांना नडला व या शोकांतिकेस कसा कारणीभूत झाला याचे हे मर्मभेदक चित्रण आहे.