-
Aivaj Ek Smrutibandh (ऐवज एक स्मृतिबंध)
अमोल पालेकर यांच्या कला कारकिर्दीचा ‘ऐवज’ वाचकांच्या हाती! हे पुस्तक केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही; हे एका माणसाचं आत्मचिंतन आहे. यातून आपण जीवनातील साधेपणाचं सौंदर्य आणि स्वाभिमानाची ताकद अनुभवतो." "कलावंत म्हणून ते केवळ भूमिका साकारत नव्हते, तर समाजाला विचार करायला लावणारी कला निर्माण करत होते." सिद्ध चित्रकार, अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐवज’ या आत्मकथनपर मराठी पुस्तकाचे प्रकाशन! यानिमित्ताने स्वत:चा वेगळा चेहरा निर्माण केलेल्या एका मनस्वी मराठी कलाकाराची नवी ओळख वाचकांना होणार असून पालेकर यांच्या कलात्मक प्रवासाला आकार देणाऱ्या अनुभवांचा तपशील वाचकांना समृद्ध करणारा ठरेल.पालेकर यांच्या आत्मकथनातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील काही मौल्यवान क्षणचित्रे गवसतात. व्यक्तिगत आठवणी, दुर्मीळ छायाचित्रे आणि सत्यदेव दुबे, बादल सरकार, हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, जयदेव वर्मा अशा नाट्य-चित्रपट जगतातील दिग्गजांना पालेकर यांनी अर्पण केलेले श्रद्धांजलीपर मनोगत समाविष्ट करण्यात आले आहे. पुस्तकामध्ये दिलेल्या ‘क्यूआर कोडमुळे पालेकर यांच्या कलाकृती बघण्याची संधी वाचकांना लाभणार आहे...!! माझा इथवरचा प्रवास न्याहाळताना, कला क्षेत्रातील परिवर्तनाचा आवाका, व्याप्ती आणि खोली लक्षात येईल. पडद्यावर दिसणाऱ्या भोळसट नायकापलीकडच्या माणसाची जडणघडण समजून घेता येईल
-
Arthshastracha Sankshipt Itihas (अर्थशास्त्राचा सं
हे छोटेसे पुस्तक आपल्याला खूप मोठी कहाणी सांगते. प्राचीन काळापासून ते आधुनिक जगापर्यंत अर्थशास्त्राच्या लघुतम इतिहासाचे हे पुस्तक म्हणजे युद्धांच्या मागे प्रच्छन्न आर्थिक शक्ती कशी काम करत असते, नवनवीन शोध कसे लागत असतात आणि सामाजिक बदल कसे होत असतात या गोष्टी मुळापासून उकरून काढते. भांडवलशाही आणि मार्केटच्या पद्धती यांचा उगम कसा होतो आणि अर्थशास्त्राच्या या विद्याशाखेला महत्त्वाच्या कल्पना प्रदान करणारे लोक कसा आकार देतात याचा मागोवा हे पुस्तक घेतं. कृषिक्रांतीपासून ते आपला ग्रह दिवसेंदिवस आणखी आणखीच कसा उष्ण होत जातोय, या गोष्टीपर्यंत अँड्य्रू ली हे आपल्याला अर्थशास्त्राविषयीची ही कहाणी सांगतात. या कहाणीत शतकानुशतकांपासून आणि वेगवेगळ्या खंडांचा विचार करत अर्थशास्त्र या विद्याशाखेमध्ये अंतर्भूत असलेली विविधता अधोरेखित होत राहते. मक्तेदारीच्या खेळाच्या मुळापर्यंत ते जातात आणि नांगराच्या शोधामुळे लैंगिक भेदाभेद कसे वाढले ते उलगडून दाखवतात. काही रोगांमुळे वसाहतवादाच्या काही प्रकारांना कसा आकार प्राप्त झाला तेही सांगतात. अमेरिकी शहरांमध्ये गगनचुंबी इमारती निर्माण होण्याची कारणे विशद करतात आणि बरेच काही सांगून जातात. या सगळ्या विचारमंथनाचा परिणाम म्हणजे आपल्या विवाला आकार देणारे असे अर्थशास्त्रीय कल्पनांवर आणि शक्तिस्त्रोतांवर प्रकाश टाकणारे हे रंजक पुस्तक.
-
Mossad...
Mossad Israeli Gupther Sansthela Baladhya Banvnarya Atyant Gupt Mahatvpurn Thararak Mohima ( Marathi Edition ) मोसाद इस्त्रायली गुप्तहेर संस्थेला बलाढ्य बनवणाऱ्या अत्यंत गुप्त, महत्त्वपूर्ण थरारक मोहिमा ! मोसाद या पुस्तकात मोसादने पार पाडलेल्या गोपनीय मोहिमांचे वर्णन केले आहे. या मोहिमा मोसादच्या विकासामध्ये त्याचे स्वरूप निश्चित करणाऱ्या महत्त्वपूर्ण घटना ठरल्या आहेत. १९७२च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या इस्रायली खेळाडूंची 'ब्लॅक सप्टेंबर' संघटनेच्या अतिरेक्यांनी हत्या केली. या अतिरेक्यांचा माग काढत त्यांना एकेक करून संपवण्याची मोहीम, इस्रायलच्या गुप्तपणे राबवण्यात येणाऱ्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी 'येलोकेक' युरेनियमचा साठा हस्तगत करण्याची मोहीम आणि नाझी युद्ध गुन्हेगार अॅडॉल्फ आईकमन याचे अपहरण करत त्याचा जाहीर न्यायनिवाडा घडवून आणण्याची मोहीम अशा महत्त्वपूर्ण मोहिमांचे वर्णन या पुस्तकात केले आहे. मोसादच्या काही मोहिमा वादग्रस्तही ठरल्या. यात इराकच्या अणुऊर्जा कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या एका शास्त्रज्ञाची हत्या घडवून आणण्याची मोहीम आणि एडवर्ड स्नोडेनप्रमाणे एक प्रमुख जागत्या (विसलब्लोअर) असलेला -इस्रायली नागरिक मोर्डेकाई वानुनु याचे अपहरण या मोहिमांचा समावेश होतो मोर्डेकाई वानुनु यांना इस्राईलने बेइमान, गद्दार ठरवले. या मोहिमांवर जगभरातून नैतिक प्रश्नचिन्हे उठली. एकूणच या पुस्तकात वर्णन केलेल्या मोसादच्या मोहिमा त्याची वैशिष्ट्ये, कल्पकता आणि धाडस यांचे अचूक वर्णन करतात. त्याच वेळी त्या मोहिमांमध्ये अंतर्भूत असलेल्या वादग्रस्त नैतिक पैलूंनाही वाचकांसमोर मांडतात.
-
Goat Days (गोट डेज)
आखाती देशांत जायचे, भरपूर पैसे कमवायचे आणि मायदेशातल्या कुटुंबियांना सुखात ठेवायचे या आकांक्षेने तिथे जाणाऱ्या लाखो लोकांपैकी एक म्हणजे केरळात मजुरी करणारा नजीब. त्याची आखाती आकांक्षा सफल झाली की स्वप्नरूपातच राहिली ? त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. कधी निसर्गाने तर कधी मानवाने, प्राणच पणाला लावले. त्यातूनही तो निभावून गेला, कसा? कोणत्या श्रद्धांमुळे? जसा होता तसा राहिला की ? मानवी आयुष्याची संभवनीय परिवर्तने आणि मूलभूत मूल्ये, यांचे चित्तवेधक दर्शन या कादंबरीत घडते. ‘गोट डेज’ मल्ल्याळी भाषेत प्रकाशित झाली आणि अल्पावधीत बेस्ट सेलर या वर्गात मोडली जाऊ लागली. मल्ल्याळी साहित्यातील एक अत्यंत तेजस्वी असे व्यक्तिमत्व म्हणजे बेन्यामिन. त्यांची उपरोधीक आणि प्रसंगी हळुवार होणारी शैली नजीबच्या आयुष्याची वाळवंटी वंचना, बघता बघता, एकाकीपणा आणि परकेपणा, यांचे वैश्विक परिणाम कसे बनते ते समर्थ रीतीने उभे करते. या पुस्तकाच्या मल्याळम आवृत्तीच्या तीन लाखाहुन अधिक प्रतींची विक्री झालेली आहे.
-
Scienstoriya Katha Tantradnyanachya(सायन्स्टोरीया
बॅडेडचा शोध पत्नीवरच्या प्रेमापोटी लागला. कॉफी भारतात तस्करीद्वारे आली. पेसमेकर एका अभियंत्याची कारागिरी आहे. रेफ्रिजरेटर एका डॉक्टरनं शोधलं. या काही कपोलकल्पित कथा नाहीत तर आख्खं मानवी आयुष्य बदलवून टाकणाऱ्या शोधगाथा आहेत. अत्यंत रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या 'सायन्स्टोरी या'
-
Scienstoriya Katha Shodhanchya(सायन्स्टोरीया कथा श
लुई पाश्चरनं 'रेबिज'वर लस शोधली ही गोष्ट नाही.. ती त्याला नेमकी का शोधावी वाटली? त्यासाठी त्यानं काय काय केलं? कुठल्या पातळीवरचे धोके पत्करले? यापाठचं नेमकं निरिक्षण कसं गवसलं? या आणि अश्या एक ना अनेक प्रश्नांच्या शोधामागं दडलीये खरी गोष्ट.. बरं लस अशीच येत नाही.. सुई असते तेव्हा इंजेक्शन येतं आणि इंजेक्शन येतं तेव्हा कुठं लस येते.. मानवी संस्कृती ही रिले रेस प्रमाणं आहे एकानं दिलेली बॅटन पुढं सरकते तेव्हा कुठं ही शर्यत चालू रहाते.. अश्याच नानाविध बॅटन्सच्या गोष्टी रंजक, प्रेरक आणि उद्बोधक 'सायन्स्टोरी या
-
Maharana Pratap Ajey Yodha (महाराणा प्रताप अजेय यो
ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आणि त्याबरोबरच मेवाडी दंतकथा, नोककथा यांच्या आधारावर लिहिण्यात आलेलं, एका अत्यंत महान भारतीय नायकाचं चरित्र. हे सुबोध, सुगम लेखन वाचकांना मंत्रमुग्ध करतं आणि खिळवून ठेवतं. 'सन १५७६ च्या हळदीघाटीच्या प्रसिद्ध लढाईचं वर्णन करताना कुठेही सहानुभूतीनं ओथंबलेलं किंवा पूर्वग्रहदूषित लेखन न करता, राणा प्रतापशी निगडीत असलेल्या अनेक परीकथा दूर सारून अत्यंत प्रामाणिकपणे वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.' - फ्रंटलाईन 'एका व्यापक ऐतिहासिक चौकटीच्या सादरीकरणातून, महाराणा आणि अकबर या कट्टर शत्रूच्या मनात परस्परांविषयी कितीही शत्रुत्व असलं तरी त्यांना एकमेकांविषयी आदरही होता, हे दाखवून देण्यात आलं आहे.' - स्टेट्समन
-
Plague (प्लेग)
आजाराची साथ ही युद्धासारखी खवीस नाही. अशा परिस्थितीत चांगलं म्हणजे काय ? दैव म्हणजे काय ? मानव कुणाला म्हणायचं ? जेव्हा मृत्यू अनपेक्षित असतो तेव्हा त्याला सामोरं जाणं म्हणजे का वीरगती ? मृत्यूची वाट पाहणं म्हणजे का वीरगती? मृत्यूची वाट पाहणं हा विचार करत राहाणं, किंवा मृत्युमुखी पडणाऱ्या कुणाला मदत करणं, ही वीरगति ? मृत्यू हा अटळ आहे. पण जेव्हा सगळ्यांचं जीवनच धोक्यात आहे तेव्हा ह्या अटळपणाचं काय करायचं ? साथीच्या काळात नैसर्गिक मृत्यू येणं म्हणजे काय? आपण आज वाचलो ह्याची बढाई मारायची की ती आपल्याला काही करायची संधी मिळाली आहे असं मानायचं आणि काही करायचं ? ज्या साथीनं मानवी जीवनालाच धोक्यात टाकलंय ती साथच मानवी निष्काळजीपणाने येत असेल तर? म्हणजे ती कधी परत येईल ते सांगता येणार नाही. मग काय करायचं ? मानवाचे मानवाशी संबंध, मानवाचे देवाबरोबरचे संबंध, मानवाचे स्वतःबरोबरचे संबंध ! मृत्यू अटळ आहे हे एक सार्वत्रिक सत्य आहे. आणि ते तितकंच कठोर, आपल्या समोर उभं ठाकलेलं आहे. ते अदृश्य नाही. ते अटळ नाही. आपण अगोदरच मेलो नाही ह्याबद्दल हर्षोल्हास मानायचा की आपल्याला मिळालेल्या अतिरिक्त वेळेचा सदुपयोग करायचा. हा काम्यूचा संदेश अत्यत सोप्या शब्दात, सर्वांना समजेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा काम्यूची हातखंडा कादंबरी, मराठीत थेट फ्रेंचमधून.
-
Maurya Chandragupta Te Samrat Ashok Parshwabhumi G
चंद्रगुप्त ते सम्राट अशोक पार्श्वभूमी, गाथा आणि वार इ.स.पूर्व ३२४ ते इ.स.पूर्व १८५ या काळात मौर्यांनी संपूर्ण भारतीय उपखंडावर कार्यक्षमतेने आणि राज्यववस्थापनातील कौशल्याने राज्य केले. ख्रिस्त-पूर्व सहाव्या शतकातील मगध साम्राज्याच्या उद्यापासून सुरुवात करून हे स्पष्ट विवेचक पुस्तक मौर्यांच्या काळातील नाट्य, मौर्यांच्या राजकारणातील कुटिलता, आणि गुंतागुंत चित्रित करते. मौर्य साम्राज्याचा पहिला, गूढ राहिलेला राजा चंद्रगुप्त याच्यापासून सुरुवात होते आणि चंद्रगुप्त याच्यापेक्षा अधिक गूढ म्हणून राहिलेला, चंद्रगुप्त याचा मार्गदर्शक / गुरू चाणक्य / कौटिल्य याचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात आहे. चंद्रगुप्त याचा मुलगा आणि वारस बिंदुसार हा मौर्य.
-
Focus On What Matters (फोकस ऑन व्हॉट मॅटर्स)
मनातल्या गोंधळाला अडवून स्पष्टतेनं पुढे जा! कोलाहलात आणि आवाजात चांगल्या रीतीनं जगणं इतकं अवघड का असतं? तुम्हाला ही आधुनिक जगातील समस्या वाटेल, पण ही कालातीत समस्या आहे. २००० वर्षांपूर्वी प्राचीन स्थितप्रज्ञांनी आपण आज सामोरे जात असलेल्या समस्यांबद्दल भाष्य केलं होतं आंतरिक शांतता कशी मिळवू शकतो? आनंदी होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? आपण अधिक लवचीक कसे होऊ शकतो? या पुस्तकामधून तुम्हाला खालील काही गोष्टी समजतील. अधिक लवचीक आणि एकाग्र होण्यासाठी विचारांचे सोपे अभ्यास. दररोज वर्तमान क्षणात कसं जगायचं? आनंदानं परिपूर्ण जीवन जगण्यासाठी खरी स्थितप्रज्ञ मूल्यं. • अधिक शिस्त बाणवण्याचा मार्ग. आनंद, संपत्ती, आरोग्य, तुम्ही, तुमचे स्वतःबरोबर आणि इतरांबरोबर असलेले नातेसंबंध, अशा जीवनाच्या विविध अंगांबद्दल भाष्य करणाऱ्या, अंतर्दृष्टी देणाऱ्या ७० पत्रांचा संग्रह म्हणजे फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक होय. जीवनातल्या आव्हानांना न जुमानता, योग्य गोष्टींवर लक्ष कसं केंद्रित करायचं याची आठवण करून देणारं स्मरणपत्र… फोकस ऑन व्हॉट मॅटर्स.
-
Jeevan Kaushalye (जीवन कौशल्ये)
जीवन कौशल्ये, जीवन मूल्ये आणि हार्ड स्किल्स या एकूणच सर्व प्रकारच्या जीवन व्यवहारांमध्ये अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या जीवन विषयक कौशल्यांची सविस्तर ओळख या पुस्तकात करून दिली आहे.
-
Paishachi Goshta (पैशाची गोष्ट)
पैसा आपल्याला भेडसावणारा प्रश्न किंवा आयुष्याचा आनंद लुटण्याच्या मार्गातला अडथळा बनू नये असं वाटत असेल तर... पैशाबद्दल स्पष्ट बोलायचं म्हटलं तर... ते काही सोपं नाही. खरंतर, पैसा म्हणजे इथून तिथून टाळण्याचाच विषय असतो. इतकच नव्हे, तर पैसा हा आपल्या जीवनातील एकमेव विषय नसला तरी, प्रमुख चिंतांपैकी एक विषय नक्कीच बनला आहे. आणि तसं पाहिल, तर पैसा हा स्वत:च, ना चांगला असतो ना वाईट असतो. तो आपल्याला बंदिस्त करून ठेवतो आहे की आपल्या स्वातंत्र्याची किल्ली बनतो आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, आपले त्याच्याबरोबरचे संबंध कसे असतातं ह्यावर ठरत असतं. जर का पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांची आपण पूर्णपणे जाणीव ठेवली आणि त्या संबंधाकडे पूर्णपणे लक्ष दिलं, तर आपण आपल्या वैयक्तिक संपत्तीबरोबर निकोप आणि सकारात्मक संबंध निर्माण करू शकतो; मग आपली मिळकत कितीही भरभक्कम असो किंवा कितीही तुटपुंजी असो. क्रिस्टिना बेनितो ह्या लेखिकेचं ह्या पुस्तकामागचं तत्त्वज्ञानच ते आहे. सारं आयुष्यभर त्यांनी अर्थशास्त्रज्ञ आणि वित्तीय सल्लागार म्हणून काम केले. पैशाबरोबरच्या आपल्या संबंधांच्या पूर्ण जाणिवेच्या तत्त्वांची आणि आपल्या आयुष्यातील चांगल्या सवयींची गाठ घालून, त्या एक आगळीवेगळी पद्धत सादर करत आहेत. तीन टप्प्यांत विभागलेल्या ह्या पद्धतीमार्फत आपल्याला आपल्या जवळची रक्कम अधिक चांगल्या रीतीने हाताळता येते, आपल्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो आणि काळज्यांचं आपल्या डोक्यावरचं ओझं हलकं करता येतं.
-
The Diary Of A CEO (द डायरी ऑफ अ सीईओ)
माझ्या उद्यमशीलतेच्या प्रवासात मी टोकाचे यश आणि अपयश यांचा सामना केला आहे. ते अनुभव आणि माझ्या पॉडकास्टद्वारे घेतलेल्या हजारो मुलाखती यांच्या मुळाशी काय आहे- कोणत्याही क्षेत्रासाठी लागू होऊ शकतील अशी काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली काही मूलभूत तत्त्व असतात. जिला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करायचे आहे, किंवा महान काही निर्माण करायचे आहे ती प्रत्येक व्यक्ती या तत्त्वांची अंमलबजावणी करू शकते. या मूलभूत नियमांचा अवलंब केल्यामुळे तुम्ही सर्वोत्तम कामगिरीच नोंदवता. मानसशास्त्र आणि वर्तनशास्त्र यांमधली तत्त्व, मी सर्वेक्षण केलेल्या प्रत्येक खंडातल्या आणि प्रत्येक वयोगटातल्या लाखो लोकांच्या शहाणपणाचे सार आणि अर्थातच माझ्या अत्यंत लोकप्रिय पॉडकास्टद्वारे मी जगातल्या सगळ्यांत यशस्वी लोकांशी साधलेला संवाद या सगळ्यांचे सत्व या नियमांमध्ये आहे. हे नियम आज लागू आहेत आणि आजपासून १०० वर्षांनीही लागू असतीलच. तुम्ही कधीपासून अमलात आणताय?