Akherche Shiledar (अखेरचे शिलेदार)
अखेरचे शिलेदार या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय, मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी. या पुस्तकातले शिलेदार आपल्याला एक प्रश्न विचारतात : 'स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?' त्यांच्यासाठी केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र् नव्हतं. १९४७ नंतरही त्यांचा संघर्ष सुरुच राहिला.