Doicha Padar Aala Khandyavari (डोईचा पदर आला खांद्
ही कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची. ओढाळ तरुण वयात मोहाच्या एका धूसर क्षणी अपघातानं ती एक चूक करते. पण त्यापायी तिचं सारं आयुष्यच बदलून जातं. आपल्या सार्या आकांक्षांना तिलांजली देत, ‘पापणीआडचा पाणपडदा' लपवत ती जगत राहते ! अंतरीचा पीळ, वेदना, संघर्ष सोसत जळत राहते ! यातून सुटण्याचा मार्ग तिला गवसतो का ? परतीची वाट सापडते का ? ‘पाऊल वाकडं पडलं’, तर ‘तिचं’ ! ‘निसरड्या वाटेवर घसरली’, तर ‘ती’च चुकलेली ! ही ‘ती’च्या भोवतीची काटेरी चौकट मोडेल का ? स्त्रीला वेढणार्यार कौटुंबिक, सामाजिक, मानसिक कुंपणांचा वेध घेणारी कादंबरी.