-
Shubharambh (शुभारंभ)
चि. स्मृती आणि चि. सृष्टी ह्या आपल्या दोन गोड नातींचे फोटो माझे प्रकाशक सौ. सुप्रिया आणि श्री. शरद मराठे यांनी दिले, यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. माझे आवडते प्रकाशक आहेत ते. स्वच्छ, सुंदर, पांढराशुभ्र कागद, मोठा फॉन्ट आणि सुबक छपाई ही श्री. मराठे यांची वैशिष्ट्ये आहे. विश्वनाथ खांदारे यांनी पुस्तकांचे सुंदर असे मुखपृष्ठ तयार केले आहे. माझे प्रिय वाचक, त्यांच्यावर तर सारी मदार ! गोष्टी छान छान आहेत. गोड मानून घ्या प्रिय वाचकांनो. कळवा मला, आवडल्या तर ! फोन करा जरूर. --डॉ. विजयाताई वाड
-
Majhya Doghi (माझ्या दोघी)
सुखाची सोबत... सुखाची सोबत झाल्या माझ्या लेकी सौख्याचे झरे आनंदाचे वारे दुःख नकारे सुख हाकारे ऐशी आनंदाची बेकी या माझ्या लाडक्या लेकी..
-
Dhagdhagte Shejari (धगधगते शेजारी)
अफगाणिस्थानातील सगळंच राजकारण एकमेकांना जिवे मारण्याचं, 'सफाया' करण्याचं, म्हणजे सगळ्या कुटुंबालाच मारून टाकण्याचं. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी निवडणुकीत हरल्या तेव्हा गुल अमिरने, आमच्या ड्रायव्हरने, मोठ्या काळजीने विचारलं होतं की, 'आता इंदिरा गांधींचा पण 'सफाया' करतील का? सफाया केला नाही तरी त्या, त्यांची मुलंबाळं जगतील कशी? त्यांच्या उदरभरणाची सोय काय ?' त्या वेळेस त्या प्रश्नांची ऊत्तरं देताना मला अभिमान वाटला होता की, आमच्याकडे लोकशाही आहे; आमच्याकडे तुमच्यासारखी मारामारी होत नाही. 'आम्ही' आणि 'ते' हा फरक तेव्हा जाणवला होता. आज मात्र ठामपणानं तसं काही वाटते नाही. आज असं वाटत आहे की, सत्तेवर येण्यासाठी कोणी बंदुका आणि रणगाडे वापरतात तर कोणी मतं आणि पैसा यांची कोट्यवधींची गणितं मांडतात. त्यामध्ये आता गुंडगिरीची भर पडत आहे. साधनं कोणतीही असली तरी सर्वसामान्यांच्या आयुष्याची धूळधाणच होते. बंदुका, रणगाड्यांमुळे माणूस मरूनच जातो. गणितांच्यामुळे माणूस जगत राहतो; पण जीवनावरचा त्याचा विश्वास उडतो. साम, न्याय, नेकी हे दूर कुठेतरी फेकले जातात. या खेळामध्ये फक्त राजकीय सत्तेसाठी हपापलेलेच गुंतलेले असतात असे नाही; तर समाजाची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवण्याची जबाबदारी असलेलेही आहेत. सर्वसामान्य माणूस दिशाहीन अवस्थेत, तत्काल फायद्यासाठी चुकीच्या मार्गाने जाऊ लागतो. नाहीतर सर्वच बाबतीत उदासीन, तटस्थ होऊन जातो. हतबल होतो. सत्तासंपादनाची अमर्याद उर्मी आणि हतबलता यांची घट्ट वीण तयार होत जाते.
-
Pune Metro (पुणे मेट्रो)
गोष्ट एका मैत्रीची आणि अबोल प्रेमाची. पुणे मेट्रो या कादंबरीत दोन अनोळखी लोक मेट्रो प्रवासात एकत्र येतात. ... रोजच्या भेटीतून एकमेकांच्या जवळचे होतात. अतूट मैत्रीने बांधले जातात. मैत्रीला वयाचे बंधन नसते हे सिद्ध करतात. सोशल मीडियामुळे आज हरवलेला संवाद आणि माणसा माणसांत वाढत चाललेले अंतर रोजच्या धकाधकीच्या प्रवासातूनही माणुसकीचे सुंदर नाते कसे निर्माण करतो? हे अधोरेखित करणारी पुणे मेट्रो कादंबरी. ही कादंबरी दोन निखळ मैत्रीची आहे. दोन कुटुंबांची आहे आणि अबोल प्रेमाचीही आहे. एकीकडे निस्वार्थ प्रेम तर दुसरीकडे अबोल प्रेम यांची सुंदर गुंफण म्हणजे ही कादंबरी! कादंबरीचे नाव 'पुणे मेट्रो' असे असले तरी ही गोष्ट कोणत्याही मेट्रो शहरात घडणारी आहे. घडू शकणारी आहे. मराठी सारस्वतात वेगवेगळे प्रयोग करणा-या लेखक सुनील पांडे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून प्रथमच मेट्रोवर कादंबरी येत आहे. पानापानावर उत्कंठा, उत्सुकता आणि हुरहुर लावणारी ही कादंबरी.
-
Majhya Najaretun (माझ्या नजरेतून)
हिंदी सिनेमातली लोकप्रिय गाणी आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आपल्या अगणित आठवणी मनाच्या कप्प्यात राहून आपल्याला जगण्यासाठीची उर्मी कायम देत असतात. तेव्हा कधी कधी असं वाटतं की आपलं आयुष्य म्हणजे आठवणींच गाणंच आहे की काय ! मनोज आचार्य यांचं आयुष्य केवळ आठवणींचं गाणं नव्हतं तर त्यांचं आयुष्य म्हणजे, नामवंत गीतकार, संगीतकार आणि मशहूर गायकांना आपल्या ओघवत्या लेखनशैलीत मनापासून दाद देत साजरा केलेला गाण्यांचा अनोखा उत्सवचं होता. तसंच काही सुर्हदांनी मनोज आचार्य यांच्या जागविलेल्या हृद्य आठवणी.
-
Majhya Durgabai (माझ्या दुर्गाबाई)
मा माणूस स्वतःशी सुसंगत नाही झाला तर तो कुणाशीही सुसंगत होत नाही." बाई स्वतःशी सुसंगत होत्या, तिथूनच त्यांना उर्जा मिळाली असावी. बाई एकदा मला म्हणाल्या होत्या "मला जगण्यात सुख वाटतं बघ." यामागचं कारण याबद्दल मला वाटतं बाईंना जगाबद्दल, जगण्याबद्दल प्रचंड ओढ, कुतुहल होते. ऐन तारुण्यात ओढवलेल्या जीवावरच्या दुखण्यातून आश्चर्यकारक रीतीने त्या बऱ्या झाल्या होत्या. तेव्हा उजाडलेला प्रत्येक दिवस म्हणजे त्यांना इश्वराने दिलेली देणगी वाटला होता. प्रत्येक दिवस त्या उत्साहाने जगल्या. साडीचे काठ असोत, अचानकच आभाळात दिसणारा चंद्र त्याचं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबाची सावली असो की कुंडीतल्या मरू घातलेल्या रोपाला फुटलेलं कोवळं, नवं चिमुकलं पान असो, सगळ्याचा आनंद त्या साजरा करीत. तसेच कोणाचे वागणे बोलणे त्यांना पटले नाही तर त्या त्यांचाही खरपूस समाचार घेत.
-
Dhundi Kalyana (धुंदी कळ्यांना)
प्रा. मार्तंड औघडे यांनी 'धुंदी कळ्यांना' या जुन्या मराठी चित्रपटातील आशयघन गाण्यांचे व 'चांदणे शिंपीत जाशी' या भावगीतांवर आधारित पुस्तकातून अवीट गोडीच्या भावगीतां-चे जे परीक्षण केले आहे, खरे तर ते रसग्रहण म्हणावयास हवे ते अभ्यासपूर्ण असेच आहे. यासाठी त्यांनी ज्या अभिजात गाण्यांची निवड केली आहे ती गाणी आज पुन्हा एकदा त्यांनी या वेगळ्या उपक्रमातून नव्या पिढीसमोर ठेवली आहेत त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांनी हे रसग्रहण करताना प्रत्येक गाण्यामागची पार्श्वभूमी आणि त्या गाण्याचा प्रसंग अतिशय साध्या सोप्या शब्दात उलगडून दाखविला आहे. तसेच त्यातील कवीच्या मनातील भाव आणि त्यास अनुरूप दिलेल्या संगीतावरही त्यांनी उत्तम भाष्य केले आहे. ही दोन्ही पुस्तके प्रत्येक मराठी संगीत रसिकांनी आपल्या संग्रही ठेवावीत अशीच आहेत.
-
Chandane Shimpit Jashi (चांदणे शिंपीत जाशी)
प्रा. मार्तंड औघडे यांनी 'धुंदी कळ्यांना' या जुन्या मराठी चित्रपटातील आशयघन गाण्यांचे व 'चांदणे शिंपीत जाशी' या भावगीतांवर आधारित पुस्तकातून अवीट गोडीच्या भावगीतां-चे जे परीक्षण केले आहे, खरे तर ते रसग्रहण म्हणावयास हवे ते अभ्यासपूर्ण असेच आहे. यासाठी त्यांनी ज्या अभिजात गाण्यांची निवड केली आहे ती गाणी आज पुन्हा एकदा त्यांनी या वेगळ्या उपक्रमातून नव्या पिढीसमोर ठेवली आहेत त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! त्यांनी हे रसग्रहण करताना प्रत्येक गाण्यामागची पार्श्वभूमी आणि त्या गाण्याचा प्रसंग अतिशय साध्या सोप्या शब्दात उलगडून दाखविला आहे. तसेच त्यातील कवीच्या मनातील भाव आणि त्यास अनुरुप दिलेल्या संगीतावरही त्यांनी उत्तम भाष्य केले आहे. ही दोन्ही पुस्तके प्रत्येक मराठी संगीत रसिकांनी आपल्या संग्रही ठेवावीत अशीच आहेत.
-
BramhandNakay Shree Swami Samarthanchi Bhramangath
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांची भ्रमणगाथा प्रगटीकरणा पासून हिमालय ते अक्कलकोट पर्यंतची श्री स्वामी समर्थांची भ्रमणगाथा