-
Samagra Ramayan Ram (समग्र रामायण राम)
वाल्मीकी मुनी लिखित रामायण हे आद्य महाकाव्य. तेव्हापासून ते आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधुनिक युगातही सगळ्यांना तेवढीच भुरळ पडणारी संपूर्ण रामकथा...
-
Cosmos (कॉसमॉस)
कुतूहलजनके, कल्पक, वाचनीय, विविधांगी... न्यू यॉर्क टाइम्स विश्वाच्या उत्क्रांतीची, विकासाची, जीवनाच्या उत्पत्तीची आणि विज्ञान व सभ्यता एकमेकांसोबत कशा वृद्धिंगत झाल्या, कोणत्या बळांनी आणि व्यक्तिमत्त्वांनी आधुनिक विज्ञानाला आकार दिला याची विलक्षण अशी. कथा हे पुस्तक आपल्याला सांगतं. कार्ल सेगन यांनी या पुस्तकामधून वैज्ञानिक संकल्पना रंजक प्रकारे समजावून सांगितल्या आहेत. सेगन यांची ही क्षमता वाखाणण्याजोगी असून त्यामुळे हे पुस्तक विज्ञानाबद्दलच्या पुस्तकांच्या यादीत अग्रणी आहे आणि कायमच राहील. काय आहे यात : - जवळचे ग्रह आणि अंतराळ मिशन - इजिप्ती चित्रलिपी - मानवी मेंदू - पदार्थ, सूर्य आणि विश्वं यांचं मूळ सूर्याचा अंत - तारामंडळांचा विकास
-
Tisara Stambha (तिसरा स्तंभ)
सरतेशेवटी, या पुस्तकातील इतिहासातला फेरफटका आशावाद सूचित करणारा आहे. आपली जीवनमूल्ये अपरिवर्तनीय नाहीत, ती बदलतात. डॉक्टर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर म्हणाले होते, 'वैश्विक नैतिकतेची कमान खूप उंच आहे; पण ती न्यायाकडे झुकणारी आहे.' छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये इतिहासाचे अवलोकन केले, तर द्वेषाचे बी पेरून कलहाचे पेव फोडण्यासाठी वंशवाद आणि लढाऊ राष्ट्रवाद जगात पुन्हा पुन्हा डोके वर काढत असतात असे वाटेल, त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे आपल्याला वाटते. असले संघर्ष ज्या समाजात घडतात, तो समाज तर बदलत असतो. त्या बदलाची दिशा सहिष्णुता, आदर आणि न्याय्यता यांच्याकडे जाणारी असते. त्या रेषेत प्रवास करताना चढ-उतार होतच राहतात. आज आपण उतरणीला लागलो असलो आणि अजूनही फार लांबचा पल्ला गाठायचा असला तरी आपण मजल-दरमजल करत इथवर आलो आहोत, त्यामुळे आपल्याला आशा वाटली पाहिजे. भविष्यात आकस्मिक आश्चर्याचे धक्के बसू नयेत म्हणून आपण भविष्याला आकार देत राहिले पाहिजे. अजून खूप काम करायचे आहे. चांगले आणि शांततापूर्ण एकात्म जीवन जगायचे असेल, तर मार्ग सुज्ञपणे निवडला पाहिजे. आपण तसे करू शकू, असा मला विश्वास आहे.
-
Mrutyukatha (मृत्यूकथा)
‘मृत्यू कथा’ हे वास्तववादी लेखन प्रकारातील एक उल्लेखनीय असेच पुस्तक आहे, असे म्हणावे लागेल. अत्यंत बारकाईने घेतलेली माहिती, चिकित्सकपणे शोधलेले मर्म यामुळे हे वाचन वाचकास समृद्ध करून जाते. या गतिमान, सहानुभूतिपूर्ण, धाडसी आणि कधी कधी तर रक्तच गोठवून टाकेल, अशा पुस्तकातून बस्तरचा प्रत्यक्ष परिसर, कथानकातील पात्रे, तेथील नागरी युद्धाचे सामाजिक परिणाम या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर जिवंत होऊन उठतात. यातील निवेदकाचे पात्र उगाच घुसडलेले कधीच वाटत नाही. उलट त्याच्या सदसद्विवेकबुद्धीमुळे त्याची उपस्थिती वाचकाला विश्वासार्ह वाटते आणि त्याच्यातील साहित्यगुणांमुळे तर तो प्रशंसनीयच ठरतो.
-
How We Got to Now (हाऊ वी गॉट टू नाऊ)
हाऊ वी गॉट टू नाऊ या सचित्र पुस्तकात स्टीव्हन जॉन्सन यांनी आपल्या दैनंदीन जीवनाचा अगदी अविभाज्य भाग असलेल्या सहा अगदी साध्या गोष्टींचा (चष्मा, लंबकाचे घड्याळ, विजेचा दिवा, भूमिगत गटारे, टेलिफोन, विजेचा दिवा) शोध कसा लागला आणि त्यामुळे एकूण जीवनावर किती दूरगामी आणि खोल परिणाम झाले यांचा इतिहास अतिशय रंजक पद्धतीने सांगितला आहे. अनेक भिन्न क्षेत्रातील वरवर असंभाव्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये (सूक्ष्मदर्शक यंत्र, ग्लोबल पोझीशनींग, मायक्रोचीप, न्युक्लीय एकीकरण, मानवी स्थलांतर, स्त्रीभृणहत्या) कसा परस्पर संबंध असतो आणि त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम कसा अनपेक्षित असतो हे त्यांनी सांगितल्यावर आपल्याला कळते आणि त्याने वाचक अचंबित झाल्या वाचून रहात नाही. वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या त्यांच्या खास शैलीमुळे ते जगभर लोकप्रिय आहेत.
-
Oh My Godse (ओह माय गोडसे)
मोहनदास करमचंद गांधी हा माणूस समजून घ्यायचा असेल,तर तुम्हाला आधी स्वतः 'माणूस' होणं गरजेचं आहे. गांधी समजून घेण्याची प्रक्रिया ही माणूस होण्याच्या प्रक्रियेपेक्षा वेगळी नाही. या प्रक्रियेत तुम्हाला अंतबाह्य उघडं व्हावं लागत. आपल्या जगण्याचा तटस्थपणे विचार करावा लागतो. हे सोपं नसत. म्हणून गांधी सोपा वाटत नाहीं लोकांना, कारण लोकांना माणूस होण्यातही फारसा रस नसतो. त्यांना नथुराम आकर्षक वाटतो. तो सोपा आहे. कारण त्याला कशाचीच जबाबदारी घ्यायची नाही. गांधी अवघड आहे, कारण तो तुमच्या कृत्यांची जबाबदारी घ्यायला भाग पाडतो. गांधी हि भारताची खरी ओळख आहे. नथुराम हा भारतावरचा कलंक आहे. गांधी हा विचार आहे, तर नथुराम अविचार आहे. गांधी हि जबाबदारी आहे, तर नथुराम हि बेपर्वाई आहे. गांधी हा माणुसकीचा विश्वस्त आहे, तर नथुराम हा माणुसकीचा खुनी आहे. आपण कोणाची निवड करायची? गांधींची की नथुरामची? नथुराम म्हणेल की, माझी निवड करा; पण गांधी सांगेल की, तुम्ही स्वतःची निवड स्वतःच करा. पण तस करताना सत्याला साक्षी ठेवा. माणुसकीचं भान बाळगा. जो हे करेल. तो मग माणुसकीच्या प्रक्रियेत ओढला जाईल. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.
-
Akherche Shiledar (अखेरचे शिलेदार)
अखेरचे शिलेदार या पुस्तकात स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ असलेले काही जण त्यांची गोष्ट आपल्याला सांगतात. आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय, मुस्लीम, हिंदू आणि शीख पंथाची माणसं आहेत ही. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारताच्या विविध प्रांतांतली, विभिन्न संस्कृती जपणारी आणि वेगवेगळ्या पाश्वभूमीची ही मंडळी आहेत. काही आस्तिक आहेत; तर काही नास्तिक. काही डावे, काही गांधीवादी; तर काही आंबेडकरवादी. या पुस्तकातले शिलेदार आपल्याला एक प्रश्न विचारतात : 'स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय?' त्यांच्यासाठी केवळ स्वराज्य म्हणजे स्वातंत्र् नव्हतं. १९४७ नंतरही त्यांचा संघर्ष सुरुच राहिला.
-
Ambedkar Jivan Ani Varsa (आंबेडकर जीवन आणि वारसा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव आज सर्वांत आदरणीय भारतीयांच्या नामावलीत घेतलं जातं आणि देशभरातील त्यांच्या पुतळ्यांची संख्या महात्मा गांधींच्या पुतळ्यांखालोखाल असेल. किंबहुना, आधुनिक काळातील 'सर्वांत थोर भारतीय' ठरवण्यासाठी अलीकडे एक मतचाचणी घेण्यात आली, त्यात दोन कोटींहून अधिक मतं नोंदवली गेली आणि त्यात आंबेडकरांना गांधींपेक्षा जास्त मतं मिळाली होती. आज सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आंबेडकरांवर हक्क सांगण्यासाठी चढाओढ सुरू असते. मुख्यत्वे आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यतेवर कायद्याने बंदी आली आणि दलित समुदायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्यामुळे दलित समूहांमध्ये ते एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो. व्यक्तीच्या अधिकारांची पाठराखण करणाऱ्या व दडपलेल्यांची उन्नती साधू पाहणाऱ्या उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष, अनेकत्ववादी मूल्यांसह भारत आजपर्यंत लोकशाही म्हणून टिकला, त्याचं मुख्य कारण संविधान हे आहे (पण सध्या ही सर्व मूल्यं संकटात अडकली आहेत). 'डॉ. आंबेडकरांची थोरवी केवळ एकाच उपलब्धींपुरती मर्यादित मानता येत नाही, कारण सर्वच बाबतीत त्यांनी सारखीच असामान्य कामगिरी केली,' असं शशी थरूर लिहितात. आंबेडकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जीवनपट प्रस्तुत चरित्रात संक्षिप्तपणे, सुबोधपणे, मार्मिकपणे व आदरभावाने उलगडला आहे.
-
Nyay (न्याय)
खोटं बोलणं है नेहमीच वाईट असतं का? व्यक्तिस्वातंत्रयाला काही मर्यादा असली पाहिजे का? अपवादात्मक परिस्थितीत एखाद्याचा खुन करावा लागल्याच समर्थन करता येऊ शकेल का? मुक्त बाजारपेठ खरंच मुक्त आहे का? विषमता कमी करण्यासाठी ठरावीक लोकांवर कर आकारणं न्याय्य आहे का? मायकल सँडेल या पुस्तकातून आपल्या प्रत्येकाला भेडसावणाच्या या रोजच्या आयुष्यातील नैतिक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानातील वेगवेगळे सिदधान्त वाचकांसमोर अगदी सोप्या आणि दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं देत उलगड़न दाखवले आहेत. आजच्या काळातील मानवजातीसमोरील हे नैतिक पेच सोडवण्यासाठीची सँडेल यांची ही खास शैली बोजड राजकीय तत्तवज्ञानाला रंजक तर बनवतेच शिवाय वाचकांनाही स्वतःची मुल्यव्यवस्था नव्याने तपासून पाहायला भाग पाडते. हे अवघड कार्य सँडेल इतक्या ओघवत्या शैलीत पार पाडतात की वाचकाला ही प्रकरण म्हणजे आपल्या आवडत्या लेखकाचा कथासंग्रह नसून राजकीय तत्त्वज्ञानाचं रूक्ष अकादमिक लिखाण आहे, याचा विसर पड़ायला लागतो.
-
Kashmir Ani Kashmiri Pandit (काश्मीर आणि काश्मिर
काश्मीर हे एक कोडे आहे आणि काश्मिरी पंडित हे त्या कोड्याच्या आतील एक कोडे आहे. हे पुस्तक ह्या कोड्यातील काही गुंता इतिहासातील आणि वर्तमानातील काही स्रोतांच्या आधारे सोडवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे.
-
Sharir (शरीर)
शरीर ‘वैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे.’ - डॉ. विठ्ठल लहाने, सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन. ‘मानवी शरीर प्रणाली, त्याची रचना व कार्य हे अत्यंत जटिल आणि समजून घेण्यास कठीण आहे. यातून सर्वसामान्यांच्या मनातील असंख्य प्रश्नांचे निरसन होईल.’ - डॉ. अविनाश सुपे, डीन, केईएम हॉस्पिटल. ‘शरीर हे पुस्तक वाचणं म्हणजे शरीरविज्ञानाच्या क्षेत्रात मुशाफिरी घडवून आणणारा आणि मनाला उल्हासित करणाऱ्या तरल सिंफनीसारखाच अनुभव आहे.’ - डॉ. नंदकुमार, सुप्रसिद्ध हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ. ‘प्रत्येकानं ‘शरीर’ हे अद्भुतरम्य पुस्तक वाचणे आणि संग्रही ठेवणे अगत्याचे आहे, या पुस्तकामुळे आपल्याला आपल्यातल्या अणूरेणुला ओळखण्यासाठी मोलाची साथ लाभणार आहे.’ - डॉ अनिल गांधी, सुप्रसिद्ध सर्जन. ‘ग्रामिण भागातून मेडिकलचं शिक्षण घ्यायला येणाऱ्या आणि इतरही सगळ्याच विद्यार्थ्यांना शरीरक्रियाशास्त्र हा विषय समजण्यासाठी ‘शरीर’ हे पुस्तक खूपच मदत करेल असं मला वाटतं.’ - डॉ. अजित भागवत, सुप्रसिद्ध हृदयक्रियातज्ज्ञ ‘अत्युकृष्ठ! हे पुस्तक वाचताना आपण प्रत्येक अवयवसंस्थेच्या आत जाऊन प्रत्यक्ष अनुभवतोय असंच वाटत राहतं.’ - डॉ. विवेक नळगिरकर ‘जनांसाठी असलेलं हे ‘शरीर’ इतिहास आणि शरीर विज्ञान यांची गुंफण करून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. आपण स्वतःला नव्याने ओळखायला लागतो.’ - डॉ. शंतनू अभ्यंकर