-
Doicha Padar Aala Khandyavari (डोईचा पदर आला खांद्
ही कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची. ओढाळ तरुण वयात मोहाच्या एका धूसर क्षणी अपघातानं ती एक चूक करते. पण त्यापायी तिचं सारं आयुष्यच बदलून जातं. आपल्या सार्या आकांक्षांना तिलांजली देत, ‘पापणीआडचा पाणपडदा' लपवत ती जगत राहते ! अंतरीचा पीळ, वेदना, संघर्ष सोसत जळत राहते ! यातून सुटण्याचा मार्ग तिला गवसतो का ? परतीची वाट सापडते का ? ‘पाऊल वाकडं पडलं’, तर ‘तिचं’ ! ‘निसरड्या वाटेवर घसरली’, तर ‘ती’च चुकलेली ! ही ‘ती’च्या भोवतीची काटेरी चौकट मोडेल का ? स्त्रीला वेढणार्यार कौटुंबिक, सामाजिक, मानसिक कुंपणांचा वेध घेणारी कादंबरी.
-
Adnyat. (अज्ञात )
बऱ्या-वाईट अनुभवांचं आणि व्यक्तींचं व्यामिश्र चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘अज्ञात.’ माणसाची नियतीशरणता अधोरेखित करते ‘अज्ञात’ ही कथा... तर एका वृद्धाच्या मनातील भावकल्लोळ व्यक्त होतो ‘पत्र आलंय’ या कथेतून... शेतमजुराची व्यथा सांगते ‘मोकळं आकाश’ही कथा... तर एका कुष्ठरोग्याचं आक्रंदन टिपते ‘वास्तव’ ही कथा...एका वृद्ध आईच्या चिंतनरूपी भावना प्रकटतात ‘सावलीचा दाह’मधून. सूक्ष्म भावनांचं अस्वस्थ करणारं कथाविश्व.
-
Gagan Jeevan Tejomay (गगन जीवन तेजोमय)
छाया महाजन यांनी लिहिलेल्या अनेक ललितलेखांचे संकलन या पुस्तकात आहे. एखादा विषय आणि त्याभोवती गुंफले गेलेले मुक्त चिंतनाचे पदर उलगडून दाखवणारे हे पुस्तक आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आभार व्यक्त करणे, इथपासून ते अगदी कुमारगंधवार्र्ंचे गाणे अशा विविधांगी विषयांनुषंगाने मनात सहजगत्या स्फुरलेल्या विचारांचा हा लेखसंग्रह आहे. आकलनाच्या दृष्टीने अत्यंत सहज, ओघवती भाषा आणि त्यातून आलेली विषय मांडणी हा या पुस्तकाचा विशेष होय. लेखिकेची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणार असल्याने वाचकांचा लेखिकेसोबतचा हा विचारप्रवास निखळ आनंद देणारा ठरतो.
-
Pratibha Devisingh Patil
The book, “An Inspirational Journey”: Pratibha Devisingh Patil – The First Woman President of India – is an attempt to understand the life and works of the First Citizen of India prior to her occupying the coveted position. In the late fifties and early sixties when the discouraging forces against women were predominant, Pratibhatai excelled in academics. It was her will power, conviction, purity of purpose and belief that sky is the limit which propelled her into politics and finally elected to be the First Woman President of India. Pratibhatai’s life is an inspirational story, her journey in life has been so eventful, her achievements are so many and diversified. She has had a political career which kept moving upwards, gradually and steadily, till she finally reached the pinnacle. She humbly attributes her success to the Almighty and to the People of India. The book is a progressive effort to illustrate her political participation as well as her attachment towards the family and she emerged a winner on both the fronts effectively. Simply her achievements are so large and varied that they need to be narrated as – ‘Those who do not speak about themselves need to be spoken about.’
-
Manasi
काय दिलं माझ्या प्रेमानं ? फक्त दु:ख... ? ऑसमंडच्या गाण्याचा मुखडा आहे बघ, 'लव्ह इज ओन्ली फॉर टुडे'. प्रेम फक्त आजच्यापुरतंच, या क्षणापुरतंच असतं. ते आज जगून घे. हे खरं असावं, पण कळलं कधी नाही. माणसाच्या मनाचीच नाती खरी, हे गृहीतक होतं माझं. प्रेमाबरोबर मीही एक नातं विणायला घेतलं. सामाजिक नात्याला झुगारून... तरीही सामाजिक होतंच ते... मग लक्षात आलं, की माणसाच्या मनाच्या नात्याला तर स्थानच नाहीये आणि किंमतही. सत्य हे की, सामाजिक नात्यांचा शिक्का खोलवर रुतून बसलाय आपल्या मानसिकतेत. एखाद्या गुणसूत्रासारखा रुजलाय आपल्यात.
-
College
या कॉलेजमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी आहे. डिपार्टमेंट सुरू मी करायचं. एस्टॅब्लिश मी करायचं. मग हळूच कोणीतरी संधिसाधू मतलबी वाकडेबाई गरजू म्हणून, लाचार बनून येणार आणि शिरजोर होऊन टेकओव्हर करणार. विद्यार्थी आपण जमवायचे. तुकड्या वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे. मग तथाकथित संस्थाचालक आणि प्राचार्य आपल्यापुढं गोंडा घोळणार्या माणसांची अध्यापक म्हणून वर्णी लावणार. रिझल्ट उत्तम लागावेत म्हणून आपण मरमर करणार. रजा न घेता एस्ट्रॉ क्लासेस घेणार. नोट्स देणार. त्यातून तुकडी तयार होणार. त्या तुकडीला हे नवे लोक शिकवणार. उत्तम शिक्षक म्हणून आपलाच उदो उदो करायला विद्यार्थ्यांना चलाखीनं प्रेरित करणार. इतकं सगळं किळसवाणं आहे,ओंगळ आहे... या सगळ्याची चीड येत नाही तुम्हाला, सर ? तुम्ही अजूनही पक्क्या मुरलेल्या प्राध्यापिका झाला नाहीत. अजून अनुभव येतील. मग इतकी चीड येणार नाही. फक्त असहाय्यता जाणवेल. तीही आपण काही करू शकत नाही याची ! सगळेजण एकच गोष्ट सांगतील. सगळ्या कॉलेजमध्ये असंच चालतं. पुढं पुढं आपलीही खात्री पटते की, सगळीकडे हेच चालत असेल तर भल्याभल्यांनी हात टेकले असणार. त्यामुळे तुम्हाला एक पोक्त सल्ला देतो, तुमचं करियर पाहा." सध्याच्या महाविद्यालयीन वातावरणातील मूल्यहीनतेचा सर्वंकष आलेख काढणारी आणि अंतर्मुख करणारी सामर्थ्यशाली कादंबरी.