-
Ladha Mumbaicha Covidshi (लढा मुंबईचा कोविडशी)
मुंबई कोरोनाशी लढली आणि लढतालढता एका वेगळ्या अर्थाने घडली. कोरोनाच्या तीन लाटा आल्या, त्या प्रत्येक लाटेतून मुंबई महापालिका काही ना काही शिकली. कधी तिने ऑक्सिजन पुरवठ्याचे धडे घेतले, कधी बेड्सच्या सोयीचे, तर कधी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे. या लढ्याचं नेतृत्व स्वीकारून महापालिकेने आपल्या सर्व विभागांतल्या कर्मचाऱ्यांची टीम उभी केली आणि ‘सगळ्यांना' बरोबर घेऊन मुंबईला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढलं. सुरेश काकाणी यांनी या पुस्तकात कोरोना व्हायरसवर मुंबईने विजय कसा मिळवला, हे बारकाईने आणि तपशीलवार मांडलं आहे. काकाणी आणि त्यांची टीम कोरोनाशी लढताना वेगवेगळ्या कल्पना मांडण्यात आणि त्या प्रत्यक्षात आणण्यातही सतत आघाडीवर होती. कोरोनाशी दिलेला हा लढा ‘मुंबई मॉडेल' म्हणून जगभर चर्चेत कसा राहिला याची माहिती यातून मिळते. त्यामुळे हे पुस्तक अस्सल आणि खिळवून ठेवणारं झालं आहे. - डॉ. सुभाष साळुंखे
-
Anandyatri Police Adhikaryachi Diary (आनंदयात्री प
पोलिस खात्यातील प्रदीर्घ सेवा आणि त्यातील आपल्या अनुभवांचे भांडार अनोख्या शैलीत मांडणारे एका आयपीएस अधिकाऱ्याचे वाचनीय आत्मकथन. प्रत्येकाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक : 'आनंदयात्री पोलिस अधिकाऱ्याची डायरी'
-
Alvar (अलवार)
नसतेच कुणी । जन्मभर जागे । बुद्धीचे ही धागे । निजतात ।। अगदी सोप्या शब्दात जगण्याचं वास्तव मांडणाऱ्या ऋग्वेद देशपांडे यांच्या या चार ओळी वाचकाला आपल्या वाटून जातात. आपल्या 'अलवार' या काव्यसंग्रहात कवी म्हणून व्यक्त होताना उगाचच कुठल्याही कपोल कल्पनांत न रमता आपल्या रोजच्या जीवनात आलेल्या अनुभवांना, अनुभूतींना आणि जागृत होणाऱ्या जाणिवांना शब्दबद्ध करण्याचा ऋग्वेद देशपांडे यांचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. त्यासोबतच काव्य लेखनाच्या कुठल्या एका विशिष्ट चौकटीत अडकून न राहता गजल, अष्टाक्षरी, ओवी, मुक्तछंद, मुक्तशैली अशा विविध अंगाने त्यांनी आपली कविता मांडली आहे. ऋग्वेद देशपांडे यांची हळूहळू फुलत, उमलत जाणारी काव्यप्रतिभा उत्तरोत्तर बहरत जावो. त्यांच्या या 'अलवार' जाणिवेला आणि काव्यसंग्रहाला मनःपूर्वक शुभेच्छा.. - गुरु ठाकूर
-
Nandgaon Te London (नांदगाव ते लंडन)
भास्कर कदम पत्रकार, समाजकार्यकर्ता तसेच राजकारणातून समाजकारण करणारी एक विलक्षण वल्ली. नांदगावच्या या सुपुत्राने त्यांच्या कार्यामुळे कर्तृत्वाने नांदगावकरांच्या आयुष्यात स्वतःचे स्थान मिळवले आणि त्यांची नाळ नांदगावशी इतकी खोल रुजलेली आहे कि पुस्तकाचे शीर्षकदेखील ' नांदगाव ते लंडन हे दिले. एका सामान्य गावातील मुलगी लंडनला जाते, प्रथम क्रमांकाने पास होते, स्वतःचे प्राविण्य सिद्ध करते. तेही एका सामान्य बाबाची लेक ज्या बापाने हि कधी लंडन बघण्याचे स्वप्न पाहिलेले नसते. क्षितीजाच्या पदवीदान समारंभासाठी नॉटिंगहॅमला जायची संधी मिळाली. त्यानिमित्ताने पूर्ण युनायटेड
-
Shatkant Ekach Sachin (शतकांत एकच सचिन)
शतकांत एकच सचिन सचिन तेंडुलकरनं वयाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. काही मोजक्या लोकांना सचिनच्या या प्रवासाचं अगदी जवळून साक्षीदारहोता आलं. क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी हे त्यापैकीच एक आहेत. खेळाबाहेरचा सचिन कसा आहे, याविषयी त्यांनी आपल्या ‘शतकात एकच...सचिन’ या आगामी पुस्तकात लिहलं आहे.