Governance For Growth In India (गव्हर्नन्स फॉर ग्र
भारतामध्ये वेळोवेळी निवडणुका होत असतात. आणि नेहमीच सर्व मतदारांमध्ये सत्ता आणि निवडणुका याविषयी वादविवाद आणि चर्चा चालू असतात. हे पुस्तक म्हणजे, राष्ट्रीय जीवन अतिशय जवळून पाहिलेल्या एका व्यक्तिमत्त्वाच्या दूरदृष्टीतून आलेलं निवेदन होय. प्रत्येक नागरिकाने ते वाचायलाच हवं आणि समजून घ्यायला हवं. दूरदृष्टी असणारे पण तरीही प्रॅक्टीकल असे ‘गव्हर्नन्स ङ्गॉर ग्रोथ इन इंडिया’ हे पुस्तक प्रत्येक नागरिकासाठी वेळोवेळी उपयोगी पडणारा आराखडाच आहे. या पुस्तकामुळे नागरिक आपला मताधिकार योग्य विश्लेषण करून आणि विचारपूर्वक वापरतील आणि भारतामध्ये खरा बदल घडवून आणतील. प्रत्येक निवडणुकीमध्ये, तुम्हाला अनेक उमेदवारांमधून कामाच्या आधारे आणि समाजाला त्यांनी दिलेल्या योगदानाच्या आधारे सर्वोत्कृष्ट उमेदवार निवडायचा असतो. तुमचा ‘‘मतदानाचा अधिकार’’ अमूल्य आहे. आणि तो बजावणे गरजेचे आहे. तो बजावल्यामुळे एक नागरिक म्हणून तुम्ही केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एक चांगलं सरकार विकसित करण्यासाठी मदत करता.