Ucchad (उच्छाद)
संस्थांनी कारभारातल्या कपट- कारस्थानांमुळे आयुष्य उध्वस्त झालेल्या सल्लागार चिटनिसांच्या - देसाईंच्या मुलाची 'उच्छाद' ही हृदयद्रावक कहाणी. चित्रकार आणि गुप्तहेरकथालेखक असलेला श्री कोवळ्या मनात बसलेल्या मानसिक धक्क्यांनी मनोरुग्ण झाला आहे. आत्मविश्वास आणि सहानुभूती ह्यांच्या अभावाने त्याचे आयुष्य भरकटलेले. कधी निराश तर कधी नको एवढे आक्रमक असे हे व्यक्तिमत्व मुलतः सत्प्रवृत्त आहे. त्याच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींच्या वर्तनाचा पाया लैंगिक अनुभवांत, असमाधानात किंवा विकृतीत दडलेला आहे. त्र्यं. वि. सरदेशमुखांचा सखोल मनोविश्लेषण करण्याचा प्रत्यय 'उच्छाद' या कादंबरीत येतो.