Aamacha Kay Gunha (आमचा काय गुन्हा)
संस्थेच्या गजाआड राहणार्या मुलांच्या अस्तित्वाच्या प्रश्नासारखी गंभीर समस्या हा या पुस्तकाचा गाभा ! पण तो गाभा हाताळतांना कुठे कंटाळवाणा नाही की अनावश्यक तात्विक चर्चा नाही. वाचकाच्या मनाला अंतर्मुख करण्याची शक्ती या सहज-सुंदर लेखनात आहे. "आप तो आ जाव" या मुलांच्या निमंत्रणातील आर्जवानं रेणू गावस्कर या गजाआडच्या मुलांपाशी गेल्या. त्यांचं पुस्तक प्रत्येक वाचकाच्या मनात जिवंतपणाचा झरा निर्माण करील यात काहीच शंका नाही.