Postmaster Aani Itar Katha (पोस्टमास्तर आणि इतर कथ
माणूस आहे म्हणूनच या जगात भावनांचा सुंदर गोफ विणला जातो, आणि त्याला साथ असते निसर्गाची. रवीन्द्रनाथांच्या जीवनात 'माणूस' आणि 'निसर्ग' यांना असाधारण स्थान आहे, त्यांच्या कथेत निसर्ग हा फक्त वर्णनाकरिता येत नाही, तर भावभावनांच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावतो. निसर्गाची बदलणारी रूपं माणसाच्या बदलणार्या भावनांच्या प्रतिमा असतात. निसर्ग आणि माणूस यांच्या संयोगातून फुललेली विश्वकवीची कथा तो महामानव होता हे नकळत सांगून जाते.