-
Akashvani (आकाशवाणी)
आकाशवाणी गावं-शहरं-मनं जोडणाऱ्या ध्वनिलहरी ९० वर्षाचा जिव्हाळ्याचा प्रवास नीलेश कुलकर्णी विक्रांत पांडे अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी आधुनिक युगाने मानवासाठी निर्माण करून दिलेली अनमोल सेवा म्हणजे 'रेडिओ प्रसारण', सरोजिनी नायडू गेल्या नऊ दशकांपासून 'ऑल इंडिया रेडिओ' अर्थात, 'आकाशवाणी' भारतीयांच्या कानां मनांत गुंजन करत आहे. रेडिओवरील बातम्यांतून श्रोते देश-विदेशातील घटना-घडामोडींशी परिचित होतात तर रेडिओवरील वैविध्यपूर्ण कार्यक्रमांतून त्यांचे सकस मनोरंजनही होत असते आणि त्याचबरोबर ज्ञानप्राप्तीही! आकाशवाणी श्रोत्यांशी अनेक प्रकारे संवादही साधत असते. म्हणूनच श्रोते 'रेडिओ'शी जिव्हाळ्याने जोडून आहेत. या पुस्तकात 'आकाशवाणी'ची सुरुवातीपासूनची गोष्ट सांगत लेखक नव्वद वर्षाच्या प्रवासातील रंजक कथाही आपल्याबरोबर 'शेअर' करतात. त्याचप्रमाणे त्यांनी रेडिओवरील अनेक निर्माते, अनाउन्सर्स, रेडिओ जॉकी, श्रोते आदी रेडिओवरील घटकांनाही बोलतं केलं आहे. सर्वसामान्य भारतीयांच्या जिव्हाळ्याच्या माध्यमाविषयीच्या माहितीचा, आठवणींचा खजिना असलेलं पुस्तक... आकाशवाणी
-
Ramachya Pavlanvar Paool (रामाच्या पावलांवर पाऊल)
नवासातल्या वास्तव्यादरम्यान राम ज्या ज्या मार्गावरून पुढे गेले त्या सर्व स्थानांचा शोध घेत प्रवास केला तर…? अशी विलक्षण कल्पना लेखकद्वयीला सुचली आणि लागलीच त्यांनी आखणी करायला घेतली. आणि मग सुरू झाला त्यांचा प्रवास… अयोध्या… दंडकारण्य… पंचवटी… किष्किंधा… रामेश्वरम आणि मग श्रीलंका… या प्रवासात त्यांना स्थानिक लोक, पुजारी, महंत भेटले. सर्वांनी रामायणाशी जोडलेल्या अनेक आख्यायिका, कथा आणि कहाण्या ऐकवल्या. त्यातील अनेक कथा या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक अभ्यासपूर्ण तसंच रंजकही झालं आहे. प्रवासात लेखकद्वयीला असं लक्षात आलं की, या कथांच्या विविध आवृत्त्या असल्या, तरी त्यांना बांधून ठेवणारी नैतिकतेची चौकट एकच आहे ! पिढ्यान् पिढ्यांपासून भारतीय जनमानसात रुजलेल्या; लोकजीवन, सांस्कृतिक-सामाजिक अवकाश आणि भक्ती-परंपरा यांच्या संचिताचा अविभाज्य भाग झालेल्या रामकथेसोबत केलेला अनोखा शोधक प्रवासानुभव… रामाच्या पावलांवर पाऊल !