Chandrotsav (चंद्रोत्सव)
हातातून निसटून गेलेल्या सुखाच्या शोधात निघालेल्या माणसांच्या मन विषण्ण करणार्या कथा .... या सगळ्या कथांमध्ये सामाजिक जाणीव, मानसोपचार आणि मुलीचं नातं, मुलीला आईविषयी वाटणारं एकटेपण आपण फार सुरेख शब्दांमध्ये वर्णन केलेलं आहे. मुलंबाळं एकदा बाहेर गेली आणि घरात एकटी स्त्री व एकटा पुरुष असला की त्यांचं अंतर्मन सतत त्यांना खात असतं, याचं सुरेख वर्णन दाखविलं आहे. त्याचबरोबर मुलगी हर्षदा आणि सुरिंदर यांचा आंतरजातीय प्रेमविवाह, त्यांचं संभाषण, त्यांचं वागणं याचंही फार सुरेख वर्णन झालं आहे.